शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यात मानसशास्त्राची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST

श्रेयस होले नागपूर : कोविड लॉकडाऊननंतर शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहर सायबर सेल सायबर गुन्हेगारांविरुद्ध ...

श्रेयस होले

नागपूर : कोविड लॉकडाऊननंतर शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहर सायबर सेल सायबर गुन्हेगारांविरुद्ध सक्रियपणे काम करीत आहे आणि काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टोळ्यांना अलीकडेच पोलिसांनी पकडले आहे.

सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अशोक बागुल यांनी लोकमतशी चर्चेदरम्यान सायबर गुन्हेगारीत वाढ होण्यामागील काही प्रमुख कारणे आणि ते रोखण्यासाठी काय केले जाऊ शकते, यावर माहिती दिली. नियमित गुन्ह्यांची सायबर गुन्ह्यांशी तुलना करणे चुकीचे ठरेल. माझ्या अभ्यासापर्यंत ९९ टक्के सायबर गुन्हे टाळण्यासारखे असतात. ते लोकांच्या अज्ञानामुळे घडतात. अधिक महत्त्वाची बाब म्हणजे, लोक विविध माध्यमे आणि पोलीस खात्यामार्फत सायबर गुन्ह्यांविषयी बरीच माहिती मिळवूनही प्रमाणित नेट बँकिंग प्रोटोकॉल आणि इतर ऑनलाईन सेफ्टीबद्दल स्वत:ला शिक्षित करण्यास तयार नसतात.

बागुल म्हणाले, सायबर गुन्ह्यांमध्ये मानसशास्त्रज्ञ मोठी भूमिका बजावते. केवळ शिक्षित लोकच सायबर गुन्हे करू शकतात. बऱ्याच घटनांमध्ये पीडित लोकही सुशिक्षित असतात. एक सुशिक्षित व्यक्ती विनाकारण गुन्हा करीत नाही. सायबर गुन्हेगार सहसा बळी पडलेल्यांसोबत मानसशास्त्राने खेळतात. ते भीती वा लोभ हत्यार म्हणून वापरतात. ते बऱ्याचदा पीडितांना सांगतात की, त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे जिंकले आहेत किंवा त्यांच्या बँक खात्यात काहीतरी चूक झाली आहे. लोभामुळे किंवा भीतीमुळे लोक कोणाशीही वाद न घालता गंभीर माहिती देतात.

आम्हाला सायबर गुन्हेगारांचे मानसशास्त्रही समजले पाहिजे. लोकांना माहिती नसते; पण सायबर गुन्हेगार मोठ्या संख्येने अल्पवयीन असतात. त्यांना आपण काय करीत आहोत आणि हा एक गंभीर गुन्हा आहे, हेसुद्धा माहीत नसते. कोविड लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेले काही सुशिक्षित तरुण केवळ बेरोजगारीमुळे सायबर गुन्हेगार बनले आहेत. काही गुन्हेगार केवळ लोभासाठी जाणूनबुजून असे गुन्हे करतात. परंतु, आम्ही अल्पवयीन आणि बेरोजगार तरुणांना योग्य समुपदेशन केल्यास सायबर गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात मदत होईल.

बागुल म्हणाले, सायबर सेल सर्व प्रकारच्या सायबर गुन्हेगारी कारवाया थांबविण्यास कटिबद्ध आहे. परंतु जागरूक नागरिकांनी अज्ञात कॉलरसोबत संवेदनशीन माहिती सामायिक करू नये किंवा स्पॅम मेल किंवा संदेशांना उत्तर देऊ नये. हे शक्य झाल्यास सायबर गुन्हेगारीवर आळा येऊ शकेल.