शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"मामला 'गंभीर' है..."! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
3
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
4
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
5
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
6
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
7
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
8
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
9
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
10
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
11
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
12
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
13
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
14
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
15
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
16
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
17
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
18
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
19
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
20
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉवर पॉलिटिक्स’ने देशाचे नुकसान केले

By admin | Updated: July 21, 2014 00:49 IST

गेल्या काही वर्षांत राजकारणाची व्याख्याच काही नेत्यांनी बदलवून टाकली आहे. राजकारण म्हणजे केवळ ‘पॉवर पॉलिटिक्स’ झाले आहे. माध्यमांचे प्रतिनिधीही सातत्याने केवळ सत्ताकारणावरच लिहित आहे.

नितीन गडकरी : समाजकारण हेच राजकारणाचे स्वरूप नागपूर : गेल्या काही वर्षांत राजकारणाची व्याख्याच काही नेत्यांनी बदलवून टाकली आहे. राजकारण म्हणजे केवळ ‘पॉवर पॉलिटिक्स’ झाले आहे. माध्यमांचे प्रतिनिधीही सातत्याने केवळ सत्ताकारणावरच लिहित आहे. मुळात राजकारण हे सेवेचे आणि गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी असलेले क्षेत्र आहे. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारे नेते मोठे होत नाही. पण काहीही न करता माध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखती देत फिरणारे लोक मोठे नेते होतात, याची खंत वाटते. या ‘पॉवर पॉलिटिक्स’नेच आपल्या देशाचे खरे नुकसान केले आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. साई सभागृहात आयोजित डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सेवा कार्य पुरस्कार समारंभात ते बोलत होते. ‘पॉवर पॉलिटिक्स’मुळे छळवाद, अप्रामाणिकता, भ्रष्टाचार यांनाच महत्त्व मिळत आहे. प्रामाणिक सेवाभावींना महत्त्व दिले जात नाही. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे स्वरूप म्हणजे राजकारण आहे. पण जनतेच्या सेवांविषयी काही बोलले तर दिल्लीत कुणाला पटतच नाही. विचारभिन्नता हे जिवंतपणाचे लक्षण आहे, त्याचे स्वागत करायला हवे. पण हल्ली विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता आली आहे, त्याची चिंता वाटते. स्वातंत्र्यापूर्वी विशिष्ट विचारांनी समर्पित होऊन काम करणारी पिढी होती. आता अशी माणसे फारच कमी झाली आहेत. जॉर्ज फर्नांडिस समाजवादी विचारांचे नेते आहेत, पण मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्या प्रामाणिकपणावर कुणी शंका घेत असेल तर या देशात कुणीच प्रामाणिक नाही. समाजवादाने अनेक मोठे नेते या देशाला दिले आहेत. जातीच्या नावावर काही लोक निवडून येतात आणि ते जातीसाठी काहीच करीत नाही. स्वत:च्या कुटुंबातील लोकांना फारतर पदे मिळवून देतात. हे बदलले पाहिजे. सध्या जी विचारशून्यता आली आहे त्यात प्रत्येक संस्था, संघटनेने स्वत:ची वैचारिक भूमिका ठरविण्याची गरज आहे. काळसापेक्षता स्वीकारली पाहिजे. आता भाजपात अनेक लोक यायला तयार आहेत; कारण त्यांना सातत्याने सत्तेच्या जवळ राहायचे आहे. आमची सत्ता गेल्यावर ते बाहेर पडतील. हे लोक ना डावे आहेत ना उजवे. त्यांना कुठलाच विचार नाही, ते केवळ ‘अपॉर्च्युनिस्ट’ आहेत. आता यातून कुणाला थांबवावे आणि कुणाला नाही हा प्रश्न आहे, असे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)