शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

लोकक्षोभामुळे वानाडोंगरीचे क्वारंटाइन सेंटर हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:38 IST

अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वानाडोंगरी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध, ठिय्या आंदोलन : जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा भागातील संशयितांना वानाडोंगरीतील क्वारंटाइन सेंटर येथे हलवण्यात आले होते. परंतु याला स्थानिक नागरिकांसह आमदार व त्या भागातील सर्वच लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. इतकेच नव्हे तर हे सेंटर नागपुरात हलवण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे.हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरात सामाजिक न्याय विभागाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह आहे. येथील इमारतीत ३१ खोल्या असून येथे नागपूर शहरातील १२६ जणांना कोरोना विषाणू संशयित म्हणून क्वारंटाइन करण्यात आले होते. ज्यांना येथे क्वारंटाइन करण्यात आले, ते नागपूर शहरातील सतरंजीपुरा परिसरातील लोक होते. सध्या सतरंजीपुरा हा परिसर सर्वाधिक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातोय. नागपुरातील अर्ध्यापेक्षा अधिक कोेरोनाच्या केसेस याच परिसरात आढळून आल्या आहेत. त्यामुळे येथील लोकांना हिंगणा येथील वानाडोंगरीत आणले गेल्याची माहिती मिळताच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही याला विरोध केला. आ. समीर मेघे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वानाडोंगरी ही नगर परिषद १२०८ हेक्टर क्षेत्रात पसरली असून ५० हजार लोकसंख्येची दाट वसाहत आहे. येथेच एमआयडीसीमधील कारखान्यात काम करणारे कामगार, लहानमोठे व्यावसायिक आणि रोजमजुरी करणारी कुटुंबे राहतात. त्यामुळे कोरोना संशयित आपल्या परिसरात राहत असल्याने त्यांच्यातही भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच वानाडोंगरी येथील ज्या वसतिगृहात त्यांना ठेवण्यात आले तेथे खोलीनिहाय पुरेशी व्यवस्था नाही. वसतिगृहाच्या इमारतीलगतच शहराला पाणीपुरवठा होणारी विहीर आहे.त्यांना अशा दाट लोकवसाहतीत ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.यावेळी त्यांच्यासोबत वानाडोंगरीच्या नगराध्यक्षा वर्षा शाहाकार, जिल्हा परिषद सदस्य राजू हरडे, उपसरपंच कैलाश गिरी, माजी जि.प. सदस्य अंबादास उके, सतीश शाहाकार, उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता, आभा काळे, सभापती बाळू मोरे, सचिन मेंडजोगे आदी होते.यासोबतच माजी मंत्री रमेश बंग यांनीही येथील क्वारंटाईन सेंटर हटवण्याची मागणी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जि.प. सदस्य दिनेश बंग, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, सुचिता विनोद ठाकरे, सभापती बबनराव आव्हाळे, तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, विनोद ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे यांनीही जिल्हाधिकारी ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.एकूणच लोकप्रतिनिधींचा येथील क्वारंटाईन सेंटरला असलेला विरोध लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथील क्वारंटाईन सेंटर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचे आश्वासन दिले. शहरातील दुसऱ्या ठिकाणी ज्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जागा उपलब्ध होती, तिथे स्थानांतरित करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत स्थानांतरणाची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagitationआंदोलन