शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक व कामठीत काँग्रेसचे नियोजन चुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 20:33 IST

काँग्रेस नेत्यांनी रामटेक व कामठीत योग्य नियोजन केले असते, पूर्ण लक्ष दिले असते, जनमानसाचा कौल विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर कदाचित आज काँग्रेसने या दोन्ही जागा जिंकत विजयाचा षटकार मारला असता.

ठळक मुद्देउमेदवारी जाहीर करण्यास दिरंगाई : नेते ‘विनिंग मेरिट’ ओळखण्यात कमी पडले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने यावेळी मात्र चौकार मारला. सावनेरसह उमरेड, पश्चिम नागपूर व उत्तर नागपूर जिंकले. मात्र, काँग्रेस नेत्यांनी रामटेककामठीत योग्य नियोजन केले असते, पूर्ण लक्ष दिले असते, जनमानसाचा कौल विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर कदाचित आज काँग्रेसने या दोन्ही जागा जिंकत विजयाचा षटकार मारला असता.रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी बरीच रस्सीखेच झाली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे व उदयसिंग यादव यांच्यापैकी कुणाला तिकीट द्यावे, हा निर्णय घेण्यासाठी हायकमांडने बराच वेळ घेतला. भूमिपुत्रांचा मेळावा झाला. बरेच राजकारण झाले. भूमिपुत्र म्हणून यादव यांना संधी देण्यात आली. शेवटी निकाल लागला. शिवसेनेचे बंडखोर अ‍ॅड.आशिष जयस्वाल यांनी भाजपचे पानिपत करीत रामटेकचा गड सर केला. जयस्वाल २४ हजार ४१३ मतांनी विजयी झाले. जयस्वाल यांना ६७,४१९ तर भाजपचे डी.मल्लिकार्जून रेड्डी यांना ४३ हजार ०६ मते मिळाली. काँग्रेसचे यादव तिसऱ्या क्रमांकावर घसरले. त्यांना ३२ हजार ४९७ मतावर समाधान मानावे लागले.आता जनमानसात निकालाचे पोस्टमार्टम करणे सुरू झाले आहे. रामटेकमध्ये काँग्रेसने राजेंद्र मुळक किंवा चंद्रपाल चौकसे यांना संधी दिली असती तर चित्र काहिसे चांगले असते का, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. जिल्हाध्यक्ष मुळक हे रामटेकमध्ये दोन वर्षांपासून काम करीत होते. त्यांनी प्रत्येक गावात, बूथपर्यंत संपर्क प्रस्थापित केला होता. शिवाय निवडणूक लढण्याची कला त्यांना अवगत होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे हे देखील गेल्या पाच वर्षांपासून रामटेकमध्ये परिश्रम घेत होते. जलदिंडी, आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहचत होते. शिवाय गेल्या दोन टर्ममध्ये काँग्रेसचे तिकीट न मिळाल्यावरही त्यांनी बंडखोरी केली नाही. प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. असे असतानाही यावेळी काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीचा विचार केला नाही. काँग्रेसने काही अंदाज घेऊनच यादव यांना विचारपूर्वकच उमेदवारी दिली असेल. मात्र, निकाल पाहता पक्षाचा अंदाज चुकलेला दिसतो.कामठीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट पक्के मानले जात होते. बावनकुळे यांचे तिकीट कटेल, असा विचार विरोधकांनीही स्वप्नात केला नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या हायकमांडने दोन महिन्यांपूर्वीच या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित करणे आवश्यक होते. यामुळे उमेदवाराला भाजपचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असता. मात्र, झाले उलटे. दोन महिन्यापूर्वी तर सोडाच पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवसांपूर्वीपर्यंत काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भोयर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे भोयर यांना उमेदवार म्हणून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही.कामठीत भाजपचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापल्यामुळे समर्थकांमध्ये रोष होता. हा रोष मतांमध्ये परावर्तित करण्यात काँग्रेस नेते कमी पडले. भोयर यांना पक्षाच्या नेत्यांकडून पाहिजे तशी मदत मिळाली नाही. गेल्यावेळी राजेंद्र मुळक यांना कामठीतून आघाडी घेतली होती. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी भोयर यांच्यासाठी नियोजन केले असते तर कदाचित भोयर यांनीही कामठीत हात मारला असता, अशी आता मतदारांमध्ये चर्चा आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसramtek-acरामटेकkamthi-acकामठी