शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या : पालकमंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:49 IST

जंगलाशेजारी असलेल्या शेतपिकांचे रोही व रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात नुकसानभरपाई तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी घेतला. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ठळक मुद्दे विविध विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जंगलाशेजारी असलेल्या शेतपिकांचे रोही व रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात नुकसानभरपाई तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी घेतला. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, अविनाश ठाकरे, चरणसिंग ठाकूर, सुभाष जैस्वाल, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे आदी उपस्थित होते.काटोल-नरखेड तसेच कोंढाळी परिसरातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांवर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यासंदर्भात वन विभागातर्फे योग्य मोबदला मिळावा यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले होते. शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करताना शेतकऱ्यांच्या शेतपिकासह पशुधन नुकसानीसंदर्भातही शासनाच्या विहीत निर्णयानुसार शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या नुकसानीची भरपाई निर्धारित कालावधीत देण्यात यावी. तसेच नुकसानभरपाईसंदर्भातील केलेला पंचनामा व आर्थिक मदतीबाबतची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांच्या नुकसानीसंदर्भात एप्रिल ते जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ६८२ प्रकरणांची नोंद झाली असून शेतपिकांच्या नुकसानीपोटी ३ कोटी ३७ लाख ४८ हजार ५४० रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक उमरेड-दक्षिणमध्ये १ हजार ३८२ प्रकरणात ८१ लाख ५४ हजार २६५ रुपये, काटोल तालुक्यात १७७ प्रकरणात १७ लाख ८८ हजार ५३६ रुपये व नरखेड तालुक्यात ६१५ प्रकरणात ९१ लाख ९४ हजार १०५ रुपयांचे नुकसानभरपाई देण्यात आली आहे.पशुधनाच्या नुकसानभरपाईसाठी ४०६ प्रकरणात ५० लाख ६० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.नरखेड शहरामध्ये बांधण्यात आलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिज बांधकामामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी रेल्वे क्रॉसिंगजवळ शासनाची जमीन अधिग्रहण करून नागरिकांना येण्या-जाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. काटोल- नरखेड तालुक्यातील नवीन प्रस्तावित तलाव बांधकाम तातडीने सुरू करण्यात यावे.शेतकºयांना वन्यप्राण्यांच्या नुकसानीची जेणेकरून उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध राहील. निवडणुकांच्यापूर्वी प्रस्तावित असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, तलावांची निर्मिती तसेच इतर प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलीसुद्धा परंतु त्यांना २५ टक्के रक्कम न मिळाल्याबाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना ती रक्कम मिळण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.मौदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पिण्याची सोय तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच बंजारा समाजाच्या सांस्कृतिक भवनाकरिता लवकरच जागा मंजूर करण्यात येईल. याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना दिल्यात. मिहान तसेच मेट्रो कामामध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळावा याबाबत प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Farmerशेतकरीwildlifeवन्यजीव