शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणताे, निवडणूक रोखे हा एक ‘प्रयोग’; समान नागरी कायदाही व्हावाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 8:27 AM

"नवीन गोष्टी आल्या की लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे"

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : निवडणूक रोख्यांबाबत संघाने अद्यापही बैठकीत चर्चा केलेली नाही. सध्या तरी हा एक प्रयोग आहे. तो किती फायदेशीर आणि प्रभावी ठरला हे कालांतराने कळेल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी रविवारी व्यक्त केले. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपाच्या दिवशी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. होसबळे यांची संघाच्या सरकार्यवाहपदी फेरनिवड झाली. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना हाेसबळे म्हणाले, ‘निवडणूक रोखे’ आजच आले आहेत, असे नाही. यापूर्वीही अशी योजना करण्यात आली होती. जेव्हा-जेव्हा काही बदल होतात तेव्हा प्रश्न उपस्थित होतात.

ईव्हीएम आल्यावरही प्रश्न उपस्थित झाले होते. नवीन गोष्टी आल्या की लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे; पण ही नवी व्यवस्था किती फायदेशीर आणि परिणामकारक होती हे वेळ आल्यावर कळेल. त्यामुळे ते प्रयोगासाठी सोडले पाहिजे, अशी भूमिका सरकार्यवाह हाेसबळे यांनी स्पष्ट केली.

समान नागरी कायदा व्हावाच!

संघ समान नागरी कायद्याच्या बाजूनेच आहे. देशात समान नागरी कायदा व्हावा, यासाठी अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळात प्रस्ताव मांडला होता. उत्तराखंड राज्याने यात पुढाकार घेतला आहे. तेथील अनुभवानंतर हळूहळू संपूर्ण देशात हा कायदा लागू व्हायला हवा, असे हाेसबळे म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग