शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मनपा निवडणूक : आघाडीबाबत संभ्रम, भाजप लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 14:57 IST

सध्या १५१ पैकी १०८ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत, परंतु मागील दोन वर्षांपासून मनपाकडून विकासकामे बंद आहेत. कोरोना संक्रमणाचा परिणामही निवडणुकीवर दिसून येत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत, शिवसेना-राष्ट्रवादीची होणार युती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. परंतु, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षाची आघाडी होईल की नाही, ही बाब अजूनही स्पष्ट होऊ शकलेली नाही. तर, दुसरीकडे भाजप पक्ष मात्र पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

भाजप गेल्या वर्षभरापासूनच इलेक्शन मोडवर आहे. शनिवारी रात्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्ते, नेते, नगरसेवक यांना नागरिकांशी थेट संपर्क वाढवून त्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.

मागील १५ वर्षांपासून नागपूर महापालिकेवर भाजपची सत्ता असल्याने एंटीइनकंबंसीचा धोका आहे. त्यामुळे भाजप अधिक सक्रिय झाली आहे. लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी विस्तारकांची नियुक्ती केली जात आहे. प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या १५१ पैकी १०८ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत, परंतु मागील दोन वर्षांपासून मनपाकडून विकासकामे बंद आहेत. कोरोना संक्रमणाचा परिणामही निवडणुकीवर दिसून येत आहे. ज्या पक्षाचे नेते कोरोना काळात भूमिगत झाले होते त्यांना नागरिक स्वत:च बाहेर फेकण्याच्या मनस्थितीत आहेत.

शनिवारच्या बैठकीत हे निश्चित झाले की भाजप नगरसेवकांचे काम आणि त्यांचा असलेला जनसंपर्क याची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. यानंतरच तिकीट दिले जातील. कुणाचेही तिकीट निश्चित नसल्याचेही सांगितले जाते, परंतु भाजपने जास्तीत जास्त नगरसेवकांचे तिकीट कापले आणि नवीन उमेदवारांना संधी दिली तर त्याचा चुकीचा परिणामही पडू शकतो. भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मनपा निवडणूक पाहता काही अनुभवी नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. कोण किती प्रभावशाली राहील हे तर येणारी वेळच ठरवेल.

शनिवारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेबाबतही चर्चा झाली. गिरीश व्यास यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण होत आहे. त्यांच्या जागी कुणाला संधी द्यावी. यावरही चर्चा झाली. पदवीधर मतदारसंघात भाजपच्या संदीप जोशी यांना काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी मात दिली. त्यामुळे भाजप यावेळी अधिक दक्ष आहे.

काँग्रेसमधील गटबाजी कायम

काँग्रेसमध्ये अजूनही गटबाजी कायम आहे. मनपा निवडणुकीच्या तयारी संदर्भात काँग्रेसची अजूनपर्यंत एकही मोठी बैठक झालेली नाही. इतकेच नव्हे तर बूथ स्तरावरील कार्यकर्ते व नेत्यांची नियुक्ती सुद्धा झालेली नाही. मागील १५ वर्षांपासून सत्तेत असलेले भाजप काहीही करू न शकल्याने यावेळी त्यांना लाभ हाेईल, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. बहुतांश काँग्रेस नेते शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार नाही. त्यांचे म्हणणे आहे की, चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत राष्ट्रवादीला केवळ १ आणि शिवसेनेचे २ नगरसेवकच जिंकू शकले. त्यामुळे त्यांना अधिक जागा देण्याचे काहीच कारण नाही. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत लहान पक्षांना फायदा होत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस करणार युती

काँग्रेससाेबत आघाडी होत नसली तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्षाचे नेते यासाठी अनुकूल आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस २५-२५ जागांची मागणी करीत आहेत. तर काँग्रेस त्यांना १२ ते १५ जागा देण्याच्या मनस्थितीत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस उत्साहात आहे. त्यामुळे काँग्रेसवाले स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस