शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये आरपीएफने केले ऑपरेशन नार्कोस, बिहारचा गांजा तस्कर जेरबंद

By नरेश डोंगरे | Updated: March 23, 2024 21:19 IST

Nagpur News: रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ट्रेन नंबर २०८६१ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये 'ऑपरेशन नार्कोस' राबवून १० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी गांजाची तस्करी करणाऱ्या बिहारमधील एका आरोपीलाही आरपीएफने ताब्यात घेतले.

- नरेश डोंगरे नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ट्रेन नंबर २०८६१ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये 'ऑपरेशन नार्कोस' राबवून १० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी गांजाची तस्करी करणाऱ्या बिहारमधील एका आरोपीलाही आरपीएफने ताब्यात घेतले. राजेशकुमार कृष्णदेव मंडल (वय ३६) असे अटकेतील गांजा तस्कराचे नाव असून तो भागलपूर (बिहार) जिल्ह्यातील नारायणपूरचा रहिवासी आहे.

सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफचे पथक पूरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये ऑपरेशन नार्कोस अंतर्गत झाडाझडती घेत होते. ही गाडी शुक्रवारी भंडारा स्थानकावरून नागपूरकडे निघाल्यानंतर जनरल डब्यात एक व्यक्ती संशयास्पद वर्तन करीत असल्याचे आरपीएफच्या जवानांना जाणवले. त्यामुळे आरपीएफने त्याच्या सीटखाली तपासणी केली असता दोन बॅग आढळल्या. त्या बाहेर काढल्या असता बॅगमधून उग्र दर्प आला. त्यामुळे आरपीएफच्या पथकाने पंचासमक्ष त्या उघडल्या असता त्यात गांजाचे पॅकेट आढळले. आरोपी राजेश या गांजाचे पार्सल असलेल्या बॅग घेऊन पूरी येथून रेल्वेत बसला होता. तो जळगावला जाणार असल्याचे त्याच्या जवळ आढळलेल्या तिकिटमधून स्पष्ट झाले. त्यामुळे नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकावर गाडी येताच आरोपीला खाली उतरवून त्याची कसून चाैकशी करण्यात आली. तो गांजाची खेप जळगावला पोहचवणार होता, हे स्पष्ट होताच शुक्रवारी सायंकाळी त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले. कागदोपत्री कारवाई करून आरोपी राजेश मंडलला रेल्वे पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय एस. ए. राव, एएसआय अजय चाैबे, के. के. निकोड, कर्मचारी जी. आर. मडावी, व्ही. एस. पटले, डी. एन. यादव तसेच सुधाकर बोरकर यांनी ही कारवाई केली. लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तबविशेष म्हणजे, लोकमतने शनिवारच्या अंकात रेल्वेतून गांजा, दारू, भांगेसह अंमली पदार्थाची मोठी तस्करी होत असल्याचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले. या कारवाईमुळे पुन्हा एकदा लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २,०४,३२० रुपये आहे. अशा प्रकारे कुणी अंमली पदार्थांची वाहतूक करीत असेल तर तातडीने आरपीएफ किंवा जीआरपीला किंवा हेल्पलाइन नंबर १३९ वर कॉल करून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी