शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपुरात हिवसाळा, गारठा वाढला; अवकाळीने बळीराजाही संकटात

By योगेश पांडे | Updated: November 28, 2023 09:01 IST

एकीकडे वाढती थंडी आणि दुसरीकडे पाऊस यामुळे गारठा आणखी वाढला आहे.

योगेश पांडे

नागपूर : नागपूर जिल्ह्यात मध्यरात्री पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी गारादेखील पडल्या असून शहरातदेखील मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

मध्यरात्रीनंतर अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. मात्र सकाळी पावसाचा जोर वाढला असून रब्बी पीकांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. शहरात पावसामुळे बऱ्याच भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. शिवाय अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती दिसून आली. एकीकडे वाढती थंडी आणि दुसरीकडे पाऊस यामुळे गारठा आणखी वाढला आहे.

दरम्यान नागपूर शहर व आजूबाजूच्या परिसरात सकाळपासूनच आलेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. शहरातदेखील मुसळधार पाऊस असून नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. एकीकडे थंडी आणि दुसरीकडे पाऊस अशा वातावरणात हिवसाळा असल्याचीच चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊसFarmerशेतकरी