शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, अखेर बांगलादेश चीतपट
3
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
4
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
5
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
6
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
7
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
8
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
9
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
10
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
11
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
12
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
13
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
14
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
15
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
16
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
17
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
18
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
19
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
20
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

आठवण निवडणुकीची; कुटुंब नियोजनावर त्यांनी गांधीजींशी घातला वाद

By यदू जोशी | Published: April 13, 2024 1:08 PM

अनसूयाबाईंचे नातू आणि नागपुरातील प्रसिद्ध व्यावसायिक विलास काळेंनी सांगितलेली ही आठवण

यदु जोशी

अनसूयाबाई काळे या तशा विस्मरणात गेलेल्या एका सुसंस्कृत, अभ्यासू राजकारणी महिलेचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. त्या नागपूरच्या दोनवेळा खासदार होत्या. काँग्रेस पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्या आणि प्रखर गांधीवादी. १९५२ आणि १९५७ मध्ये त्या खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यापूर्वी तत्कालीन सी. पी. अँड बेरार प्रांतात त्या विधानसभेवर नामनिर्देशित झाल्या होत्या आणि १९३७ मध्ये याच विधानसभेच्या उपाध्यक्ष होत्या.त्यांचे पती पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातले पण व्यवसायानिमित्त ते नागपुरात आले आणि इथेच त्यांनी प्रोव्हिन्शियल ऑटोमोबाइल कंपनीची स्थापना केली. त्या आधी बर्डी पिक्चर हाऊस (नंतरचे रिजंट टॉकीज) आणि रघुवीर थिएटर्स (नंतरचे नरसिंग टॉकीज) याचे ते भागीदार होते. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून त्यांनी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. प्रत्येक घरातून एक स्वयंसेवक देशासाठी द्या, या महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुरुषोत्तम काळे हे स्वातंत्र्याच्या चळवळीत जाणार होते; पण नंतर कुटुंबात असे ठरले की त्यांनी व्यवसाय सांभाळावा आणि पत्नी अनसूयाबाई यांनी चळवळीत जावे आणि तसेच झालेदेखील. 

अनसूयाबाईंचे नातू आणि नागपुरातील प्रसिद्ध व्यावसायिक विलास काळेंनी सांगितलेली ही आठवण. अनसूयाबाई या पुरोगामी विचारांच्या होत्या. कुटुंब नियोजन या विषयावर त्यांनी एकदा थेट महात्मा गांधींशी तात्विक वाद घातला. ‘कुटुंब लहान असावे हे मला मान्य आहे; पण त्यासाठी प्रत्येकाने स्वत:वर नियंत्रण ठेवावे आणि लोकसंख्या वाढू देऊ नये’, असे गांधीजींचे म्हणणे होते; पण लोकसंख्येवर नियंत्रण हे कायद्याने आणावे लागेल, असे अनसूयाबाईंचे म्हणणे होते. सात-आठ मुले जन्माला घालण्याचा मोठा त्रास महिलांना होतो. आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतो, तेव्हा कुटुंब नियोजनाचा कायदा करणे हाच उत्तम पर्याय असल्याचा आग्रह त्यांनी धरला. १९३६ च्या सुमारास घडलेला हा प्रसंग. पुढे १९५२ मध्ये त्या खासदार झाल्या तेव्हा केंद्रीय आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर यांना भेटून त्यांनी कुटुंब नियोजनासाठीचा कायदा आणण्यासाठी पुढाकार घेतला. 

ब्रिटिशांविरुद्ध बंड करणाऱ्या आष्टी, चिमूरमधील तरुणांना फाशीची शिक्षा होऊ नये यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध विविध पातळ्यांवर संघर्ष केला आणि त्यात यशही मिळविले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रिय भाग घेतला. अनसूयाबाईंचे माहेर मूळचे बेळगावचे होते. तेथील नामवंत वकील सदाशिवराव भाटे हे अनसूयाबाईंचे वडील. ते लोकमान्य टिळक यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. बेळगावचा भाटे वाडा आजही सुप्रसिद्ध आहे. या वाड्यात स्वामी विवेकानंद काही दिवस वास्तव्यास होते. अनसूयाबाई १९५७च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फेच पुन्हा नागपुरातून विजयी झाल्या. मात्र, १९५९ मध्ये खासदार असतानाच त्यांचे निधन झाले. त्या ज्या दोन्ही निवडणुका लढल्या व जिंकल्या त्यात त्यांनी केलेला खर्च हा कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीत त्यांच्या खात्यात जमा झालेल्या नफ्यातून वळता करण्यात आला होता. निवडणूक खर्चावर कोणीही शंका घेऊ नये यावर त्यांचा कटाक्ष होता.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४