शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

प्रत्येक घरासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:08 IST

भूजल संपदेचे संरक्षण, व्यवस्थापन आणि न्यायोचित समसमान वितरणासाठी कायदा करण्यात आला आहे. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमावलीचा मसुदाही तयार झाला आहे. याअंतर्गत शहर किंवा गावात १००० चौ.फुटाचे घर बांधणाऱ्यांना ‘रेन वॉट हार्वेस्टिंग’ची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय २०० फुटाच्यावर खोल विहीर किंवा बोअरवेल करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. लोकसहभागातूनच या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी शक्य होणार असल्याचा विश्वास राज्य भूजल प्राधिकरणाचे सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देभूजल व्यवस्थापनाचा नवा कायदा : अंमलबजावणी करणारे पहिले राज्य महाराष्ट्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूजल संपदेचे संरक्षण, व्यवस्थापन आणि न्यायोचित समसमान वितरणासाठी कायदा करण्यात आला आहे. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमावलीचा मसुदाही तयार झाला आहे. याअंतर्गत शहर किंवा गावात १००० चौ.फुटाचे घर बांधणाऱ्यांना ‘रेन वॉट हार्वेस्टिंग’ची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय २०० फुटाच्यावर खोल विहीर किंवा बोअरवेल करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. लोकसहभागातूनच या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी शक्य होणार असल्याचा विश्वास राज्य भूजल प्राधिकरणाचे सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.भूजल कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वासही अ‍ॅड. तिवारी यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले, राज्य भूजल प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य भूजल नियम २०१८ चा सविस्तर मसुदा राज्य सरकारने प्रसिद्ध केला असून, त्यात भूजल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे जतन करणे, अधिसूचित नसलेल्या क्षेत्रातील अस्तित्वातील विहिरींच्या भूजल वापरावर उपकर लावणे, अधिसूचित क्षेत्रात ग्रामसभेद्वारे पीक पद्धतीचा निर्णय घेणे, जिल्हा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवणे, वाळू खाणकामाचे नियमन व प्रतिबंध याबाबतच्या अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी कायद्यात करण्यात आल्या आहेत. दुष्काळाच्या काळात वैयक्तिक विहिरी सार्वजनिक वापरासाठी अधिग्रहित करण्याचे अधिकार प्राधिकरणाला राहणार आहेत. या नियमावलीमुळे भूगर्भातील पाण्याचे मोजमाप व नियोजन करणे शक्य होणार असून, तरतुदींबाबत नागरिकांकडून ३१ आॅगस्टपर्यंत सूचना व आक्षेप मागविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे राजेंद्र हटवार, अ‍ॅड. विजय भागडीकर उपस्थित होते.कार्यशाळा २३ लाभूजल नियमांबाबत जनजगृतीसाठी २३ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. एल. गोयल, भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे राज्य संचालक शेखर गायकवाड नियमावलीसंदर्भात सविस्तर माहिती देतील.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी