शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

केंद्राच्या मदतीने सामान्यांना दिलासा : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:48 AM

केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० कोटींच्या विविध योजनांची घोषणा केली. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नागपूर जिल्ह्यातील गरजूंना याचा लाभ होणार असल्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील गरजूंनाही लाभ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या २१ दिवसाच्या बंद (लॉकडाऊन) दरम्यान केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० कोटींच्या विविध योजनांची घोषणा केली. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नागपूर जिल्ह्यातील गरजूंना याचा लाभ होणार असल्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.बावनकुळे म्हणाले, आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, अधिकारी, नर्सेस तसेच स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रति व्यक्ती ५० लाख रुपयांचा विमा केंद्र शासन काढणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत देशातील प्रत्येक गरिबाला ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ आणि १ किलो डाळ आगामी तीन महिने मोफत दिली जाणार आहे. याचा फायदा ८० कोटी जनतेला होईल. शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून २ हजार रुपये पुन्हा खात्यात जमा करण्यात येणार आहेत. हातमजुरी करणाऱ्यांना मनरेगांतर्गत मिळणारा रोजगाराचा दर हा १८२ रुपयांवरून २०२ रुपये करण्यात आला आहे. यामुळे मजुरांना आर्थिक दिलासा मिळेल.तसेच गरीब नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना एक हजार रुपये सानुग्रह अनुदान देऊन केंद्र शासनाने हा वर्गही दुर्लक्षित होऊ दिला नाही. जनधन खातेधारक महिलांना ५०० रुपये प्रतिमहिना आगामी ३ महिनेपर्यंत देण्यात येणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळेल. उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी महिलांना नि:शुल्क गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.लघु उद्योगांना कोणतीही जमानत न घेता २० लाख रुपयांपर्यंत कर्ज केंद्र शासन उपलब्ध करून देणार आहे. संघटित क्षेत्रातील कामगारांच्या भविष्य निधीची रक्कम केंद्र शासन भरणार आहे. तसेच बांधकाम मजुरांसाठी ३१ हजार कोटींची योजना यावेळी घोषित करण्यात आली. गरीब आणि शेतकरी उपेक्षित राहून त्यांची आर्थिक कुचंबणा होणार नाही याची पूर्ण दखल केंद्र शासनाने घेतली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे