शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

डॉक्टरांवरील हल्ले, डॉक्टर-रुग्ण बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब : शिवकुमार उत्तुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:21 IST

डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये संवादाची गरज आहे. परंतु हा संवादच डॉक्टर आणि रुग्णामध्ये होत नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत, त्याची माहिती मिळत नाही. डॉक्टर आपल्या रुग्णाला पाहत नाहीत, हा त्यांचा गैरसमज संवादातून दूर करणे सहज शक्य आहे. डॉक्टरांवरील हल्ले हे ‘डॉक्टर-रुग्ण’ बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे, असे मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआयएमएतर्फे ‘डॉक्टर्स डे’ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये संवादाची गरज आहे. परंतु हा संवादच डॉक्टर आणि रुग्णामध्ये होत नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत, त्याची माहिती मिळत नाही. डॉक्टर आपल्या रुग्णाला पाहत नाहीत, हा त्यांचा गैरसमज संवादातून दूर करणे सहज शक्य आहे. डॉक्टरांवरील हल्ले हे ‘डॉक्टर-रुग्ण’ बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे, असे मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी व्यक्त केले.इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेद्वारे सोमवारी ‘डॉक्टर्स डे’निमित्त ‘डॉक्टरांवरील वाढते हल्ले’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याच कार्यक्रमात वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव होते. मंचावर आयएमए अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला व सचिव डॉ. मंजुषा गिरी उपस्थित होत्या. संचालन डॉ. अनिरुद्ध देवके व डॉ. अर्चना देशपांडे यांनी केले.कायदे डॉक्टरांच्या विरुद्ध नाहीतवैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा असा समज आहे की, सर्व कायदे डॉक्टरांच्या विरुद्ध आहेत, मात्र वस्तुस्थिती अशी नाही. त्यामुळे जर डॉक्टरांनी चुकीचे काही केले नसेल तर तक्रारीस घाबरण्याचे काहीएक कारण नाही, असेही सांगत डॉ. उत्तुरे यांनी डॉक्टर व रुग्णांकडून कायद्याचे पालन होणे आवश्यक असल्याचेही सांगितले.कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ता यांना सन्मानित करण्यात आले. यात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. अरुण आमले, डॉ. नूतन देव, डॉ. जीवन वेदी, डॉ. अमित समर्थ, डॉ. काजल मित्रा, डॉ. दिवाकर भोयर, नागपूर सीआयडीचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पत्रकार आनंद कस्तुरे व सामाजिक कार्यकर्ता मधुभाऊ बारापत्रे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाºया आयएमए सदस्यांच्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला.संस्थांना मूर्तरूप देणारी माणसे मोठी व्हावीत-डॉ. कोल्हेएखाद्या संस्थेत उमेदीची २० ते २५ वर्षे दिल्यानंतर नाईलाजस्तव त्यास संस्था सोडावी लागते. हे मी इंटर्नशीपदरम्यान ३७ संस्थांच्या अभ्यासावरून सांगतो. त्यामुळे संस्था मोठी झाली तरी ती व्यक्ती मात्र संपून जाते. संस्थांना मूर्तरूप देणारी माणसे मोठी होणे आवश्यक असते. म्हणूनच कुठलीही संस्था स्थापित न करता स्वतंत्र काम करण्याचा निर्णय घेतला, असे मत पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले.‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने डॉ. प्रकाश देव व डॉ. संजय देशपांडे यांनी डॉ. कोल्हेंची मुलाखत घेतली. यावेळी ते मनमोकळेपणाने बोलत होते.डॉ. स्मिता कोल्हेंचे सेवाकार्यात हातभार, या प्रश्नावर डॉ. कोल्हे म्हणाले की, स्मिताने वकिलीचा अभ्यास केला आहे, शिवाय ती होमिओपॅथिक डॉक्टर आहे. तिने रोजगार, वीज, रस्ता, पाणी, शिक्षण हे सगळे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. केवळ तिच्यामुळे आम्ही त्या भागातील प्रश्न सोडवू शकलो. स्मिता नसती तर मी केवळ वैद्यकीय सेवाच दिली असती, असे सांगत त्यांनी डॉ. स्मिता कोल्हे यांच्या कार्यातील योगदान स्पष्ट केले. सेवाकार्यात समाजाचे नेहमीच पाठबळ मिळते, असेही सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर