शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

राजभवनात समाजकंटकांनी टाकलेला ट्रकभर कचरा गोळा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:49 IST

Raj Bhavan,garbage collected, nagpur news शहरात राजभवन म्हणजे लाखभर झाडे असलेला, पशू, पक्षी अशा जैवविविधतेने संपन्न असलेला व्हीआयपी परिसर. मात्र आसपासच्या परिसरातील नागरिकांद्वारे घरातील कचरा टाकून या परिसराचे विद्रुपीकरण केले जाते. अशाचप्रकारे लाेकांकडून फेकलेला कचरा राजभवनचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी श्रमदान करून स्वच्छ केला.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची आराधना 

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : शहरात राजभवन म्हणजे लाखभर झाडे असलेला, पशू, पक्षी अशा जैवविविधतेने संपन्न असलेला व्हीआयपी परिसर. मात्र आसपासच्या परिसरातील नागरिकांद्वारे घरातील कचरा टाकून या परिसराचे विद्रुपीकरण केले जाते. अशाचप्रकारे लाेकांकडून फेकलेला कचरा राजभवनचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी श्रमदान करून स्वच्छ केला. जवळपास ट्रकभर कचरा काढून राजभवन कचरामुक्त केले.

निसर्गाने इतका संपन्न परिसर असूनही असंवेदनशील लाेक त्यात घाण करण्याचे साेडत नाही. राजभवनच्या आसपास असलेल्या स्वीपर माेहल्ला, मुस्लिम लायब्ररी, तीननल चाैक, खाटीकपुरा, बिजलीनगर या भागातील लाेक त्यांच्या घरातील कचरा राजभवनच्या सुरक्षा भिंतीवरून आतमध्ये फेकतात. असा मनभर कचऱ्याचा ढीग राजभवनातील जंगलात पडला हाेता. मनपाच्या अधिकाऱ्यांना वेळाेवेळी तक्रारी केल्या पण त्यांनीही गांभीर्य दाखवले नाही. शेवटी रमेश येवले यांनीच पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी परिसरात फेकलेल्या दारूच्या बाॅटल्स, प्लास्टिक, टायर, पाइप, काचा, घरातील शिळे खाद्यपदार्थ वेचले. असा ट्रकभर कचरा कर्मचाऱ्यांनी जंगलातून काढला आणि राजभवनचे वैभव कायम केले.

जैवविविधतेचा व्हीआयपी परिसर

कधीकाळी राजभवन अतिक्रमणाने बुजला हाेता. दारू पिणारे, जुगार खेळणाऱ्या समाजकंटकांचा अड्डा झाला हाेता. अशावेळी येथे अधिकारी म्हणून आलेले रमेश येवले यांनी राजभवनचा कायापालट केला. हा परिसर केवळ अतिक्रमणमुक्त केला नाही तर या १०० एकराच्या परिसरात लाखाे वृक्षांची लागवड करून जैवविविधता समृद्ध केली. गेल्या २० वर्षात त्यांनी हा परिसर ९० टक्के अतिक्रमणमुक्त केला. परिसरात लहानमाेठे असे ४३ बंधारे बांधले, ८० एकरांमध्ये जैवविविधता उद्यान फुलविले. साेबतच फुलपाखरू उद्यान, मधमाशी उद्यान, गुलाब उद्यान तयार करून या परिसराचे रूपच पालटले. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक अतिविशिष्ट व्यक्तींना राजभवनची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.

राजभवन हा निसर्गरम्य खजाना आहे. आम्ही हा परिसर ऑक्सिजन झाेन म्हणून विकसित केला असून यातून दरराेज लाखाे लिटर ऑक्सिजन नागपूरकरांना मिळताे. मात्र काही दूषित मानसिकतेचे लाेक या परिसराला दूषित करीत आहेत. लाेकांनी शुद्ध हवेचा, निसर्गाचा, पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आस्वाद घ्यावा. त्याचे साैंदर्य प्रदूषित करू नये.

- रमेश येवले, राजभवन अधिकारी

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नnagpurनागपूर