शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्रामाणिक पत्रकारांना मिळते समाजाचे संरक्षण : एस.एन. विनोद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 1:16 AM

पत्रकारांनी निर्भयपणे, नि:पक्षपणे कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य मांडावे, शिक्षित करावे, ही समाजाची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षातील चित्र याच्या विपरीत आहे. हे चित्र पत्रकारितेचे दायित्व विसरल्यासारखे असून सत्याची अपेक्षा ठेवणाऱ्या समाज व वाचकांवर अन्याय केल्यासारखे आहे. मात्र भीती बाळगू नका, कारण प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांच्या संरक्षणात समाज उभा होतो, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकारांनी निर्भयपणे, नि:पक्षपणे कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य मांडावे, शिक्षित करावे, ही समाजाची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षातील चित्र याच्या विपरीत आहे. हे चित्र पत्रकारितेचे दायित्व विसरल्यासारखे असून सत्याची अपेक्षा ठेवणाऱ्या समाज व वाचकांवर अन्याय केल्यासारखे आहे. मात्र भीती बाळगू नका, कारण प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांच्या संरक्षणात समाज उभा होतो, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद यांनी व्यक्त केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. शुक्रवारी बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विजय सातोकर आणि शैलेश पांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रफुल्ल गाडगे, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. एस.एन. विनोद पुढे म्हणाले, ब्रिटिश शासनाशी लढणारी पत्रकारिता आज आपल्याच सरकारच्या विरोधात लिहायला घाबरत आहे. पत्रकार आणि माध्यम संस्था दबाव असल्यागत व्यक्तिविशेष व दलविशेषाचा महिमामंडन आणि प्रचार प्रसार करण्याचा अजेंडा स्वीकारल्याचे दिसते. एवढा की, सार्वजनिक सभेत माध्यमांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानंतरही पत्रकार, माध्यम संस्था किंवा पत्रकार संघटनांनी त्याचा निषेध केला नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले. आपल्या व्यवसायाचा आदर्श सोडल्यास प्रतिमा मलीन होईल आणि समाजही विश्वास ठेवणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी पत्रकारितेत व्यक्तिगत, सामुदायिक, सामाजिक निर्भयता, निर्भिकता नसेल तर लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. सत्कारमूर्तींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी केले. संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. प्रतिष्ठानचे सचिप दिलीप जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर