शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

सातबारावर पत्नीचे नाव नोंदवा शून्य खर्चात; काय आहे योजना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:46 IST

Nagpur : महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'लक्ष्मीमुक्ती' योजना

नागपूर : राज्य शासनाची 'लक्ष्मीमुक्ती योजना' ही महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. यात शेतकऱ्याच्या पत्नीला शेतजमिनीचा कायदेशीर सहहक्क मिळवून देण्यात येतो. पारंपरिकपणे जमिनीची नोंदणी फक्त पतीच्या नावावर असते, पण या योजनेद्वारे पत्नीचे नावही सातबारा उताऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून नमूद केले जाते आणि यासाठी कुठलाही खर्च येत नाही, हे विशेष.

ना नोंदणी शुल्क, ना मुद्रांक शुल्कया योजनेंतर्गत पतीच्या नावे असलेल्या शेतजमिनीत पत्नीचे नाव कायदेशीर आणि अधिकृतरित्या नोंदवले जाते. विशेष बाब म्हणजे या प्रक्रियेसाठी कुठलेही नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क किंवा इतर कोणताही आर्थिक बोजा लावला जात नाही. ही नोंदणी पूर्णपणे विनामूल्य असते. 

तलाठ्यांकडे अर्ज करावा लागणार

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह पती-पत्नींनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो.
  • तलाठी त्याची चौकशी करून आवश्यक ती प्रक्रिया सुरू करतो. यामध्ये कोणी मध्यस्थ किंवा दलाल आवश्यक नाही, ही प्रक्रिया थेट व पारदर्शक आहे. 

कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागणार ?

  • पती व पत्नीचा संयुक्त अर्ज
  • सातबारा उतारा व ८-अ उतारा
  • आधार कार्डाची प्रत
  • रेशन कार्डाची प्रत
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र-
  • पोलिस पाटील यांच्याकडून अधिकृत पत्नी असल्याचा दाखला

बचत गटांतून कर्जपुरवठा करता येणारही योजना ग्रामीण महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने फार महत्त्वाची ठरणार आहे. कारण जमिनीचा सहहक्क मिळाल्यास महिला आर्थिक निर्णय प्रक्रियेत अधिक सक्रिय होतील, बँक कर्ज, अनुदान, विमा योजना, कृषी यंत्रांसाठीच्या योजनांचा लाभघेण्यासाठीही त्या पात्र ठरतील.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'लक्ष्मीमुक्ती' योजना'लक्ष्मीमुक्ती योजना फक्त कायदेशीर अधिकार देण्यापुरती मर्यादित नाही, तर तिच्यामागे महिलांना आर्थिक निर्णयांमध्ये समान भागीदारी देण्याचा उद्देश आहे. आजही अनेक ग्रामीण भागांमध्ये महिलांच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसते, परिणामी त्यांना बँकिंग, विमा, कर्ज यांसारख्या सुविधांपासून वंचित राहावे लागते; मात्र 'लक्ष्मीमुक्ती' योजनेमुळे त्यांच्या नावावर जमिनीचा हक्क मिळत असल्याने त्या स्वतःचे अस्तित्व, स्वाभिमान आणि सक्षमता सिद्ध करू शकतात. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाnagpurनागपूरfarmingशेतीFarmerशेतकरी