शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

मनपा निवडणूक : आघाडीबाबत संभ्रम, भाजप लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 14:57 IST

सध्या १५१ पैकी १०८ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत, परंतु मागील दोन वर्षांपासून मनपाकडून विकासकामे बंद आहेत. कोरोना संक्रमणाचा परिणामही निवडणुकीवर दिसून येत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत, शिवसेना-राष्ट्रवादीची होणार युती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. परंतु, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षाची आघाडी होईल की नाही, ही बाब अजूनही स्पष्ट होऊ शकलेली नाही. तर, दुसरीकडे भाजप पक्ष मात्र पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

भाजप गेल्या वर्षभरापासूनच इलेक्शन मोडवर आहे. शनिवारी रात्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्ते, नेते, नगरसेवक यांना नागरिकांशी थेट संपर्क वाढवून त्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.

मागील १५ वर्षांपासून नागपूर महापालिकेवर भाजपची सत्ता असल्याने एंटीइनकंबंसीचा धोका आहे. त्यामुळे भाजप अधिक सक्रिय झाली आहे. लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी विस्तारकांची नियुक्ती केली जात आहे. प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या १५१ पैकी १०८ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत, परंतु मागील दोन वर्षांपासून मनपाकडून विकासकामे बंद आहेत. कोरोना संक्रमणाचा परिणामही निवडणुकीवर दिसून येत आहे. ज्या पक्षाचे नेते कोरोना काळात भूमिगत झाले होते त्यांना नागरिक स्वत:च बाहेर फेकण्याच्या मनस्थितीत आहेत.

शनिवारच्या बैठकीत हे निश्चित झाले की भाजप नगरसेवकांचे काम आणि त्यांचा असलेला जनसंपर्क याची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. यानंतरच तिकीट दिले जातील. कुणाचेही तिकीट निश्चित नसल्याचेही सांगितले जाते, परंतु भाजपने जास्तीत जास्त नगरसेवकांचे तिकीट कापले आणि नवीन उमेदवारांना संधी दिली तर त्याचा चुकीचा परिणामही पडू शकतो. भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मनपा निवडणूक पाहता काही अनुभवी नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. कोण किती प्रभावशाली राहील हे तर येणारी वेळच ठरवेल.

शनिवारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेबाबतही चर्चा झाली. गिरीश व्यास यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण होत आहे. त्यांच्या जागी कुणाला संधी द्यावी. यावरही चर्चा झाली. पदवीधर मतदारसंघात भाजपच्या संदीप जोशी यांना काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी मात दिली. त्यामुळे भाजप यावेळी अधिक दक्ष आहे.

काँग्रेसमधील गटबाजी कायम

काँग्रेसमध्ये अजूनही गटबाजी कायम आहे. मनपा निवडणुकीच्या तयारी संदर्भात काँग्रेसची अजूनपर्यंत एकही मोठी बैठक झालेली नाही. इतकेच नव्हे तर बूथ स्तरावरील कार्यकर्ते व नेत्यांची नियुक्ती सुद्धा झालेली नाही. मागील १५ वर्षांपासून सत्तेत असलेले भाजप काहीही करू न शकल्याने यावेळी त्यांना लाभ हाेईल, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. बहुतांश काँग्रेस नेते शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार नाही. त्यांचे म्हणणे आहे की, चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत राष्ट्रवादीला केवळ १ आणि शिवसेनेचे २ नगरसेवकच जिंकू शकले. त्यामुळे त्यांना अधिक जागा देण्याचे काहीच कारण नाही. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत लहान पक्षांना फायदा होत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस करणार युती

काँग्रेससाेबत आघाडी होत नसली तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्षाचे नेते यासाठी अनुकूल आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस २५-२५ जागांची मागणी करीत आहेत. तर काँग्रेस त्यांना १२ ते १५ जागा देण्याच्या मनस्थितीत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस उत्साहात आहे. त्यामुळे काँग्रेसवाले स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस