शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

विद्यापीठाची पद भरती बंद

By admin | Updated: August 11, 2016 01:56 IST

प्रशासकीय कामकाजामुळे अडचणीत सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आपल्या निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आठवण आली आहे.

निवृत्त कर्मचारी आले कामावर : राज्यशासनाने नियुक्त्यांवर लावला अंकुश आशिष दुबे नागपूर प्रशासकीय कामकाजामुळे अडचणीत सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आपल्या निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आठवण आली आहे. ठप्प झालेल्या कामकाजाचा निपटारा करण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. आतापर्यंत १५० वरून अधिक सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना ४०० रुपये प्रतिदिन या प्रमाणे नियुक्ती देण्यात आली आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक नियुक्त्या परीक्षा विभागात करण्यात आल्या आहेत. याशिवाय शैक्षणिक विभाग, बीसीयुडी, विद्याशाखा आणि वित्त विभागात सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या रामदासपेठ येथील ग्रंथालयात नियुक्ती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने एक प्रस्ताव पारित केला आहे. येणाऱ्या दिवसात इतर विभागातही सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याची योजना आहे. मागील काही दिवसांपासून परीक्षा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना आठवडाभरानंतर कंत्राटावंर त्याच विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. २००८ मध्ये नव्या आकृतीबंधात विद्यापीठाच्या वर्ग ४ च्या सर्व पदांना गोठविण्यात आले. वर्ग ३ ची ३५० पदे रद्द करण्यात आली. वर्ग १ अंतर्गत येणाऱ्या सहायक कुलसचिव, उपकुलसचिवाच्या पदांची संख्या वाढविण्यात आली होती. नवा आकृतीबंध लागू झाल्यानंतर काही वेळातच राज्य शासनाने नव्या भरती प्रक्रियेवर बंदी घातली. त्यामुळे विद्यापीठातील रिक्त पदांची भरती होऊ शकली नाही. मागील तीन वर्षात प्रत्येक महिन्यात एकूण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत २० टक्के कर्मचारी निवृत्त होत आहेत. यामुळे विद्यापीठावर कामाचा ताण वाढला. आवश्यक अधिकारी नसल्यामुळे एका अधिकाऱ्यावर तीन विभागांची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु लिपीक, वरिष्ठ लिपीक आणि अधीक्षक नसल्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. याचा सर्वात मोठा परिणाम परीक्षा विभाग व शैक्षणिक विभागाच्या कामकाजावर होत आहे. हे पाहून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलविणे सुरू करण्यात आले. या दोन कारणांमुळे घेतले कामावर विद्यापीठ प्रशासनाच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, त्यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. दुसरे कारण म्हणजे विद्यापीठाच्या मते नव्या कर्मचाऱ्यांना कंत्राटावर नियुक्ती दिल्यास त्यांना नियमानुसार वेतन द्यावे लागते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने प्रदीर्घ काम केल्यास तो कायमस्वरूपी नोकरीची मागणी करू शकतो. तो न्यायालयातही जाऊ शकतो. त्यामुळे या बाबी टाळण्यासाठी विद्यापीठाने हा उपाय शोधून काढला आहे. कामकाज सुरळीत करण्याला प्राधान्य विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, शासनाच्या निर्णयानंतर कामकाज चालविणे अवघड झाले होते. कामकाज सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नुकत्याच शासनाने ५० टक्के पदांना भरण्याची परवानगी दिली आहे. ते भरण्याची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल.