शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कळमेश्वरवासीयांना प्यावे लागते दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:19 IST

नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह : पिण्यायोग्य असल्याचा नगरपालिकेचा दावा

आशिष सौदागर लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : शहराला नगरपालिका प्रशासनाच्यावतीने नियमित पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असून, नागरिकांना तेच पिण्यासाठी वापरावे लागते. या पाण्यामुळे नागरिकांना आजार होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली असली तरी ते पिण्यायोग्य असल्याचा दावा नगरपालिका प्रशासनाने केला आहे.

पाणीटंचाई असल्याने कळमेश्वर ब्राह्मणी शहराला आधीच तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना जुलाब, पोटदुखी, ओकाऱ्या, मळमळ होणे अशी लक्षणे दिसायला लागली आहेत. लहान मुले वयोवृद्धांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. काही नागरिकांनी या पाण्याचे नमुने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखविले. मात्र, अधिकाऱ्यांनी ते पाणी शुद्ध असल्याचे सांगून पिण्यायोग्य असल्याचा दावा केला आहे. काही नागरिकांनी शहरातील विविध भागातील पाण्याचे नमुने घेऊन ते नागपूर शहरातील वेगवेगळ्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. या नमुन्यांच्या दोन चाचण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जलशुद्धीकरण संयंत्र कुचकामीशहराला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलशुद्धीकरण संयंत्र बसविले आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. याच जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांच्या घरांमध्ये येत असलेल्या नळाला पिवळसर व गढूळ पाणी येत आहे. या पाण्याची हलकी दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

स्कॉडा प्रणाली विकसित

  • नगरपालिका पाणीपुरवठ्यावर दरवर्षी एकूण एकूण १४ कोटी रुपयांचा खर्च करते. शहराला इटनगोटी जलाशय, गोवरी व कळंबी येथील बोअरवेल्समधून पाणीपुरवठा केला जातो.
  • अशुद्ध पाण्याचा उपसा, जलशुद्धीकरणाचा अभाव, पाणीपुरवठा व्यवस्थापनातील चुका, पाण्याच्या टाक्यांची साफसफाई, पाणीपुरवठा विभागातील अपुरे मनुष्यबळ तसेच दुरुस्ती कामांना होणारी दिरंगाई यामुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.
  • शहराला समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा म्हणून स्कॉडा प्रणाली विकसित केली आहे.

"इटनगोटी जलाशयातील पाण्याची पातळी खोल गेल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे. पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुरटी व ब्लिचिंग पावडरचा वापर वाढविण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरणावर भर दिला जात आहे. दोन दिवसात ही समस्या निकाली निघून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल."

- आकाश सुरडकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, कळमेश्वर-ब्राम्हणी

टॅग्स :nagpurनागपूरwater pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाई