शहरं
Join us  
Trending Stories
1
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
2
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
3
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
4
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
5
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
6
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
7
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
8
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
9
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
10
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
11
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
12
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
13
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
14
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
15
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
16
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
17
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
18
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
19
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
20
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Daily Top 2Weekly Top 5

कळमेश्वरवासीयांना प्यावे लागते दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:19 IST

नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह : पिण्यायोग्य असल्याचा नगरपालिकेचा दावा

आशिष सौदागर लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : शहराला नगरपालिका प्रशासनाच्यावतीने नियमित पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असून, नागरिकांना तेच पिण्यासाठी वापरावे लागते. या पाण्यामुळे नागरिकांना आजार होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली असली तरी ते पिण्यायोग्य असल्याचा दावा नगरपालिका प्रशासनाने केला आहे.

पाणीटंचाई असल्याने कळमेश्वर ब्राह्मणी शहराला आधीच तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना जुलाब, पोटदुखी, ओकाऱ्या, मळमळ होणे अशी लक्षणे दिसायला लागली आहेत. लहान मुले वयोवृद्धांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. काही नागरिकांनी या पाण्याचे नमुने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखविले. मात्र, अधिकाऱ्यांनी ते पाणी शुद्ध असल्याचे सांगून पिण्यायोग्य असल्याचा दावा केला आहे. काही नागरिकांनी शहरातील विविध भागातील पाण्याचे नमुने घेऊन ते नागपूर शहरातील वेगवेगळ्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. या नमुन्यांच्या दोन चाचण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जलशुद्धीकरण संयंत्र कुचकामीशहराला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलशुद्धीकरण संयंत्र बसविले आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. याच जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांच्या घरांमध्ये येत असलेल्या नळाला पिवळसर व गढूळ पाणी येत आहे. या पाण्याची हलकी दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

स्कॉडा प्रणाली विकसित

  • नगरपालिका पाणीपुरवठ्यावर दरवर्षी एकूण एकूण १४ कोटी रुपयांचा खर्च करते. शहराला इटनगोटी जलाशय, गोवरी व कळंबी येथील बोअरवेल्समधून पाणीपुरवठा केला जातो.
  • अशुद्ध पाण्याचा उपसा, जलशुद्धीकरणाचा अभाव, पाणीपुरवठा व्यवस्थापनातील चुका, पाण्याच्या टाक्यांची साफसफाई, पाणीपुरवठा विभागातील अपुरे मनुष्यबळ तसेच दुरुस्ती कामांना होणारी दिरंगाई यामुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.
  • शहराला समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा म्हणून स्कॉडा प्रणाली विकसित केली आहे.

"इटनगोटी जलाशयातील पाण्याची पातळी खोल गेल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे. पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुरटी व ब्लिचिंग पावडरचा वापर वाढविण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरणावर भर दिला जात आहे. दोन दिवसात ही समस्या निकाली निघून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल."

- आकाश सुरडकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, कळमेश्वर-ब्राम्हणी

टॅग्स :nagpurनागपूरwater pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाई