शहरं
Join us  
Trending Stories
1
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
2
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
4
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
5
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
6
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
7
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
8
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
9
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
10
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
11
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
13
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
14
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
15
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
16
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
17
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
19
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
20
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
Daily Top 2Weekly Top 5

लोकक्षोभामुळे वानाडोंगरीचे क्वारंटाइन सेंटर हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:38 IST

अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वानाडोंगरी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध, ठिय्या आंदोलन : जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा भागातील संशयितांना वानाडोंगरीतील क्वारंटाइन सेंटर येथे हलवण्यात आले होते. परंतु याला स्थानिक नागरिकांसह आमदार व त्या भागातील सर्वच लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. इतकेच नव्हे तर हे सेंटर नागपुरात हलवण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे.हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरात सामाजिक न्याय विभागाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह आहे. येथील इमारतीत ३१ खोल्या असून येथे नागपूर शहरातील १२६ जणांना कोरोना विषाणू संशयित म्हणून क्वारंटाइन करण्यात आले होते. ज्यांना येथे क्वारंटाइन करण्यात आले, ते नागपूर शहरातील सतरंजीपुरा परिसरातील लोक होते. सध्या सतरंजीपुरा हा परिसर सर्वाधिक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातोय. नागपुरातील अर्ध्यापेक्षा अधिक कोेरोनाच्या केसेस याच परिसरात आढळून आल्या आहेत. त्यामुळे येथील लोकांना हिंगणा येथील वानाडोंगरीत आणले गेल्याची माहिती मिळताच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही याला विरोध केला. आ. समीर मेघे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वानाडोंगरी ही नगर परिषद १२०८ हेक्टर क्षेत्रात पसरली असून ५० हजार लोकसंख्येची दाट वसाहत आहे. येथेच एमआयडीसीमधील कारखान्यात काम करणारे कामगार, लहानमोठे व्यावसायिक आणि रोजमजुरी करणारी कुटुंबे राहतात. त्यामुळे कोरोना संशयित आपल्या परिसरात राहत असल्याने त्यांच्यातही भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच वानाडोंगरी येथील ज्या वसतिगृहात त्यांना ठेवण्यात आले तेथे खोलीनिहाय पुरेशी व्यवस्था नाही. वसतिगृहाच्या इमारतीलगतच शहराला पाणीपुरवठा होणारी विहीर आहे.त्यांना अशा दाट लोकवसाहतीत ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.यावेळी त्यांच्यासोबत वानाडोंगरीच्या नगराध्यक्षा वर्षा शाहाकार, जिल्हा परिषद सदस्य राजू हरडे, उपसरपंच कैलाश गिरी, माजी जि.प. सदस्य अंबादास उके, सतीश शाहाकार, उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता, आभा काळे, सभापती बाळू मोरे, सचिन मेंडजोगे आदी होते.यासोबतच माजी मंत्री रमेश बंग यांनीही येथील क्वारंटाईन सेंटर हटवण्याची मागणी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जि.प. सदस्य दिनेश बंग, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, सुचिता विनोद ठाकरे, सभापती बबनराव आव्हाळे, तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, विनोद ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे यांनीही जिल्हाधिकारी ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.एकूणच लोकप्रतिनिधींचा येथील क्वारंटाईन सेंटरला असलेला विरोध लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथील क्वारंटाईन सेंटर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचे आश्वासन दिले. शहरातील दुसऱ्या ठिकाणी ज्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जागा उपलब्ध होती, तिथे स्थानांतरित करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत स्थानांतरणाची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagitationआंदोलन