शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोविड १९ आयसोलेशन युनिट्ससाठी नागपुरातील खाजगी हॉस्पिटल्स तयार नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 07:00 IST

कोरोना विषाणूने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत सरकारने खाजगी इस्पितळांना सज्ज राहण्याचे आवाहन केले असून, आयसोलेशन युनिट्स तयार ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र, अन्यान्न कारणाने आयसोलेशन युनिट तयार करण्यासाठी खाजगी इस्पितळे असहाय असल्याचे दिसून येत आहे.

मेहा शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत सरकारने खाजगी इस्पितळांना सज्ज राहण्याचे आवाहन केले असून, आयसोलेशन युनिट्स तयार ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र, अन्यान्न कारणाने आयसोलेशन युनिट तयार करण्यासाठी खाजगी इस्पितळे असहाय असल्याचे दिसून येत आहे.सरकारची मदत करण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. मात्र, आयसोलेशन युनिटसाठी वेगळी जागा आमच्याकडे नसल्याचे कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. उदय माहूरकर यांनी सांगितले. अनेक खाजगी इस्पितळे छोटे असून, रहिवासी भागात असल्याने त्या भागात कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका असल्याची भिती डॉ. जय देशमुख यांनी व्यक्त केली. शिवाय, लहान इस्पितळांकडे आवश्यक असे उपकरणेही नसल्याचे ते म्हणाले. तरीदेखील ५० टक्के स्टाफ क्षमतेसोबत काम करण्यास तयार असल्याचे देशमुख म्हणाले. स्पंदन हार्ट इन्स्टिट्यूशनचे संचालक डॉ. हर्षवर्धन मार्डिकर यांनीही याबाबत मत व्यक्त केले. वेंटिलेटरची सुविधा असलेले कोणतेही इस्पितळ कोरोना संक्रमित रुग्णांसाठी आपत्कालिन युनिट म्हणून काम करू शकते. परंतु, यावेळी २० टक्के रुग्णांकरिता वेंटिलेटरची गरज आहे. नागपुरातील खाजगी इस्पितळांकडे आयसोलेशन युनिट्स नाहीत. मात्र, त्यांच्याकडे पुरेसा वेळ असल्याने ही सुविधा उपलब्ध करता येऊ शकते. तरीदेखील सरकारने लंडनच्या एक्सेल सेंटरच्या धर्तीवर स्वत:ची अशी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे मार्डिकर म्हणाले. आॅरेंजसिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनूप मरार यांनी आमचे हॉस्पिटल या स्थितीशी सामना करण्यास सज्ज असल्याचे सांगितले. मात्र, नागपुरातील जवळपास सर्वच हॉस्पिटल्स आयसोलेशन नियमानुसार बनलेले नाही, असे ते म्हणाले. यावरून नागपुरात सध्या वैद्यकीय व्यवस्था प्रत्येक स्तरात कमजोर असल्याचे सिद्ध होते.आर्थिकदृष्ट्या कठीण - अशोक अर्बटडॉ. अशोक अर्बट यांनी डब्ल्यूएचओ व आयसीएमआरने कोरोनासंदर्भात सगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांसाठी वेगळे प्रवेशद्वार असणे गरजेचे आहे. डॉक्टर व स्टॉफलाही नियमानुसार राहावे लागेल. पीपीई व एन-९५ मास्क सर्वांसाठीच असणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या बघितले तर हे काम कठीण आहे. एका मास्कची किंमत हजार ते १२०० रुपये एवढी आहे. शिवाय अन्य सुविधाही उपलब्ध कराव्या लागणार असल्याचे अर्बट यांनी सांगितले.वेगळे इस्पितळ बनविण्याची गरज!डॉ. श्रीकांत मुकेवार यांच्या मनानुसार अशा स्थितीत वुहान मॉडेल किंवा इटली मॉडेल आत्मसात करण्याची गरज आहे. या दोन्ही देशांमध्ये कोरोनाचे झपाट्याने होत असलेले संक्रमण बघता वेगळे इस्पितळे बनविण्यात आली आहे. डॉ. राजू खंडेलवार यांनी खाजगी वैद्यकीय सेवेला सरकार कधीही मदत मागू शकते, तो सरकारचा अधिकारच आहे. मात्र, समस्या मोठ्या आहेत. अनेक हॉस्पिटल्स नागरिक क्षेत्रात आहेत. तेथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वच परिसर क्वॉरंटाईन करावे लागेल. शिवाय, पीपीई कीट व मास्क उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत खाजगी इस्पितळे अशा सुविधा कशा उपलब्ध करतील, हा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने सर्वच हॉस्पिटल्स आपल्या अधिकारात घेणे गरजेचे असल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस