शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

दोन वर्षांत रामटेक-भंडारा राष्ट्रीय महामार्गाला गेले तडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:21 IST

अपघातांचा आलेख चढता : दुरुस्तीसाठी निधी मंजूर कधी करणार?

लोकमत न्यूज नेटवर्कमौदा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन वर्षापूर्वी मौदा तालुक्यातून गेलेल्या रामटेक-खात-भंडारा या महामार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले. अवघ्या दोन वर्षात या रोडच्या काँक्रिटला तडे गेले असून, या तड्यांमुळे चालकांचे त्यांच्या दुचाकी वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत आहे. अपघात टाळण्यासाठी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करणे अनिवार्य असताना त्यासाठी लागणार निधी सरकार कधी मंजूर करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हा महामार्ग नागपूरभंडारा या दोन जिल्ह्यांसोबत नागपूर-जबलपूर आणि नागपूर-रायपूर या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणार असून, प्रशासनाने याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देत २४७क्रमांक दिला आहे. या महामार्गाने दोन महत्त्वाचे महामार्ग जोडल्याने त्यावर वाहनांची वर्दळदेखील वाढली आहे. यात जड वाहनांची संख्या बरीच मोठी आहे. निर्मितीनंतर किमान १५ वर्षे हा मार्ग शाबूत राहावा, अशी अपेक्षा असताना अवघ्या दोन वर्षात त्याच्या काँक्रिटला तडे जायला आणि त्या तड्यांची लांबी, रुंदी व खोली वाढायला सुरुवात झाली आहे.

या तड्यांमुळे दुचाकी वाहनांचे चाक घसरले आणि अपघात होता. रात्रीच्यावेळी वाहनांच्या हेडलाइटच्या प्रकाशझोतात या तड्यांची रुंदी व्यवस्थित दिसत नाही. विशेष म्हणजे, या महामार्गावर विद्युत पथदिवे लावण्यात आलेले नाही. त्यामुळे रोडवरील तडे अपघातास कारणीभूत ठरत असल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करणे तसेच या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करणे गरजेचे आहे. 

सुविधांचा अभाव

  • राज्यातील बहुतांश राष्ट्रीय महामार्गावर विद्युत पथदिवे लावून रात्रीसाठी प्रकाशाची सुविधा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे. मात्र, रामटेक-भंडारा महामार्ग याला अपवाद ठरला आहे.
  • या महामार्गावर विद्युत पथदिवे २ का लावण्यात आले नाही, हे कळायला मार्ग नाही आणि यावर एकही स्थानिक लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. नियमाप्रमाणे या मार्गावर पथदिव्यांची सुविधा निर्माण करावी अशी मागणी सरपंच माधुरी वैद्य यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

दर्जावर प्रश्नचिन्हनिर्मितीपासून अवघ्या दोन वर्षात या मार्गाला तडे गेल्याने या कामाच्या दर्जावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तड्यांमुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी वेळीच योग्य उपाययोजना करण्याची प्रशासनाकडे वारंवार मागणीही केली. परंतु, कुणीही लक्ष देत नाही, असा आरोप खात येथील सरपंच माधुरी वैद्य यांनी केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरbhandara-acभंडाराramtek-acरामटेक