शहरं
Join us  
Trending Stories
1
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
2
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
3
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
4
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
5
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
6
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
7
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
8
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
9
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
10
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
11
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
12
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
13
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
14
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
15
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
16
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
17
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
18
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
19
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
20
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

सुनील केदार यांच्याकडून जिल्हा बँक घोटाळ्यातील १५० कोटी वसूल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:21 IST

Nagpur : काँग्रेसचे मुजीब पठाण याच्या नेतृत्वात बुर्टीबोरीत जनआक्रोश मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कबुटीबोरी :नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी तत्कालीन अध्यक्ष आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात रविवारी काँग्रेस नेते मुजीब पठाण यांच्या नेतृत्वात बुटीबोरीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त शेतकरी व नागरिकांनी केदार यांच्यावर कारवाई करा आणि घोटाळ्यातील १५० कोटी रुपये वसूल करा, अशी मागणी केली. याबाबतचे निवेदनही बुटीबोरी पोलिस ठाण्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी केदार यांना ५ वर्षे सक्तमजुरी व १२.५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. इतका गंभीर गुन्हा सिद्ध होऊनही आजतागायत या गंभीर गुन्ह्याची राजकीय किंमत केदार यांना चुकवावी लागलेली नाही, ही बाब संतप्त नागपूरकर आणि शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे. न्यायालयाने शिक्षा जाहीर करून ही त्यांनी जामिनासाठी न्यायालय व उच्च सत्र न्यायालयात प्रयत्न केले, मात्र दोन्ही ठिकाणी त्यांच्या याचिका नाकारण्यात आल्या.

या प्रकरणामुळे केवळ कृषक व ठेवीदारांचे आर्थिक नुकसान झाले नसून, सहकार व वित्त क्षेत्रातील लोकांचा विश्वासही डळमळीत झाला असल्याने दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मुजीब पठाण यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी व नागरिकांनी बुटीबोरी येथे रस्त्यावर उतरले. तसेच पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले. या आंदोलनात युसुफ शेख, सुरेश जारोंडे, अल्ताफ शेख, विनोद वासनिक, तुषार ढाकणे, राहुल पटले, अभय मून, नागेश गीन्हे, अंकित मसुरकर, अक्षय भरतकर, शकील खान, हर्षल पांडरकर, अभिषेक सिंग, विभोर आंबटकर, प्रिन्स पांडे, रमेश येटे, ज्ञानेश्वर झाडे, चरणदास काळे, नासीर शेख, दिलीप वाडीभस्मे, निरंजन गभणे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते.

निवेदनातील मुख्य मागण्या

  • नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यातील सर्व आरोपींवर जलदगतीने शिक्षेची अंमलबजावणी व्हावी.
  • संबंधित दोषींनी बँकेकडून बळकावलेल्या रकमेची वसुली तातडीने करावी.
  • अशा गंभीर आर्थिक गुन्ह्यात सहभागी व्यक्तींना कोणताही राजकीय आश्रय किंवा पद मिळू नये याची सरकारने हमी द्यावी.
  • बँकेचे पुन्हा पुनर्गठन करून तिचा कारभार पारदर्शक व शेतकरी हितासाठी पुन्हा उभा करावा.
टॅग्स :nagpurनागपूरSunil Kedarसुनील केदार