शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रामटेकमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; मला का घाबरता? बर्वेंचा सवाल

By जितेंद्र ढवळे | Updated: April 4, 2024 21:32 IST

Ramtek Loksabha Election: लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून रात्रभरात माझे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले असा आरोप रश्मी बर्वेंनी केला.

नागपूर - काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करणाऱ्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. यानंतर महायुती आणि काँग्रेसने गुरुवारी पत्रपरिषद घेत एकमेकावर आरोप-प्रत्योराप केले. बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र कायद्यानुसार रद्द झाल्याचे रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले तर न्यायालयाने अंतरिम आदेश दिल्याने सत्याचा विजय झाल्याचे सांगत रश्मी बर्वे यांनी भाजपवर तोफ डागली.

काँग्रेस मतदारांची दिशाभूल करतेय, आशिष जयस्वाल यांचा आरोपरश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात किंवा त्यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या प्रक्रियेत भाजप किंवा सेनेचा काडीमात्र संबंध नसल्याचा दावा आ. ॲड. आशिष जयस्वाल यांनी केला. बर्वे यांनी खोटी कागदपत्रे सादर करून जातवैधता प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यामुळे त्यांचे ते प्रमाणपत्र अवैध असल्यासंदर्भात कोराडीचे सुनील साळवे आणि पारशिवनीच्या वैशाली देवीया यांनी जात पडताळणी समितीकडे पुरावे सादर करीत तक्रार दाखल केली होती. मुळात हा वाद साळवे आणि बर्वे यांच्यातील आहे. मात्र, काँग्रेसच्या वतीने यासंदर्भात रामटेक मतदारसंघात संभ्रम पसरविला जात आहे.

बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र वैध की अवैध, ते ठरविण्याच्या अधिकार हा कायद्यानुसार जातपडताळणी समितीचा आहे. समितीने तो अवैध ठरविला आहे. समितीच्या निर्णयाचा आधार घेत त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला होता. याच्याशी रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे किंवा महायुतीचा काहीही संबंध नाही. पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित होते.

‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा जागर करणारे मला का घाबरतात?‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा जागर करणारे भाजपचे नेते मला इतके का घाबरतात, असा सवाल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी केला. आपला न्यायव्यवस्थेवर आजही विश्वास आहे. मात्र, सरकारी यंत्रणाचा गैरवापर करून दोन महिन्यांपासून माझा मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप बर्वे यांनी पत्रकार परिषदेत केला.

लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून रात्रभरात माझे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले. त्याच्या आधार घेत लोकसभेचा उमेदवारी अर्ज रद्द केला. मात्र, आज न्यायालयाच्या निर्णयानंतर सत्याचा विजय झाला. मी लोकांत जाऊन काम केले. त्यांचे प्रश्न सोडविले. मात्र, माझ्याविरोधात षडयंत्र रचून मला लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी आडकाठी आणण्यात आली. आता माझे पती श्यामकुमार बर्वे येथे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आमची सत्यासाठीची लढाई सुरूच राहील. मात्र, जेव्हा जेव्हा एखाद्या महिलेवर आघात झाले, तेव्हा सत्याचाच विजय झाला आहे. महाभारत, रामायण याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे बर्वे म्हणाल्या. पत्रपरिषदेला काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे, ॲड. शैलेश नारनवरे उपस्थित होते.

टॅग्स :ramtek-pcरामटेकcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४