शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

गारपिटीसह पावसाचा तडाखा, विदर्भात पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 4:43 AM

शुक्रवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले. यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नागपूर : शुक्रवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले. यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकासह भाजीपाल्यालाही याचा फटका बसला आहे. भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारा पडल्याने पीक भुईसपाट झाले आहे. नागपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.शुक्रवारी मध्यरात्री १२ पासूनच नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी तुरळक व मुसळधार पावसाला सुरूवात झाली. भंडारा जिल्ह्यात भंडारा, साकोली, मोहाडी, पवनी यासह सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे फक्त मोहाडी शहरात गारपीटीसह पाऊस बरसला. यामुळे गहू, हरभरा, लाखोरी, मुंग, उडीद या पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती आहे.नागपूर जिल्ह्यात हिंगणा, मौदा, पारशिवणी भागातही मुसळधार पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात ४.३० वाजेच्या सुमारास आरमोरीसह काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली.दरम्यान, २६ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २७ जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २८ जानेवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.>राज्यात गारवा वाढलामध्यंतरी कमी झालेला थंडीचा कडाका राज्यासह मुंबईत पुन्हा एकदा वाढला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाºया शीत वाºयामुळे राज्यासह मुंबई गारठली आहे. सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९ अंश सेल्सिअस नोंदविले आहे.