शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

आरपीएफचे 'लाख मोलाचे' ऑपरेशन अमानत; प्रवाशांना दिलासा, रोकड अन् दागिन्यांसह ९ लाखांचा ऐवज परत केला

By नरेश डोंगरे | Published: February 17, 2024 8:48 PM

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे क्षेत्रिय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे आरपीएफ वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाशांच्या हिताचे उपक्रम राबवित असते. 'ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन अमानत'चाही त्यात समावेश आहे.

नागपूर : रेल्वेची संपत्ती तसेच प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) 'ऑपरेशन अमानत' अंतर्गत तत्परतेचा परिचय देऊन अवघ्या १० दिवसांत दोन प्रवाशांची रोकड आणि माैल्यवान चिजवस्तूंसह ९ लाखांचे साहित्य परत केले.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे क्षेत्रिय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे आरपीएफ वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाशांच्या हिताचे उपक्रम राबवित असते. 'ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन अमानत'चाही त्यात समावेश आहे. वेगवेगळ्या कारणामुळे घरून पळून जाणाऱ्या, कुणी पळवून नेणाऱ्या किंवा अनवधानाने हरविलेल्या मुलांना शोधून त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्याची महत्वपूर्ण कामगिरी 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत बजावली जाते. तर, 'ऑपरेशन अमानत 'अंतर्गत चोरीला गेलेले किंवा चुकीने राहून गेलेले प्रवाशांचे सामान त्यांना परत मिळवून देण्याची कामगिरी आरपीएफ करते. ६ फेब्रुवारीला ०७८२९ गोंदिया-गढा पॅसेंजरमध्ये एका महिलेची बॅग राहून गेली. रेल्वे सुरक्षा दलाच्या बालाघाट चाैकीतील जवानांनी ज्या महिलेची ही बॅग होती, त्यांचा पत्ता शोधून त्यांना ती परत केली. बॅगमध्ये ७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य होते.

अशाच प्रकारे राजनांदगाव (छत्तीसगड) मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची ट्रॉली बॅग घाईगडीत राहून गेली. त्या महिलेचा शोध घेऊन आरपीएफने ती बॅग परत केली. याबॅगमध्ये १ लाख, ६० हजारांची रोकड आणि अन्य सामान असे सुमारे पावणदोन लाखांचे साहित्य होते. घरच्यांना माहिती झाले तर काय होणार, अशी चिंता लागलेल्या या महिलांना अवघ्या काही तासातच रोख आणि दागिने परत मिळाल्याने त्या महिलांनी आरपीएफ जवानांचे तोंडभरून काैतुक केले. अशा प्रकारे १ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ या दीड महिन्याच्या कालावधीत आरपीएफनेलहान मोठ्या २५ प्रकरणातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांचे ११ लाख, ४६ हजार, ८९९ रुपये किंमतीचे साहित्य परत केले. गेल्या वर्षी अशाच प्रकारे १६७ प्रकरणात प्रवाशांचे ४४ लाख, ९४ हजार, २०५ रुपये किंमतीच्या चिजवस्तू परत मिळवून दिल्या होत्या, असेही आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी सांगितले.

घाईगडबड करू नकाया संबंधाने आर्य यांनी रेल्वेत प्रवास करताना कोणत्याही प्रकारची घाईगडबड करू नये, धावत्या गाडीत चढू अथवा उतरू नये. कुठे काही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ आरपीएफशी संपर्क करावा, असे आवाहनही आर्य यांनी रेल्वे प्रवाशांना केले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसjewelleryदागिने