शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा रस्त्यांना ७० कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 21:33 IST

नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्ह्यातील रस्त्यांना व पुलांना बसला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने ७० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

ठळक मुद्दे शासनाकडे पाठविला दुरुस्तीचा प्रस्ताव : ५७० किलोमीटरचे रस्ते नादुरुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्ह्यातील रस्त्यांना व पुलांना बसला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने ७० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.यावर्षी जिल्ह्यात पाऊस चांगलाच बरसला आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. जवळपास ३० हजार हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले. पुरामुळे ६१ गावे बाधित झाली असून, त्यात २८,१०४ नागरिकांचे नुकसान झाले. पुरामुळे १,६०२ जनावरे मृत्यू पावले तर ७,७६५ घरांची पडझड झाली. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांनाही चांगलेच झोडपून काढले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यांचा आढावा घेतला असता, जिल्ह्यातील २८० रस्त्यांची ५६९.२२ किलोमीटरची वाट लागली. मोऱ्या (पूल) १०६ क्षतिग्रस्त झाले. नागपूर तालुक्यातील ८३ किलोमीटरचे रस्ते खराब झाले. तर भिवापूर तालुक्यातील २२ पूल क्षतिग्रस्त झाले. पारशिवनी तालुक्यातील एक पुल पुरामुळे चक्क वाहूनगेला. त्यामुळे अजूनही या रस्त्यावरील आवागमन थांबले आहे. मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून बांधकाम विभागाने दुरुस्तीसाठी शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर