शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

दोन वर्षांत रामटेक-भंडारा राष्ट्रीय महामार्गाला गेले तडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:21 IST

अपघातांचा आलेख चढता : दुरुस्तीसाठी निधी मंजूर कधी करणार?

लोकमत न्यूज नेटवर्कमौदा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन वर्षापूर्वी मौदा तालुक्यातून गेलेल्या रामटेक-खात-भंडारा या महामार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले. अवघ्या दोन वर्षात या रोडच्या काँक्रिटला तडे गेले असून, या तड्यांमुळे चालकांचे त्यांच्या दुचाकी वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत आहे. अपघात टाळण्यासाठी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करणे अनिवार्य असताना त्यासाठी लागणार निधी सरकार कधी मंजूर करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हा महामार्ग नागपूरभंडारा या दोन जिल्ह्यांसोबत नागपूर-जबलपूर आणि नागपूर-रायपूर या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणार असून, प्रशासनाने याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देत २४७क्रमांक दिला आहे. या महामार्गाने दोन महत्त्वाचे महामार्ग जोडल्याने त्यावर वाहनांची वर्दळदेखील वाढली आहे. यात जड वाहनांची संख्या बरीच मोठी आहे. निर्मितीनंतर किमान १५ वर्षे हा मार्ग शाबूत राहावा, अशी अपेक्षा असताना अवघ्या दोन वर्षात त्याच्या काँक्रिटला तडे जायला आणि त्या तड्यांची लांबी, रुंदी व खोली वाढायला सुरुवात झाली आहे.

या तड्यांमुळे दुचाकी वाहनांचे चाक घसरले आणि अपघात होता. रात्रीच्यावेळी वाहनांच्या हेडलाइटच्या प्रकाशझोतात या तड्यांची रुंदी व्यवस्थित दिसत नाही. विशेष म्हणजे, या महामार्गावर विद्युत पथदिवे लावण्यात आलेले नाही. त्यामुळे रोडवरील तडे अपघातास कारणीभूत ठरत असल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करणे तसेच या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करणे गरजेचे आहे. 

सुविधांचा अभाव

  • राज्यातील बहुतांश राष्ट्रीय महामार्गावर विद्युत पथदिवे लावून रात्रीसाठी प्रकाशाची सुविधा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे. मात्र, रामटेक-भंडारा महामार्ग याला अपवाद ठरला आहे.
  • या महामार्गावर विद्युत पथदिवे २ का लावण्यात आले नाही, हे कळायला मार्ग नाही आणि यावर एकही स्थानिक लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. नियमाप्रमाणे या मार्गावर पथदिव्यांची सुविधा निर्माण करावी अशी मागणी सरपंच माधुरी वैद्य यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

दर्जावर प्रश्नचिन्हनिर्मितीपासून अवघ्या दोन वर्षात या मार्गाला तडे गेल्याने या कामाच्या दर्जावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तड्यांमुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी वेळीच योग्य उपाययोजना करण्याची प्रशासनाकडे वारंवार मागणीही केली. परंतु, कुणीही लक्ष देत नाही, असा आरोप खात येथील सरपंच माधुरी वैद्य यांनी केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरbhandara-acभंडाराramtek-acरामटेक