शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

डॉक्टरांवरील हल्ले, डॉक्टर-रुग्ण बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब : शिवकुमार उत्तुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:21 IST

डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये संवादाची गरज आहे. परंतु हा संवादच डॉक्टर आणि रुग्णामध्ये होत नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत, त्याची माहिती मिळत नाही. डॉक्टर आपल्या रुग्णाला पाहत नाहीत, हा त्यांचा गैरसमज संवादातून दूर करणे सहज शक्य आहे. डॉक्टरांवरील हल्ले हे ‘डॉक्टर-रुग्ण’ बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे, असे मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआयएमएतर्फे ‘डॉक्टर्स डे’ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये संवादाची गरज आहे. परंतु हा संवादच डॉक्टर आणि रुग्णामध्ये होत नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत, त्याची माहिती मिळत नाही. डॉक्टर आपल्या रुग्णाला पाहत नाहीत, हा त्यांचा गैरसमज संवादातून दूर करणे सहज शक्य आहे. डॉक्टरांवरील हल्ले हे ‘डॉक्टर-रुग्ण’ बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे, असे मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी व्यक्त केले.इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेद्वारे सोमवारी ‘डॉक्टर्स डे’निमित्त ‘डॉक्टरांवरील वाढते हल्ले’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याच कार्यक्रमात वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव होते. मंचावर आयएमए अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला व सचिव डॉ. मंजुषा गिरी उपस्थित होत्या. संचालन डॉ. अनिरुद्ध देवके व डॉ. अर्चना देशपांडे यांनी केले.कायदे डॉक्टरांच्या विरुद्ध नाहीतवैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा असा समज आहे की, सर्व कायदे डॉक्टरांच्या विरुद्ध आहेत, मात्र वस्तुस्थिती अशी नाही. त्यामुळे जर डॉक्टरांनी चुकीचे काही केले नसेल तर तक्रारीस घाबरण्याचे काहीएक कारण नाही, असेही सांगत डॉ. उत्तुरे यांनी डॉक्टर व रुग्णांकडून कायद्याचे पालन होणे आवश्यक असल्याचेही सांगितले.कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ता यांना सन्मानित करण्यात आले. यात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. अरुण आमले, डॉ. नूतन देव, डॉ. जीवन वेदी, डॉ. अमित समर्थ, डॉ. काजल मित्रा, डॉ. दिवाकर भोयर, नागपूर सीआयडीचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पत्रकार आनंद कस्तुरे व सामाजिक कार्यकर्ता मधुभाऊ बारापत्रे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाºया आयएमए सदस्यांच्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला.संस्थांना मूर्तरूप देणारी माणसे मोठी व्हावीत-डॉ. कोल्हेएखाद्या संस्थेत उमेदीची २० ते २५ वर्षे दिल्यानंतर नाईलाजस्तव त्यास संस्था सोडावी लागते. हे मी इंटर्नशीपदरम्यान ३७ संस्थांच्या अभ्यासावरून सांगतो. त्यामुळे संस्था मोठी झाली तरी ती व्यक्ती मात्र संपून जाते. संस्थांना मूर्तरूप देणारी माणसे मोठी होणे आवश्यक असते. म्हणूनच कुठलीही संस्था स्थापित न करता स्वतंत्र काम करण्याचा निर्णय घेतला, असे मत पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले.‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने डॉ. प्रकाश देव व डॉ. संजय देशपांडे यांनी डॉ. कोल्हेंची मुलाखत घेतली. यावेळी ते मनमोकळेपणाने बोलत होते.डॉ. स्मिता कोल्हेंचे सेवाकार्यात हातभार, या प्रश्नावर डॉ. कोल्हे म्हणाले की, स्मिताने वकिलीचा अभ्यास केला आहे, शिवाय ती होमिओपॅथिक डॉक्टर आहे. तिने रोजगार, वीज, रस्ता, पाणी, शिक्षण हे सगळे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. केवळ तिच्यामुळे आम्ही त्या भागातील प्रश्न सोडवू शकलो. स्मिता नसती तर मी केवळ वैद्यकीय सेवाच दिली असती, असे सांगत त्यांनी डॉ. स्मिता कोल्हे यांच्या कार्यातील योगदान स्पष्ट केले. सेवाकार्यात समाजाचे नेहमीच पाठबळ मिळते, असेही सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर