शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत रामटेक-भंडारा राष्ट्रीय महामार्गाला गेले तडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:21 IST

अपघातांचा आलेख चढता : दुरुस्तीसाठी निधी मंजूर कधी करणार?

लोकमत न्यूज नेटवर्कमौदा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन वर्षापूर्वी मौदा तालुक्यातून गेलेल्या रामटेक-खात-भंडारा या महामार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले. अवघ्या दोन वर्षात या रोडच्या काँक्रिटला तडे गेले असून, या तड्यांमुळे चालकांचे त्यांच्या दुचाकी वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत आहे. अपघात टाळण्यासाठी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करणे अनिवार्य असताना त्यासाठी लागणार निधी सरकार कधी मंजूर करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हा महामार्ग नागपूरभंडारा या दोन जिल्ह्यांसोबत नागपूर-जबलपूर आणि नागपूर-रायपूर या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणार असून, प्रशासनाने याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देत २४७क्रमांक दिला आहे. या महामार्गाने दोन महत्त्वाचे महामार्ग जोडल्याने त्यावर वाहनांची वर्दळदेखील वाढली आहे. यात जड वाहनांची संख्या बरीच मोठी आहे. निर्मितीनंतर किमान १५ वर्षे हा मार्ग शाबूत राहावा, अशी अपेक्षा असताना अवघ्या दोन वर्षात त्याच्या काँक्रिटला तडे जायला आणि त्या तड्यांची लांबी, रुंदी व खोली वाढायला सुरुवात झाली आहे.

या तड्यांमुळे दुचाकी वाहनांचे चाक घसरले आणि अपघात होता. रात्रीच्यावेळी वाहनांच्या हेडलाइटच्या प्रकाशझोतात या तड्यांची रुंदी व्यवस्थित दिसत नाही. विशेष म्हणजे, या महामार्गावर विद्युत पथदिवे लावण्यात आलेले नाही. त्यामुळे रोडवरील तडे अपघातास कारणीभूत ठरत असल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करणे तसेच या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करणे गरजेचे आहे. 

सुविधांचा अभाव

  • राज्यातील बहुतांश राष्ट्रीय महामार्गावर विद्युत पथदिवे लावून रात्रीसाठी प्रकाशाची सुविधा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे. मात्र, रामटेक-भंडारा महामार्ग याला अपवाद ठरला आहे.
  • या महामार्गावर विद्युत पथदिवे २ का लावण्यात आले नाही, हे कळायला मार्ग नाही आणि यावर एकही स्थानिक लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. नियमाप्रमाणे या मार्गावर पथदिव्यांची सुविधा निर्माण करावी अशी मागणी सरपंच माधुरी वैद्य यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

दर्जावर प्रश्नचिन्हनिर्मितीपासून अवघ्या दोन वर्षात या मार्गाला तडे गेल्याने या कामाच्या दर्जावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तड्यांमुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी वेळीच योग्य उपाययोजना करण्याची प्रशासनाकडे वारंवार मागणीही केली. परंतु, कुणीही लक्ष देत नाही, असा आरोप खात येथील सरपंच माधुरी वैद्य यांनी केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरbhandara-acभंडाराramtek-acरामटेक