शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

हाही बंद, तोही बंद, सांगा आता जायचे कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:25 IST

विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचून वर्ष लोटले, आता पंचशीलही पूल खचला

नागपूर : शहराचे हृदयस्थळ असलेला सीताबर्डी, रामदासपेठ या परिसरातील नागनदीवरील पुलांमुळे वाहतुकीला फटका बसत आहे. विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचून वर्ष लोटले. पण, अजूनही त्याचे बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे रामदासपेठ व कॅनॉल रोडवरील वाहतूक अनेक महिन्यांपासून बंद आहे.

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने पंचशील चौकातील पूल खचल्यामुळे झाशीची राणी चौक ते पंचशील चौकादरम्यानचा रस्ताही बंद आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून, रामदासपेठेतील गल्लीबोळीत वाहतुकीचा ताण वाढला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचला होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये मे. सनी इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीला १२ महिन्यात पूल पूर्ण करून देण्यासाठी ८,०३,५३,५६४ रुपयांचे कंत्राट दिले होते.

लोकमतच्या पथकाने प्रत्यक्ष जाऊन पुलाच्या बांधकामाचा आढावा घेतला असता लक्षात आले की, अजूनही ५० टक्केपेक्षा जास्त काम शिल्लक आहे. या पुलाच्या बांधकामामुळे रामदासपेठेतून महाराजबागकडे जाणारी वाहतूक गल्लीबोळीतून वळविली आहे. पंचशील चौकाकडून सेंट्रल मॉलकडे जाणाऱ्या कॅनॉल रोडवरची वाहतूकही बंद केली आहे. त्यामुळे वाहतुकीचा लोंढा रामदासपेठेतून वळविण्यात आला आहे. रामदासपेठवासीयांना वाढत्या वाहतुकीचा त्रास असहाय्य झाला आहे. त्यातच रामदासपेठेतील रस्तेही खराब आहेत. मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहेत. वर्षभरापासून वाहनचालक व रामदासपेठवासीयांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

उड्डाणपूल एकमेव पर्याय

वर्धा रोडवरून येणाऱ्या वाहनांना सीताबर्डीत जाण्यासाठी उड्डाणपूल हा एकमेव पर्याय आहे. अन्यथा धंतोली पोलिस स्टेशन मार्गाने आनंद टॉकीज होत सीताबर्डीत जावे लागत आहे. बांधकामासाठी रस्ते ब्लॉक केल्याने धंतोली, रामदासपेठ, सीताबर्डी भागात वाहतूक प्रचंड वाढली आहे.

वाहनचालकांच्या खिशाला भुर्दंड

विद्यापीठ ग्रंथालयाजवळील पुलाचे काम संथगतीने सुरु असल्याने आणि पंचशीलजवळील पूल खचल्याने नागरिकांना फेरा मारून जावे लागत आहे. अतिरिक्त पेट्रोलच्या खर्चामुळे नागरिकांच्या खिशावर भुर्दंड पडत आहे. सिव्हिल लाइन्स परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांसाठी हे दोन्ही रस्ते सहज व सोपा होते. आता ये-जा करताना किमान १ किमीचा फेरा मारावा लागत आहे.

रामदासपेठेतील पूल बांधण्यास वर्ष लागू शकते

येत्या दिवाळीपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, कामाची स्थिती बघता, या पुलाच्या पूर्णत्त्वास वर्ष लागू शकते. आता दुसराही पूल खचल्याने तो आणखी किती वर्षे घेईल, असा सवाल नागपूरकरांचा आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसnagpurनागपूर