शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

लोकक्षोभामुळे वानाडोंगरीचे क्वारंटाइन सेंटर हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:38 IST

अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वानाडोंगरी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध, ठिय्या आंदोलन : जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा भागातील संशयितांना वानाडोंगरीतील क्वारंटाइन सेंटर येथे हलवण्यात आले होते. परंतु याला स्थानिक नागरिकांसह आमदार व त्या भागातील सर्वच लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. इतकेच नव्हे तर हे सेंटर नागपुरात हलवण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे.हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरात सामाजिक न्याय विभागाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह आहे. येथील इमारतीत ३१ खोल्या असून येथे नागपूर शहरातील १२६ जणांना कोरोना विषाणू संशयित म्हणून क्वारंटाइन करण्यात आले होते. ज्यांना येथे क्वारंटाइन करण्यात आले, ते नागपूर शहरातील सतरंजीपुरा परिसरातील लोक होते. सध्या सतरंजीपुरा हा परिसर सर्वाधिक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातोय. नागपुरातील अर्ध्यापेक्षा अधिक कोेरोनाच्या केसेस याच परिसरात आढळून आल्या आहेत. त्यामुळे येथील लोकांना हिंगणा येथील वानाडोंगरीत आणले गेल्याची माहिती मिळताच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही याला विरोध केला. आ. समीर मेघे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वानाडोंगरी ही नगर परिषद १२०८ हेक्टर क्षेत्रात पसरली असून ५० हजार लोकसंख्येची दाट वसाहत आहे. येथेच एमआयडीसीमधील कारखान्यात काम करणारे कामगार, लहानमोठे व्यावसायिक आणि रोजमजुरी करणारी कुटुंबे राहतात. त्यामुळे कोरोना संशयित आपल्या परिसरात राहत असल्याने त्यांच्यातही भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच वानाडोंगरी येथील ज्या वसतिगृहात त्यांना ठेवण्यात आले तेथे खोलीनिहाय पुरेशी व्यवस्था नाही. वसतिगृहाच्या इमारतीलगतच शहराला पाणीपुरवठा होणारी विहीर आहे.त्यांना अशा दाट लोकवसाहतीत ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.यावेळी त्यांच्यासोबत वानाडोंगरीच्या नगराध्यक्षा वर्षा शाहाकार, जिल्हा परिषद सदस्य राजू हरडे, उपसरपंच कैलाश गिरी, माजी जि.प. सदस्य अंबादास उके, सतीश शाहाकार, उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता, आभा काळे, सभापती बाळू मोरे, सचिन मेंडजोगे आदी होते.यासोबतच माजी मंत्री रमेश बंग यांनीही येथील क्वारंटाईन सेंटर हटवण्याची मागणी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जि.प. सदस्य दिनेश बंग, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, सुचिता विनोद ठाकरे, सभापती बबनराव आव्हाळे, तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, विनोद ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे यांनीही जिल्हाधिकारी ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.एकूणच लोकप्रतिनिधींचा येथील क्वारंटाईन सेंटरला असलेला विरोध लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथील क्वारंटाईन सेंटर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचे आश्वासन दिले. शहरातील दुसऱ्या ठिकाणी ज्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जागा उपलब्ध होती, तिथे स्थानांतरित करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत स्थानांतरणाची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagitationआंदोलन