शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

‘पॉवर पॉलिटिक्स’ने देशाचे नुकसान केले

By admin | Updated: July 21, 2014 00:49 IST

गेल्या काही वर्षांत राजकारणाची व्याख्याच काही नेत्यांनी बदलवून टाकली आहे. राजकारण म्हणजे केवळ ‘पॉवर पॉलिटिक्स’ झाले आहे. माध्यमांचे प्रतिनिधीही सातत्याने केवळ सत्ताकारणावरच लिहित आहे.

नितीन गडकरी : समाजकारण हेच राजकारणाचे स्वरूप नागपूर : गेल्या काही वर्षांत राजकारणाची व्याख्याच काही नेत्यांनी बदलवून टाकली आहे. राजकारण म्हणजे केवळ ‘पॉवर पॉलिटिक्स’ झाले आहे. माध्यमांचे प्रतिनिधीही सातत्याने केवळ सत्ताकारणावरच लिहित आहे. मुळात राजकारण हे सेवेचे आणि गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी असलेले क्षेत्र आहे. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारे नेते मोठे होत नाही. पण काहीही न करता माध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखती देत फिरणारे लोक मोठे नेते होतात, याची खंत वाटते. या ‘पॉवर पॉलिटिक्स’नेच आपल्या देशाचे खरे नुकसान केले आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. साई सभागृहात आयोजित डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सेवा कार्य पुरस्कार समारंभात ते बोलत होते. ‘पॉवर पॉलिटिक्स’मुळे छळवाद, अप्रामाणिकता, भ्रष्टाचार यांनाच महत्त्व मिळत आहे. प्रामाणिक सेवाभावींना महत्त्व दिले जात नाही. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे स्वरूप म्हणजे राजकारण आहे. पण जनतेच्या सेवांविषयी काही बोलले तर दिल्लीत कुणाला पटतच नाही. विचारभिन्नता हे जिवंतपणाचे लक्षण आहे, त्याचे स्वागत करायला हवे. पण हल्ली विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता आली आहे, त्याची चिंता वाटते. स्वातंत्र्यापूर्वी विशिष्ट विचारांनी समर्पित होऊन काम करणारी पिढी होती. आता अशी माणसे फारच कमी झाली आहेत. जॉर्ज फर्नांडिस समाजवादी विचारांचे नेते आहेत, पण मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्या प्रामाणिकपणावर कुणी शंका घेत असेल तर या देशात कुणीच प्रामाणिक नाही. समाजवादाने अनेक मोठे नेते या देशाला दिले आहेत. जातीच्या नावावर काही लोक निवडून येतात आणि ते जातीसाठी काहीच करीत नाही. स्वत:च्या कुटुंबातील लोकांना फारतर पदे मिळवून देतात. हे बदलले पाहिजे. सध्या जी विचारशून्यता आली आहे त्यात प्रत्येक संस्था, संघटनेने स्वत:ची वैचारिक भूमिका ठरविण्याची गरज आहे. काळसापेक्षता स्वीकारली पाहिजे. आता भाजपात अनेक लोक यायला तयार आहेत; कारण त्यांना सातत्याने सत्तेच्या जवळ राहायचे आहे. आमची सत्ता गेल्यावर ते बाहेर पडतील. हे लोक ना डावे आहेत ना उजवे. त्यांना कुठलाच विचार नाही, ते केवळ ‘अपॉर्च्युनिस्ट’ आहेत. आता यातून कुणाला थांबवावे आणि कुणाला नाही हा प्रश्न आहे, असे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)