शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मालमत्ता कर व पाणी बिल ५० टक्के माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 21:42 IST

कोविडमुळे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत असल्याने मालमत्ता कर आणि पाणी बिल सरसकट ५० टक्के माफ करावे, अशी भूमिका लोकप्रतिनिधीची आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींच्या बैठकीत मागणी : आयुक्तांनी घ्यावा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविडमुळे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत असल्याने मालमत्ता कर आणि पाणीबिल सरसकट ५० टक्के माफ करावे, अशी भूमिका लोकप्रतिनिधीची आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सभागृहात सादर करण्यात यावा. तसेच मनपा कायद्यानुसार शास्ती माफ करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. त्यांनी मालमत्ता कर व पाणीबिलावरील शास्ती माफ करावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी दिले.मालमत्ता कर आणि पाणी बिल माफ करण्यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील सभागृहात शहरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. आ. कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, नागो गाणार, मोहन मते, प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, कर समिती सभापती महेंद्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त मिलिंद मेश्राम आदी उपस्थित होते.कृष्णा खोपडे म्हणाले, सध्याच्या काळात नागरिक संकटात आहे. ५० टक्के कर माफ केल्यास जनतेला दिलासा मिळेल. प्रवीण दटके म्हणाले, लोकांना दर महिन्याला कोणतेही बिल दिले जात नाही. पाण्याच्या संदर्भात ओसीडब्ल्यूच्या कंत्राटात तसे नमूद आहे. दर महिन्याला वेळेवर बिल दिले जावे. ते न दिल्यास जनतेसह आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.मोहन मते यांनी प्रत्येक महिन्याला नागरिकांना पाण्याचे बिल दिले जात नसल्याने थकबाकीची समस्या वाढत असल्याला दुजोरा दिला. जनतेच्या हितासाठी ५० टक्के कर कपात करण्याची त्यांनी सूचना केली.गिरीश व्यास यांनीही अशीच भूमिका मांडली. सभागृहात यासंबंधी निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना केली. संदीप जाधव यांनी शास्ती सरसकट माफ करण्याची मागणी करून ‘वन टाइम सेटलमेंट’ची संधी देण्यात यावी, अशी मागणी केली. तानाजी वनवे यांनीही अशीच भूमिका मांडली. लोकप्रतिनिधींची भूमिका लक्षात घेता संदीप जोशी यांनी एप्रिल ते सप्टेंबर या टप्प्यातील मालमत्ता कर व पाण्याचे बिल ५० टक्के करावे. यासंबंधी प्रस्ताव सभागृहात पाठविण्यात यावा व आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात शास्ती माफ करावी, असे निर्देश दिले.आयुक्तांचे अनुपस्थित राहणे अयोग्यजनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचा रोष ते जनप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. यासंबंधी लोकप्रतिनिधी मनपामध्ये बैठका घेतात. अशा बैठकांना मनपा आयुक्तांनी उपस्थित रहाणे अपेक्षित आहे. ३१ जुलैच्य बैठकीला ते उपस्थित नव्हते. बुधवारीही अनुपस्थित राहिले. असे अनुपस्थित राहणे योग्य नाही, असे महापौर संदीप जोशी म्हणाले.

टॅग्स :TaxकरWaterपाणीbillबिल