शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाला समृद्धी

By admin | Updated: February 19, 2016 03:13 IST

सततची नापिकी, दुबार पेरणी आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. नागपूर जिल्ह्यात

जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरनागपूर : सततची नापिकी, दुबार पेरणी आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. नागपूर जिल्ह्यात २०१६-२०१७ या वर्षांत राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाच्या निधीत चारपटीने वाढ करण्याचा निर्णय वन विभाग व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. एकूण ७६ गावांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. १२ कोटी १४ लाख ५५ हजार रुपयांची कामे यात प्रस्तावित करण्यात आली आहेत.२०१५-१६ या वर्षांत जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाला आलेले यश. ९६ गावांत करण्यात आलेले सलग समपातळी चर (सी.सी.टी), गॅबियन बंधारे, अनघड दगडी बांध, मातीचे बांध, सिमेंट प्लग, वन्यजीव पाणी साठवण तलाव आणि जलशोषक चराचा गाव शिवाराला निश्चितच फायदा झाला. या कामांसाठी ३ कोटी ६८ लाख ६२ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आला होता. निधी असला तरी स्थानिक शेतकरी, वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या कामासाठी संवादाचे ‘सलग सम पातळी चर’ उभारले. ते कोणत्याही विधायक कामासाठी आवश्यक असतात. काटोल वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव येथे १८ हजार १५० र.मी. (रुंदी मीटरमध्ये) करण्यात आलेले खोल सलग समपातळी चर (सीसीटी) भविष्यात या परिसरात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी निश्चितच उपयोगी पडणार आहे. साधारणत: सीसीटीचे फायदे दोन वर्षांत दिसून येतात. याशिवाय माळेगांव व गंगालडोह येथे अनघड दगडी बांध बांधण्यात आले आहेत. त्याचा वनपरिक्षेत्रात पाणी जिरविण्यासाठी फायदा होतो आहे. याशिवाय हिंगणा वनपरिक्षेत्रात नालाखोलीकरणाचे ६. ५ किलोमीटरचे काम वास्तवात साकारण्यात वनविभागाला यश आले आहे, हे विशेष. २०१४-१५ या वर्षांत जिल्ह्यात केवळ १९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले होते. यावर १ कोटी ६४ लाख १३ हजार रुपयांचा खर्च झाला होता. १४ तालुके असलेल्या जिल्ह्यांसाठी हा निधी निश्चितच कमी ठरणारा होता. यात दोन वर्षांत १२ पट वाढ करण्यात आल्याने तब्बत ७६ गावांना याचा फायदा होणार आहे. गावातील पाणी गावांत, शेतातील पाणी शेतात मुरावे, हे जलयुक्त शिवार अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. गत वर्षभरात झालेली कामे समाधानकारक आहेत. कोणतेही काम जनतेच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाला वेग दिला. त्यामुळे गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे निधीही वाढविण्यात आला. पाच वर्षांत नागपूर जिल्हा जलयुक्त शिवाराचे रोल मॉडेल असेल. चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर जिल्हा