शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

विदर्भात दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 11:54 AM

पावसाळा आता संपत आला आहे. विभागातील मोठी जलाशये कोरडी आहेत. जलाशयांमध्ये केवळ ४६.२४ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाईचा धोका

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळा आता संपत आला आहे. विभागातील मोठी जलाशये कोरडी आहेत. जलाशयांमध्ये केवळ ४६.२४ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरीतील पाण्याची पातळी आधीच खोल गेली आहे. तेव्हा येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास भविष्यात पूर्व विदर्भात दुष्काळाचा धोका निर्माण झाला आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठी जलाशये आहेत. यांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी आहे. या आजच्या घडीला (१ आॅक्टोबर रोजी नोंदविल्यानुसार) केवळ १६४३.३९ दलघमी म्हणजेच ४६.२४ टक्के इतका साठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील मोठ्या जलशयामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची साठा क्षमता १०१६.८८ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३०५.१८ म्हणजेच ३०.०१ टक्के इतका साठा आहे. कामठी खैरीमध्ये ३८.१२ टक्के, रामटेकमध्ये ४५.३९ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूरमध्ये ६७.८९ टक्के, इटियाडोह ५२.७२ टक्के, पुजारीटोला ७१.९५ टक्के, कालीसरार ६०.२४ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा-२ मध्ये ३७.२१ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ८६.९३ टक्के, गडचिरोलीतील दीना प्रकल्पात ६९.१३ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर धरणात ३१.६१ टक्के, धाम प्रकल्पात ४०.७३ टक्के, लोवर वर्धा टप्पा-१ मध्ये ३१.४६ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द ४९.८२ टक्के, बावनथडी ४६.८२ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा पाहता पाण्याच्या नियोजनाचा विचार केल्यास नागपूर विभागात तीव्र पाणीटंचाईचा धोका आहे.वणा-पोथरा १०० टक्के भरले१८ मोठ्या प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातील केवळ लोवर नांद, वणा आणि वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. परंतु या धरणाची एकूण साठाक्षमताच कमी आहे. लोवर नांद, वणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ५३ दलघमी इतकी आहे. तर पोथरा प्रकल्पाची एकूण पाणीसाठा क्षमता केवळ ३५ दलघमी इतकी आहे. त्यामुळे ती पूर्ण भरली असली तरी भविष्यातील टंचाईचा सामना करण्यास पुरेशी ठरणार नाही.

प्रचंड मोठा दुष्काळ पडू शकतोपावसाळ्यात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी आधीच खाली गेली आहे. विदर्भातील बहुतांश शेती ही विहिरीवरच अवलंबून आहे. त्यामुळे पिकांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. खरीपातील काही पिके निघून जतील. परंतु रबीची पिके पाण्याअभावी नष्ट होतील. गहू, चणा, सूर्यफूल, फळबागा यांना मोठा फटका बसेल. कारण पिण्यासाठी पाणी ठेवले जाईल. शेतीला पाणी मिळणार नाही. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचीही मोठी टंचाई भासेल. येत्या काही दिवसात चंगला पाऊस झाला तर ठीक नाही तर प्रचंड मोठा दुष्काळ पडेल, हे निश्चित. यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.- श्रीधर ठाकरे , कृषितज्ज्ञ, अध्यक्ष-महाआॅरेंज

टॅग्स :droughtदुष्काळ