शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

राजभवनात समाजकंटकांनी टाकलेला ट्रकभर कचरा गोळा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:49 IST

Raj Bhavan,garbage collected, nagpur news शहरात राजभवन म्हणजे लाखभर झाडे असलेला, पशू, पक्षी अशा जैवविविधतेने संपन्न असलेला व्हीआयपी परिसर. मात्र आसपासच्या परिसरातील नागरिकांद्वारे घरातील कचरा टाकून या परिसराचे विद्रुपीकरण केले जाते. अशाचप्रकारे लाेकांकडून फेकलेला कचरा राजभवनचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी श्रमदान करून स्वच्छ केला.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची आराधना 

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : शहरात राजभवन म्हणजे लाखभर झाडे असलेला, पशू, पक्षी अशा जैवविविधतेने संपन्न असलेला व्हीआयपी परिसर. मात्र आसपासच्या परिसरातील नागरिकांद्वारे घरातील कचरा टाकून या परिसराचे विद्रुपीकरण केले जाते. अशाचप्रकारे लाेकांकडून फेकलेला कचरा राजभवनचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी श्रमदान करून स्वच्छ केला. जवळपास ट्रकभर कचरा काढून राजभवन कचरामुक्त केले.

निसर्गाने इतका संपन्न परिसर असूनही असंवेदनशील लाेक त्यात घाण करण्याचे साेडत नाही. राजभवनच्या आसपास असलेल्या स्वीपर माेहल्ला, मुस्लिम लायब्ररी, तीननल चाैक, खाटीकपुरा, बिजलीनगर या भागातील लाेक त्यांच्या घरातील कचरा राजभवनच्या सुरक्षा भिंतीवरून आतमध्ये फेकतात. असा मनभर कचऱ्याचा ढीग राजभवनातील जंगलात पडला हाेता. मनपाच्या अधिकाऱ्यांना वेळाेवेळी तक्रारी केल्या पण त्यांनीही गांभीर्य दाखवले नाही. शेवटी रमेश येवले यांनीच पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी परिसरात फेकलेल्या दारूच्या बाॅटल्स, प्लास्टिक, टायर, पाइप, काचा, घरातील शिळे खाद्यपदार्थ वेचले. असा ट्रकभर कचरा कर्मचाऱ्यांनी जंगलातून काढला आणि राजभवनचे वैभव कायम केले.

जैवविविधतेचा व्हीआयपी परिसर

कधीकाळी राजभवन अतिक्रमणाने बुजला हाेता. दारू पिणारे, जुगार खेळणाऱ्या समाजकंटकांचा अड्डा झाला हाेता. अशावेळी येथे अधिकारी म्हणून आलेले रमेश येवले यांनी राजभवनचा कायापालट केला. हा परिसर केवळ अतिक्रमणमुक्त केला नाही तर या १०० एकराच्या परिसरात लाखाे वृक्षांची लागवड करून जैवविविधता समृद्ध केली. गेल्या २० वर्षात त्यांनी हा परिसर ९० टक्के अतिक्रमणमुक्त केला. परिसरात लहानमाेठे असे ४३ बंधारे बांधले, ८० एकरांमध्ये जैवविविधता उद्यान फुलविले. साेबतच फुलपाखरू उद्यान, मधमाशी उद्यान, गुलाब उद्यान तयार करून या परिसराचे रूपच पालटले. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक अतिविशिष्ट व्यक्तींना राजभवनची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.

राजभवन हा निसर्गरम्य खजाना आहे. आम्ही हा परिसर ऑक्सिजन झाेन म्हणून विकसित केला असून यातून दरराेज लाखाे लिटर ऑक्सिजन नागपूरकरांना मिळताे. मात्र काही दूषित मानसिकतेचे लाेक या परिसराला दूषित करीत आहेत. लाेकांनी शुद्ध हवेचा, निसर्गाचा, पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आस्वाद घ्यावा. त्याचे साैंदर्य प्रदूषित करू नये.

- रमेश येवले, राजभवन अधिकारी

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नnagpurनागपूर