शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

coronavirus; स्थगित केलेल्या एका लग्नसोहळ्याची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 10:14 IST

बतकी कुटुंबाने वरपक्षाकडील लोकांना बोलावून लग्नसोहळा स्थगित करण्याचा विचार बोलला. वरपक्षानेही सामंजस्य दाखवत या निर्णयाचा स्वीकार केला.

ठळक मुद्देबतकी व डाहुले कुटुंबाचे धाडसी पाऊलशेकडोंच्या सुरक्षेचा विचार

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन दिवसावर लग्न येऊन ठेपले, गावोगावी नातेवाईकांकडे पत्रिका पोहचल्या... अगदी दुबईपर्यंतच्या नातेवाईकांकडे निरोप पोहचला...लग्नाचे लॉन बुक झाले, वधू-वराच्या घरी लग्नाची धामधूम सुरू झाली आणि तयारीत असलेले नातेवाईक लग्नसोहळ््यासाठी नागपूरकडे रवाना होणार...अशातच मोबाईलवर संदेश धडकला...लग्न सोहळा पुढे ढकलण्यात येत आहे... होय, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता येणाऱ्या पाहुण्यांच्या सुरक्षेचा विचार करता लग्न स्थगित करण्यात येत आहे, त्यामुळे लग्नाला येऊ नका...कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. या प्रभावातून महाराष्ट्रही सुटला नसून इतिहासातील सर्वात मोठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण या ‘कोरोना’मुळे लग्नकार्यच स्थगित करावं लागेल हा विचार मात्र कुणी केला नसेल. पण होय, नागपूरची अश्विनी बतकी आणि बुटीबोरीचा आकाश डाहुले यांचा स्थगित झालेला विवाह सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. झाले असे की, उदयनगरजवळच्या जानकीनगर येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या अण्णाजी बतकी यांची मुलगी अश्विनी हिचा विवाह ठरलेल्या मुहूर्तानुसार येत्या १९ मार्च रोजी बुटीबोरी निवासी विठ्ठलराव डाहुले यांचा मुलगा आकाश याच्याशी ठरला होता. दोन महिन्यांपूर्वी २३ जानेवारी रोजी लग्नाबाबत बोलणी आटोपल्यानंतर १६ फेब्रुवारीला साक्षगंध पार पडला. १९ मार्चला वासवी लॉन, बजाजनगर येथे सायंकाळी हा विवाह निर्धारित करण्यात आला. पत्रिका छापण्यात आल्या आणि पुणे, मुंबई, बंगरूळू आणि गावोगावच्या नातेवाईकांपर्यंत पोहचविण्यात आल्या. बतकी कुटुंबानुसार अगदी दुबईतील नातेवाईकांकडे त्या पोस्टाने पोहचविण्यात आल्या. इकडे वधूपक्ष आणि वरपक्षाकडेही तयारी सुरू झाली होती. लॉन बुक झाले, जेवणावळीचे आॅर्डरही निर्धारित झाले, लग्नासाठी आवश्यक असलेली सर्व खरेदी पूर्ण झाली. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. पण गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून थैमान घातलेल्या कोरोनामुळे लग्नावरही भीतीचे सावट निर्माण झाले आणि हळूहळू ते अधिक गडद होऊ लागले. लग्नात दोन-अडीच हजार लोक येणार, दूरवरून कुठूनही येणार... त्यातील एखादा कोरोनाबाधित असला तर... अशा शंकाकुशंकांनी चिंतेचे ढग दाटले होते. बतकी कुटुंबाकडे मोठे वडील, काका, मामा असे जवळचे नातेवाईक पोहचूनही गेले. पण काय करावे, हा विचार सतत चिंता वाढवत होता. लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले.अशात राज्य शासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला. यामुळे कायद्याचा बडगा आला तर, ही चिंतासुद्धा त्यात जुळली आणि शेवटी बतकी कुटुंबाने वरपक्षाकडील लोकांना बोलावून लग्नसोहळा स्थगित करण्याचा विचार बोलला. वरपक्षानेही सामंजस्य दाखवत या निर्णयाचा स्वीकार केला.

सर्वांकडून निर्णयाचे स्वागतबतकी कुटुंबाने जवळपास ७०० ते ८०० लोकांना मंगळवारी सकाळपासून लग्न स्थगित करण्यात आल्याचे संदेश पाठविले. तीच अवस्था डाहुले कुटुंबाचीही होती. विशेष म्हणजे आश्चर्य व्यक्त करतानाच सर्वांकडून या निर्णयाचे स्वागतही केले गेल्याची माहिती अण्णाजी बतकी यांनी सांगितली. तयारीसाठी केलेला खर्च, इतक्या दिवसांपासून मनात साठलेला उत्साह, या कशाचाही विचार न करता नागरिकांची सुरक्षा ध्यानात ठेवून घेतलेल्या निर्णयाने बतकी व डाहुले कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हॅँडवॉश, सॅनिटायझरची केली होती व्यवस्थाकोरोनाची भीती जरी असली तरी कुठल्याही परिस्थितीत विवाह करावा, यासाठी बतकी कुटुंबाचे प्रयत्न चालले होते. त्यासाठी दोन-अडीच हजार रुपयांचे सॅनिटायझर व हॅँडवॉशची व्यवस्था कुटुंबाने केली होती. वर-वधूच्या स्टेजवर जाणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझर आणि जेवणावळीकडे जाणाऱ्यांना हॅँडवॉश देण्याची व सुरक्षितता करण्याची तयारी चालविल्याचेही अण्णाजी यांनी सांगितले. पण मंगळवारी जमावबंदीचा आदेश धडकल्यानंतर सोहळाच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस