शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणूक : आघाडीबाबत संभ्रम, भाजप लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 14:57 IST

सध्या १५१ पैकी १०८ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत, परंतु मागील दोन वर्षांपासून मनपाकडून विकासकामे बंद आहेत. कोरोना संक्रमणाचा परिणामही निवडणुकीवर दिसून येत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत, शिवसेना-राष्ट्रवादीची होणार युती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. परंतु, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षाची आघाडी होईल की नाही, ही बाब अजूनही स्पष्ट होऊ शकलेली नाही. तर, दुसरीकडे भाजप पक्ष मात्र पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

भाजप गेल्या वर्षभरापासूनच इलेक्शन मोडवर आहे. शनिवारी रात्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्ते, नेते, नगरसेवक यांना नागरिकांशी थेट संपर्क वाढवून त्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.

मागील १५ वर्षांपासून नागपूर महापालिकेवर भाजपची सत्ता असल्याने एंटीइनकंबंसीचा धोका आहे. त्यामुळे भाजप अधिक सक्रिय झाली आहे. लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी विस्तारकांची नियुक्ती केली जात आहे. प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या १५१ पैकी १०८ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत, परंतु मागील दोन वर्षांपासून मनपाकडून विकासकामे बंद आहेत. कोरोना संक्रमणाचा परिणामही निवडणुकीवर दिसून येत आहे. ज्या पक्षाचे नेते कोरोना काळात भूमिगत झाले होते त्यांना नागरिक स्वत:च बाहेर फेकण्याच्या मनस्थितीत आहेत.

शनिवारच्या बैठकीत हे निश्चित झाले की भाजप नगरसेवकांचे काम आणि त्यांचा असलेला जनसंपर्क याची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. यानंतरच तिकीट दिले जातील. कुणाचेही तिकीट निश्चित नसल्याचेही सांगितले जाते, परंतु भाजपने जास्तीत जास्त नगरसेवकांचे तिकीट कापले आणि नवीन उमेदवारांना संधी दिली तर त्याचा चुकीचा परिणामही पडू शकतो. भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मनपा निवडणूक पाहता काही अनुभवी नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. कोण किती प्रभावशाली राहील हे तर येणारी वेळच ठरवेल.

शनिवारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेबाबतही चर्चा झाली. गिरीश व्यास यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण होत आहे. त्यांच्या जागी कुणाला संधी द्यावी. यावरही चर्चा झाली. पदवीधर मतदारसंघात भाजपच्या संदीप जोशी यांना काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी मात दिली. त्यामुळे भाजप यावेळी अधिक दक्ष आहे.

काँग्रेसमधील गटबाजी कायम

काँग्रेसमध्ये अजूनही गटबाजी कायम आहे. मनपा निवडणुकीच्या तयारी संदर्भात काँग्रेसची अजूनपर्यंत एकही मोठी बैठक झालेली नाही. इतकेच नव्हे तर बूथ स्तरावरील कार्यकर्ते व नेत्यांची नियुक्ती सुद्धा झालेली नाही. मागील १५ वर्षांपासून सत्तेत असलेले भाजप काहीही करू न शकल्याने यावेळी त्यांना लाभ हाेईल, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. बहुतांश काँग्रेस नेते शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार नाही. त्यांचे म्हणणे आहे की, चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत राष्ट्रवादीला केवळ १ आणि शिवसेनेचे २ नगरसेवकच जिंकू शकले. त्यामुळे त्यांना अधिक जागा देण्याचे काहीच कारण नाही. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत लहान पक्षांना फायदा होत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस करणार युती

काँग्रेससाेबत आघाडी होत नसली तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्षाचे नेते यासाठी अनुकूल आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस २५-२५ जागांची मागणी करीत आहेत. तर काँग्रेस त्यांना १२ ते १५ जागा देण्याच्या मनस्थितीत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस उत्साहात आहे. त्यामुळे काँग्रेसवाले स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस