शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
2
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
3
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
4
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
5
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
6
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
7
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
8
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
9
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
10
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
11
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
12
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
13
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
14
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
15
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
16
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
17
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
18
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
19
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
20
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप

‘पॉवर पॉलिटिक्स’ने देशाचे नुकसान केले

By admin | Updated: July 21, 2014 00:49 IST

गेल्या काही वर्षांत राजकारणाची व्याख्याच काही नेत्यांनी बदलवून टाकली आहे. राजकारण म्हणजे केवळ ‘पॉवर पॉलिटिक्स’ झाले आहे. माध्यमांचे प्रतिनिधीही सातत्याने केवळ सत्ताकारणावरच लिहित आहे.

नितीन गडकरी : समाजकारण हेच राजकारणाचे स्वरूप नागपूर : गेल्या काही वर्षांत राजकारणाची व्याख्याच काही नेत्यांनी बदलवून टाकली आहे. राजकारण म्हणजे केवळ ‘पॉवर पॉलिटिक्स’ झाले आहे. माध्यमांचे प्रतिनिधीही सातत्याने केवळ सत्ताकारणावरच लिहित आहे. मुळात राजकारण हे सेवेचे आणि गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी असलेले क्षेत्र आहे. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारे नेते मोठे होत नाही. पण काहीही न करता माध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखती देत फिरणारे लोक मोठे नेते होतात, याची खंत वाटते. या ‘पॉवर पॉलिटिक्स’नेच आपल्या देशाचे खरे नुकसान केले आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. साई सभागृहात आयोजित डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सेवा कार्य पुरस्कार समारंभात ते बोलत होते. ‘पॉवर पॉलिटिक्स’मुळे छळवाद, अप्रामाणिकता, भ्रष्टाचार यांनाच महत्त्व मिळत आहे. प्रामाणिक सेवाभावींना महत्त्व दिले जात नाही. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे स्वरूप म्हणजे राजकारण आहे. पण जनतेच्या सेवांविषयी काही बोलले तर दिल्लीत कुणाला पटतच नाही. विचारभिन्नता हे जिवंतपणाचे लक्षण आहे, त्याचे स्वागत करायला हवे. पण हल्ली विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता आली आहे, त्याची चिंता वाटते. स्वातंत्र्यापूर्वी विशिष्ट विचारांनी समर्पित होऊन काम करणारी पिढी होती. आता अशी माणसे फारच कमी झाली आहेत. जॉर्ज फर्नांडिस समाजवादी विचारांचे नेते आहेत, पण मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्या प्रामाणिकपणावर कुणी शंका घेत असेल तर या देशात कुणीच प्रामाणिक नाही. समाजवादाने अनेक मोठे नेते या देशाला दिले आहेत. जातीच्या नावावर काही लोक निवडून येतात आणि ते जातीसाठी काहीच करीत नाही. स्वत:च्या कुटुंबातील लोकांना फारतर पदे मिळवून देतात. हे बदलले पाहिजे. सध्या जी विचारशून्यता आली आहे त्यात प्रत्येक संस्था, संघटनेने स्वत:ची वैचारिक भूमिका ठरविण्याची गरज आहे. काळसापेक्षता स्वीकारली पाहिजे. आता भाजपात अनेक लोक यायला तयार आहेत; कारण त्यांना सातत्याने सत्तेच्या जवळ राहायचे आहे. आमची सत्ता गेल्यावर ते बाहेर पडतील. हे लोक ना डावे आहेत ना उजवे. त्यांना कुठलाच विचार नाही, ते केवळ ‘अपॉर्च्युनिस्ट’ आहेत. आता यातून कुणाला थांबवावे आणि कुणाला नाही हा प्रश्न आहे, असे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)