शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

गोड बोलण्यापेक्षा समोरच्याची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:25 AM

मकरसंक्रांतीचा गोडवा आयुष्यात बाणण्यासाठी काय करायला हवे हे, लोकमतच्या गुडबोला.. गोड बोला या सदरात सांगत आहेत नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्रत्येकाशी चांगले बोलावे, गोड बोलावे असे नेहमीच सांगितले जाते. ते एकप्रकारे बरोबरही आहे. परंतु एखादी व्यक्ती खूप अडचणीत असेल, तेव्हा त्याच्याशी खूप गोड बोलूनही त्याची समस्या सुटत नसेल तर त्याचा काय फायदा? याऐवजी त्या व्यक्तीची समस्या सोडविणे आवश्यक आहे. त्याची समस्या सोडवणे हे गोड बोलण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे ठरेल, असे मला वाटते.झ्याकडे अडचण घेऊन येणाऱ्या व्यक्तीची नेमकी समस्या काय आहे? ते नीट समजून ती सोडवण्याचा प्रयत्न मी करतो. समोरच्या व्यक्तीची समस्या सुटेल, असा सल्ला त्याला देतो. माझ्या दृष्टीने माझ्याकडे समस्या घेऊन येणाºया व्यक्तीची समस्या सोडवणे हे गोड बोलण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.जिल्हाधिकारी असल्याने दररोज शेकडो लोक भेटायला येतात. आपण सर्वांसोबतच सामान्यपणे चांगलेच बोलत असतो. भेटायला येणारे नागरिक हे आपापल्या अडचणी घेऊन येत असतात. तेव्हा त्यांच्याशी नुसतेच गोड बोलून कसे होणार? त्यांची समस्याही सुटायला हवी ना. समस्या सुटत नसेल आणि केवळ गोड बोलून त्या व्यक्तीची बोळवण केली जात असेल तर त्या गोड बोलण्यालाही काहीही अर्थ नाही. त्यामुळे माझा नेहमीच असा प्रयत्न राहतो की, समोरची व्यक्ती ही पूर्ण समाधानी व्हावी. त्याची जी काही समस्या असेल ती सोडविली जावी. यासाठी त्याला योग्य सल्ला देणे. समजावून सांगणे आवश्यक आहे.आपल्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असावाच. परंतु त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखत असेल तर त्याच्या चांगल्यासाठीच आपण ते सांगत आहोत, तसे त्याला समजावूनही सांगा. म्हणजे त्यालाही फार बरे वाटेल. गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट