शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

हाही बंद, तोही बंद, सांगा आता जायचे कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:25 IST

विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचून वर्ष लोटले, आता पंचशीलही पूल खचला

नागपूर : शहराचे हृदयस्थळ असलेला सीताबर्डी, रामदासपेठ या परिसरातील नागनदीवरील पुलांमुळे वाहतुकीला फटका बसत आहे. विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचून वर्ष लोटले. पण, अजूनही त्याचे बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे रामदासपेठ व कॅनॉल रोडवरील वाहतूक अनेक महिन्यांपासून बंद आहे.

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने पंचशील चौकातील पूल खचल्यामुळे झाशीची राणी चौक ते पंचशील चौकादरम्यानचा रस्ताही बंद आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून, रामदासपेठेतील गल्लीबोळीत वाहतुकीचा ताण वाढला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचला होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये मे. सनी इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीला १२ महिन्यात पूल पूर्ण करून देण्यासाठी ८,०३,५३,५६४ रुपयांचे कंत्राट दिले होते.

लोकमतच्या पथकाने प्रत्यक्ष जाऊन पुलाच्या बांधकामाचा आढावा घेतला असता लक्षात आले की, अजूनही ५० टक्केपेक्षा जास्त काम शिल्लक आहे. या पुलाच्या बांधकामामुळे रामदासपेठेतून महाराजबागकडे जाणारी वाहतूक गल्लीबोळीतून वळविली आहे. पंचशील चौकाकडून सेंट्रल मॉलकडे जाणाऱ्या कॅनॉल रोडवरची वाहतूकही बंद केली आहे. त्यामुळे वाहतुकीचा लोंढा रामदासपेठेतून वळविण्यात आला आहे. रामदासपेठवासीयांना वाढत्या वाहतुकीचा त्रास असहाय्य झाला आहे. त्यातच रामदासपेठेतील रस्तेही खराब आहेत. मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहेत. वर्षभरापासून वाहनचालक व रामदासपेठवासीयांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

उड्डाणपूल एकमेव पर्याय

वर्धा रोडवरून येणाऱ्या वाहनांना सीताबर्डीत जाण्यासाठी उड्डाणपूल हा एकमेव पर्याय आहे. अन्यथा धंतोली पोलिस स्टेशन मार्गाने आनंद टॉकीज होत सीताबर्डीत जावे लागत आहे. बांधकामासाठी रस्ते ब्लॉक केल्याने धंतोली, रामदासपेठ, सीताबर्डी भागात वाहतूक प्रचंड वाढली आहे.

वाहनचालकांच्या खिशाला भुर्दंड

विद्यापीठ ग्रंथालयाजवळील पुलाचे काम संथगतीने सुरु असल्याने आणि पंचशीलजवळील पूल खचल्याने नागरिकांना फेरा मारून जावे लागत आहे. अतिरिक्त पेट्रोलच्या खर्चामुळे नागरिकांच्या खिशावर भुर्दंड पडत आहे. सिव्हिल लाइन्स परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांसाठी हे दोन्ही रस्ते सहज व सोपा होते. आता ये-जा करताना किमान १ किमीचा फेरा मारावा लागत आहे.

रामदासपेठेतील पूल बांधण्यास वर्ष लागू शकते

येत्या दिवाळीपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, कामाची स्थिती बघता, या पुलाच्या पूर्णत्त्वास वर्ष लागू शकते. आता दुसराही पूल खचल्याने तो आणखी किती वर्षे घेईल, असा सवाल नागपूरकरांचा आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसnagpurनागपूर