शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

राहुल गांधी अपरिवक्व नेते, दलित-आदिवासींची करत आहेत दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 16:46 IST

किरण रिजीजूंचा आरोप : कॉंग्रेस म्हणजे खोटे आश्वासन देणारी फॅक्टरीच

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :राहुल गांधी इतकी वर्षे राजकारणात आहेत. मात्र त्यांना अद्यापदेखील दलित किंवा आदिवासी समाजाबाबत फारशी माहिती नाही. निवडणूक आली की वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट ते करत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांनी नेहमीच आदिवासी व दलितांची दिशाभूल केली आहे. ते अद्यापही अपरिपक्व नेतेच आहेत, असा आरोप केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी लावला. नागपुरात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

आज कॉंग्रेस व महाविकासआघाडीचे नेते संविधान हाती घेऊन प्रचार करत आहेत व भाजपवर आरोप करत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पुढाकारामुळे २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करणे सुरू झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हरविण्यासाठी कॉंग्रेसनेच षडयंत्र केले होते. त्यांचा कॉंग्रेसने नेहमीच अपमान केला. मात्र मतांच्या राजकारणासाठी आता कॉंग्रेस संविधानप्रेमी असल्याचे नाटक करत आहेत. कॉंग्रेस नेत्यांनीच नेहमी आरक्षणाला विरोध केला आहे, असा दावा किरण रिजीजू यांनी केला. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हिजननुसार संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेवर एक ग्रंथ केंद्र सरकार काढणार आहे. त्यात कॉंग्रेसने केलेल्या विरोधांचे रेकॉर्डदेखील असतील व जनतेसमोर यातून सत्य आणण्यात येईल, असे रिजीजू यांनी सांगितले.

संसदेतील भाषणांचा दर्जा घसरलाएक काळ होता जेव्हा कॉंग्रेसमधूनदेखील संसदेत अतिशय सखोल व अभ्यासपूर्ण भाषणे व्हायची. मात्र राहुल गांधी संसदेत आल्यापासून भाषणांचा व चर्चांचा दर्जा घसरला आहे. त्यांचा स्वत:चा काहीच अभ्यास नसतो. कुणीतरी लिहून दिलेले भाषण ते वाचतात. कॉंग्रेसमधील जे अभ्यासू खासदार आहेत, त्यांना भितीपोटी हवे तसे भाषण करता येत नाही, असा दावा रिजीजू यांनी केला.

८० टक्के मुस्लिमांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. याबाबत विविध पातळ्यांवर मुस्लिम संघटना, महिला संघटनांशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ८० टक्के मुस्लिमांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शविला आहे. वक्फच्या नावाखाली कोट्यवधींच्या जमिनी लॅंड माफियांनीच गिळंकृत केल्या आहेत. त्याचा गरीबांना कुठलाही फायदा झालेला नाही. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर या जमिनींचा मुस्लिम समाजातील मुले, तरुण, महिला यांच्या विकासासाठीच उपयोग करण्यात येईल, असे रिजीजू यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीnagpurनागपूर