शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

नागपुरातील माफसूच्या पदभरतीत गोलमाल असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 9:01 PM

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) पुन्हा एकदा पदभरतीमुळे चर्चेत आले आहे. माफसू अंतर्गत वाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या तीन पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठीची जाहिरातच मुळात त्रुटीपूर्ण असल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले आहे. परंतु एका उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावूनही मुलाखत न घेताच परत पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या विद्यापीठाअंतर्गत असलेली भरती प्रक्रिया पुन्हा एकदा संशयात सापडली आहे.

ठळक मुद्देकॉल पाठविला पण मुलाखतच घेतली नाहीवाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटरसाठी पदभरती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) पुन्हा एकदा पदभरतीमुळे चर्चेत आले आहे. माफसू अंतर्गत वाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या तीन पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठीची जाहिरातच मुळात त्रुटीपूर्ण असल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले आहे. परंतु एका उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावूनही मुलाखत न घेताच परत पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या विद्यापीठाअंतर्गत असलेली भरती प्रक्रिया पुन्हा एकदा संशयात सापडली आहे.गोरेवाडा येथील आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र (वाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर) स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात एकूण २० जागाही मंजूर करण्यात आल्या. यापैकी पशु वैद्यकीय चिकित्सालयीन औषधशास्त्र, पशु प्रजनन शास्त्र आणि पशु जैव तंत्रज्ञान या पदासाठी जाहिरात काढण्यात आली. ही तिन्ही पदे पशु व मत्स्य विद्यापीठाशी संबंधित आहेत. वाईल्ड लाईफशी त्यांचा संबंध नाही. वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी वन्यजीव विज्ञान किंवा वन्यजीव आरोग्य व व्यवस्थापन या विषयाच्या पदव्युत्तरांची आवश्यकता आहे. परंतु हे विषय जाहिरातीतूनच वगळण्यात आले आहेत. यासंबंधात काही जणांनी तक्रारही केली आहे. डॉ. दत्तात्रय इंगोले हे स्वत: एक उमेदवार आहेत. ते मूळचे उस्मानाबाद येथील रहिवासी असून सध्या धुळ्याला राहतात. ते माफसूचेच माजी विद्यार्थी असून वाईल्ड लाईफचे तज्ज्ञ आहेत. वन्यजीव सायन्समध्ये ते पीएचडी आहेत. तसेच नेटसुद्धा झालेले आहेत. वाईल्ड लाईफ सेंटरसाठी पदभरती होत आहे. परंतु या विषयातील तज्ज्ञ असूनही अर्ज करता येत नसल्याने त्यांनी विद्यापीठाला पत्र पाठवून याबाबत आक्षेप घेतला आणि अर्ज करण्याची विनंती केली. विद्यापीठाने त्यांची विनंती मान्य केली. मुलाखतीसाठीही त्यांना बोलावले. बुधवारी मुलाखत होती. परंतु त्यांची मुलाखतच घेण्यात आली नाही. याबाबत विचारणा केली असता कुणी काहीही बोलायला तयार नव्हते. मुलाखत न घेताच त्यांना परत पाठविण्यात आले. मुलाखत घ्यायचीच नव्हती तर मग कॉल लेटर पाठवलेच का, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर