शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

हाही बंद, तोही बंद, सांगा आता जायचे कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:25 IST

विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचून वर्ष लोटले, आता पंचशीलही पूल खचला

नागपूर : शहराचे हृदयस्थळ असलेला सीताबर्डी, रामदासपेठ या परिसरातील नागनदीवरील पुलांमुळे वाहतुकीला फटका बसत आहे. विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचून वर्ष लोटले. पण, अजूनही त्याचे बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे रामदासपेठ व कॅनॉल रोडवरील वाहतूक अनेक महिन्यांपासून बंद आहे.

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने पंचशील चौकातील पूल खचल्यामुळे झाशीची राणी चौक ते पंचशील चौकादरम्यानचा रस्ताही बंद आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून, रामदासपेठेतील गल्लीबोळीत वाहतुकीचा ताण वाढला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचला होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये मे. सनी इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीला १२ महिन्यात पूल पूर्ण करून देण्यासाठी ८,०३,५३,५६४ रुपयांचे कंत्राट दिले होते.

लोकमतच्या पथकाने प्रत्यक्ष जाऊन पुलाच्या बांधकामाचा आढावा घेतला असता लक्षात आले की, अजूनही ५० टक्केपेक्षा जास्त काम शिल्लक आहे. या पुलाच्या बांधकामामुळे रामदासपेठेतून महाराजबागकडे जाणारी वाहतूक गल्लीबोळीतून वळविली आहे. पंचशील चौकाकडून सेंट्रल मॉलकडे जाणाऱ्या कॅनॉल रोडवरची वाहतूकही बंद केली आहे. त्यामुळे वाहतुकीचा लोंढा रामदासपेठेतून वळविण्यात आला आहे. रामदासपेठवासीयांना वाढत्या वाहतुकीचा त्रास असहाय्य झाला आहे. त्यातच रामदासपेठेतील रस्तेही खराब आहेत. मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहेत. वर्षभरापासून वाहनचालक व रामदासपेठवासीयांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

उड्डाणपूल एकमेव पर्याय

वर्धा रोडवरून येणाऱ्या वाहनांना सीताबर्डीत जाण्यासाठी उड्डाणपूल हा एकमेव पर्याय आहे. अन्यथा धंतोली पोलिस स्टेशन मार्गाने आनंद टॉकीज होत सीताबर्डीत जावे लागत आहे. बांधकामासाठी रस्ते ब्लॉक केल्याने धंतोली, रामदासपेठ, सीताबर्डी भागात वाहतूक प्रचंड वाढली आहे.

वाहनचालकांच्या खिशाला भुर्दंड

विद्यापीठ ग्रंथालयाजवळील पुलाचे काम संथगतीने सुरु असल्याने आणि पंचशीलजवळील पूल खचल्याने नागरिकांना फेरा मारून जावे लागत आहे. अतिरिक्त पेट्रोलच्या खर्चामुळे नागरिकांच्या खिशावर भुर्दंड पडत आहे. सिव्हिल लाइन्स परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांसाठी हे दोन्ही रस्ते सहज व सोपा होते. आता ये-जा करताना किमान १ किमीचा फेरा मारावा लागत आहे.

रामदासपेठेतील पूल बांधण्यास वर्ष लागू शकते

येत्या दिवाळीपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, कामाची स्थिती बघता, या पुलाच्या पूर्णत्त्वास वर्ष लागू शकते. आता दुसराही पूल खचल्याने तो आणखी किती वर्षे घेईल, असा सवाल नागपूरकरांचा आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसnagpurनागपूर