शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

संघाच्या व्यासपीठावरून प्रणव मुखर्जींनी दिले देशभक्ती आणि लोकशाहीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 21:08 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समाऱंभासाठी संघस्थानी आलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणास सुरुवात झाली आहे.

नागपूर -  नागपूरमधील संघस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावरून देशभक्ती आणि लोकशाहीचे धडे दिले. भारतातील विविधता, हजारो वर्षांपासूनची समृद्ध संस्कृती, लोकशाहीचा वारसा, यांचा उल्लेख करत विविधतेच एकता हेच भारताचे सौंदर्य असल्याचे प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. तसेच विविधता असली तरी भारतीय हीच आपली ओखळ असली पाहिजे असे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समाऱंभासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. कॉंग्रेसच्या विचारधारेतून घडलेले प्रणव मुखर्जी यावेळी स्वयंसेवकांना नेमके काय उद्बोधन करणार, याकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. प्रणव मुखर्जी यांनीही आपल्या संबोधनामधून देशाच्या समृद्ध इतिहासाला उजाळा देतानाच विविधतेत एकतेची ताकद अधोरेखित करून सध्याच्या काळात येत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर टीकास्र सोडले.  

लोकशाहीत राष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वजनिक चर्चा झाली पाहिजे . चर्चेतून जाटिल समस्या दूर होऊ शकतात . महिलेवर अत्याचार होतो तेव्हा देशाच्या आत्मा जखमी होतो . हिंसाचार वाढतो आहे, देशात शाब्दिक व शारीरिक हिंसा व्हायला नको . संताप, हिंसा यापासून दूर जायला हवे . लोकशाहीत जनता ही केंद्रस्थानी असली पाहिजे. जनतेमधील एकता तोडण्यासाठी काहीही होता काम नये . सरकारचे लक्ष्य गरिबी दूर करणे , व आर्थिक विकासातून विकास साधणे हे असले पाहिजे . देशात एकात्मता वाढीस लागावी व आनंदी वातावरण वाढावे हे धोरण तयार करताना लक्षात घ्यायला हवे, असे  प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणातून सांगितले.   

प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

- जनतेच्या आनंदामध्येच सत्ताधाऱ्यांनी आनंद मानला पाहिजे 

-  महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे भारतीय राष्ट्रवाद भारतीय राष्ट्रवादास  आक्रमक किंवा विनाशकारी नव्हता 

- कुठल्याही प्रकारच्या हिंसेपासून समाजाने दूर राहण्याची गरज 

- चर्चेच्या माध्यमातूनच विविध विचारसरणी मानणाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढता येईल

- भारताला लोकशाही भेट म्हणून मिळालेली नाही 

- विविधता असूनही भारतीयता ही आमची ओळख

- हिंदू, मुस्लिम, शीख, ईशाई मिळून या देशाची ओळख पूर्ण होते, अनेक धर्म, वर्ण, भाषा हीच भारताची खरी ओळख 

- भाषा, वर्ण, धर्म आणि जातीमुळे राष्ट्रवाज प्रभावित होऊ शकत नाही 

- लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार असल्याचा नारा दिला 

- शेकडो वर्षांच्या परचक्रानंतरही आपल्या देशातील 5 हजार वर्षे जुन्या संस्कृतीला कुठलाही आक्रमक आणि  शासक संपवू शकला नाही

- असहिष्णुतेमुळे आपल्या देशाची राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते

- बौद्ध धर्माची देणगी भारतानेच जगाला दिली 

- युरोप आणि अन्य जगापूर्वीपासून भारत एक देश होता 

- वसुधैव कुटुंबकम हीच भारतीय राष्ट्रवादाची प्रेरणा

- विविधतेत एकता हेच भारताचे सौंदर्य 

- 1800 वर्षांपूर्वीपर्यंत भारत हे जगासाठी शिक्षण केंद्र

- देशासाठी समर्पण हीच देशसेवा 

- राष्ट्रवाद आणि देशभक्तीवर बोलण्यासाठी येथे आलो आहे 

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयnagpurनागपूर