शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

नागपुरात एकमेकांचा गेम करण्याची तयारी फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:09 IST

मित्राने नेलेली मोटरसायकल लवकर परत आणली नाही म्हणून झालेल्या वादानंतर परस्पराचा गेम करण्याच्या तयारीत असलेल्या तीन सशस्त्र आरोपींना बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बुधवारी धुळवडीच्या दिवशी एक मोठा गंभीर गुन्हा टळला.

ठळक मुद्देतीन सशस्त्र आरोपी गजाआड : मोठा गुन्हा टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्राने नेलेली मोटरसायकल लवकर परत आणली नाही म्हणून झालेल्या वादानंतर परस्पराचा गेम करण्याच्या तयारीत असलेल्या तीन सशस्त्र आरोपींना बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बुधवारी धुळवडीच्या दिवशी एक मोठा गंभीर गुन्हा टळला.कमल दिलीप दमके (वय २७, रा. बेसा मार्ग, रामटेकेनगर) राज ऊर्फ भल्ला अरविंद गणवीर (वय २८, रा. बेलतरोडी)आणि राजू जीवन रामटेके (वय २८, रा. महाकालीनगर, कालीमाता मंदिरजवळ बेलतरोडी) अशी आरोपींची नावे आहेत.हे तिघेही एकमेकांना ओळखतात. धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास रामटेके त्याची पहिली पत्नी मनीषा हिला भेटायला महाकालीनगरात गेला होता, सोबत त्याचा मित्र अनिल चैरावार होता. तेथे त्यांना आरोपी कमल दमके भेटला. अनिलला तातडीने भाजी घरी घेऊन जायची होती. त्यामुळे त्याने दमके याची मोटरसायकल नेली. बराच वेळ होऊनही अनिल मोटरसायकल घेऊन परत आला नाही. त्यामुळे आरोपी दमकेने रामटेकेसोबत वाद घालून त्याला मारहाण केली. तेवढ्यात त्याचा साथीधार भल्ला गणवीर तेथे आला. दमकेने चिथावणी दिल्याने भल्लाने आपल्या जवळचे घातक शस्त्र बाहेर काढले. ते पाहून रामटेकेने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे बाजूची मंडळी धावत आल्याचे पाहून आरोपी गणवीर आणि दमके तेथून पळून गेले.दरम्यान, अनेकांसमोर मारहाण आणि शिवीगाळ झाल्याने राजू रामटेके अपमानाचा बदला घेण्याच्या उद्देशाने चाकू घेऊन गणवीर आणि दमकेचा शोध घेऊ लागला. या भागात गस्तीवर असलेल्या अजनीच्या पोलीस पथकाला तो दिसला. पोलिसांनी रामटेकेला अटक करून त्याच्याकडून चाकू जप्त केला. चौकशीत त्याने गणवीर आणि दमकेला धडा शिकविण्याच्या तयारीने आपण निघालो होतो, अशी माहिती दिली. त्यांच्याकडे घातक शस्त्र असून, ते गेम करण्याच्या तयारीत असल्याचेही पोलिसांना सांगितले.पोलिसांची धावपळपोलिसांनी लगेच शोधाशोध करून आरोपी गणवीर आणि दमकेला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक तलवार जप्त केली. परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे, बेलतरोडीचे ठाणेदार विजय तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप आगरकर, हवालदार अविनाश ठाकरे, नायक रणधीर दीक्षित, संतोश, प्रशांत सोनुलकर, राजेंद्र नागपुरे आणि महिला शिपायी भाग्यश्री यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे तिन्ही आरोपी गजाआड झाले. परिणामी धुळवडीच्या दिवशी एक गंभीर गुन्हा टळला.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा