शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

कळमेश्वरवासीयांना प्यावे लागते दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:19 IST

नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह : पिण्यायोग्य असल्याचा नगरपालिकेचा दावा

आशिष सौदागर लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : शहराला नगरपालिका प्रशासनाच्यावतीने नियमित पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असून, नागरिकांना तेच पिण्यासाठी वापरावे लागते. या पाण्यामुळे नागरिकांना आजार होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली असली तरी ते पिण्यायोग्य असल्याचा दावा नगरपालिका प्रशासनाने केला आहे.

पाणीटंचाई असल्याने कळमेश्वर ब्राह्मणी शहराला आधीच तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना जुलाब, पोटदुखी, ओकाऱ्या, मळमळ होणे अशी लक्षणे दिसायला लागली आहेत. लहान मुले वयोवृद्धांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. काही नागरिकांनी या पाण्याचे नमुने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखविले. मात्र, अधिकाऱ्यांनी ते पाणी शुद्ध असल्याचे सांगून पिण्यायोग्य असल्याचा दावा केला आहे. काही नागरिकांनी शहरातील विविध भागातील पाण्याचे नमुने घेऊन ते नागपूर शहरातील वेगवेगळ्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. या नमुन्यांच्या दोन चाचण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जलशुद्धीकरण संयंत्र कुचकामीशहराला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलशुद्धीकरण संयंत्र बसविले आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. याच जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांच्या घरांमध्ये येत असलेल्या नळाला पिवळसर व गढूळ पाणी येत आहे. या पाण्याची हलकी दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

स्कॉडा प्रणाली विकसित

  • नगरपालिका पाणीपुरवठ्यावर दरवर्षी एकूण एकूण १४ कोटी रुपयांचा खर्च करते. शहराला इटनगोटी जलाशय, गोवरी व कळंबी येथील बोअरवेल्समधून पाणीपुरवठा केला जातो.
  • अशुद्ध पाण्याचा उपसा, जलशुद्धीकरणाचा अभाव, पाणीपुरवठा व्यवस्थापनातील चुका, पाण्याच्या टाक्यांची साफसफाई, पाणीपुरवठा विभागातील अपुरे मनुष्यबळ तसेच दुरुस्ती कामांना होणारी दिरंगाई यामुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.
  • शहराला समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा म्हणून स्कॉडा प्रणाली विकसित केली आहे.

"इटनगोटी जलाशयातील पाण्याची पातळी खोल गेल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे. पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुरटी व ब्लिचिंग पावडरचा वापर वाढविण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरणावर भर दिला जात आहे. दोन दिवसात ही समस्या निकाली निघून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल."

- आकाश सुरडकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, कळमेश्वर-ब्राम्हणी

टॅग्स :nagpurनागपूरwater pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाई