शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

तब्बल १८ तासानंतर नागपुरात पोहोचले कतारचे विमान, हैदराबादला केले होते डायव्हर्ट

By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 23, 2023 20:33 IST

प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती देण्याकडे कानाडोळा

मोरेश्वर मानापुरे, नागपूर: शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमग्न झाले. त्याचा परिणाम कतार एअरवेजच्या विमानावर झाला. दोहा येथून उड्डाण भरलेले विमान नागपूरऐवजी हैदराबादला डायव्हर्ट करण्यात आले. त्यानंतर १८ तास उशिराने नागपुरात पोहोचले. परंतु, मुसळधार पावसाचा अन्य घरगुती विमानांवर काहीही परिणाम झाला नाही.

प्राप्त माहितीनुसार, कतार एअरवेज कंपनीच्या क्यूआर-५९० दोहा-नागपूर विमानाने शुक्रवारी रात्री ८.१० वाजता दोहा येथून उड्डाण भरले. हे विमान ठराविक वेळेनुसार शनिवारी पहाटे २.५० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर पोहोचणार होते. परंतु मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यतेमुळे वैमानिकाने विमानाला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोहा येथून आलेले विमान शनिवारी पहाटे ३.३८ वाजता हैदराबादच्या विमानतळावर उतरले. त्यानंतर प्रवाशांना नागपूर पोहोचण्यासाठी तब्बल १८ तास वाट पाहावी लागली. अखेर हे विमान शनिवारी रात्री ८.४५ वाजता नागपुरात पोहोचले.

प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती देण्याकडे कानाडोळा

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासन नागरिकांच्या सुविधांसाठी माहितीची आदानप्रदान करीत बचाव कार्यात मग्न होते. तर दुसरीकडे नागपूर विमानतळाचे अधिकारी अशा कठीण समयी विमानासंदर्भात माहिती देण्यास नकार देत होते. एक दुसऱ्याकडे बोट दाखवित होते. संकटकाळात प्रवाशांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळणे आवश्यक असते. परंतु विमानतळ व्यवस्थापनासह विमान कंपनीचे अधिकारीही माहिती देण्यास नकार देत होते. त्यामुळे प्रवाशांच्या नातेवाईकांमध्ये रोष होता.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर