शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाची पद भरती बंद

By admin | Updated: August 11, 2016 01:56 IST

प्रशासकीय कामकाजामुळे अडचणीत सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आपल्या निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आठवण आली आहे.

निवृत्त कर्मचारी आले कामावर : राज्यशासनाने नियुक्त्यांवर लावला अंकुश आशिष दुबे नागपूर प्रशासकीय कामकाजामुळे अडचणीत सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आपल्या निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आठवण आली आहे. ठप्प झालेल्या कामकाजाचा निपटारा करण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. आतापर्यंत १५० वरून अधिक सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना ४०० रुपये प्रतिदिन या प्रमाणे नियुक्ती देण्यात आली आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक नियुक्त्या परीक्षा विभागात करण्यात आल्या आहेत. याशिवाय शैक्षणिक विभाग, बीसीयुडी, विद्याशाखा आणि वित्त विभागात सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या रामदासपेठ येथील ग्रंथालयात नियुक्ती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने एक प्रस्ताव पारित केला आहे. येणाऱ्या दिवसात इतर विभागातही सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याची योजना आहे. मागील काही दिवसांपासून परीक्षा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना आठवडाभरानंतर कंत्राटावंर त्याच विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. २००८ मध्ये नव्या आकृतीबंधात विद्यापीठाच्या वर्ग ४ च्या सर्व पदांना गोठविण्यात आले. वर्ग ३ ची ३५० पदे रद्द करण्यात आली. वर्ग १ अंतर्गत येणाऱ्या सहायक कुलसचिव, उपकुलसचिवाच्या पदांची संख्या वाढविण्यात आली होती. नवा आकृतीबंध लागू झाल्यानंतर काही वेळातच राज्य शासनाने नव्या भरती प्रक्रियेवर बंदी घातली. त्यामुळे विद्यापीठातील रिक्त पदांची भरती होऊ शकली नाही. मागील तीन वर्षात प्रत्येक महिन्यात एकूण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत २० टक्के कर्मचारी निवृत्त होत आहेत. यामुळे विद्यापीठावर कामाचा ताण वाढला. आवश्यक अधिकारी नसल्यामुळे एका अधिकाऱ्यावर तीन विभागांची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु लिपीक, वरिष्ठ लिपीक आणि अधीक्षक नसल्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. याचा सर्वात मोठा परिणाम परीक्षा विभाग व शैक्षणिक विभागाच्या कामकाजावर होत आहे. हे पाहून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलविणे सुरू करण्यात आले. या दोन कारणांमुळे घेतले कामावर विद्यापीठ प्रशासनाच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, त्यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. दुसरे कारण म्हणजे विद्यापीठाच्या मते नव्या कर्मचाऱ्यांना कंत्राटावर नियुक्ती दिल्यास त्यांना नियमानुसार वेतन द्यावे लागते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने प्रदीर्घ काम केल्यास तो कायमस्वरूपी नोकरीची मागणी करू शकतो. तो न्यायालयातही जाऊ शकतो. त्यामुळे या बाबी टाळण्यासाठी विद्यापीठाने हा उपाय शोधून काढला आहे. कामकाज सुरळीत करण्याला प्राधान्य विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, शासनाच्या निर्णयानंतर कामकाज चालविणे अवघड झाले होते. कामकाज सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नुकत्याच शासनाने ५० टक्के पदांना भरण्याची परवानगी दिली आहे. ते भरण्याची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल.