शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रेशनकार्डधारकासाठी आता पोर्टबिलिटीची सुविधा : महाराष्ट्रात पहिला प्रयोग नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:53 IST

मोबाईलप्रमाणे आता शिधापत्रिकाधारकांसाठी जिल्हा प्रशासनाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता रेशनकार्डधारकांना शहरातील कुठल्याही राशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, गेल्या तीन महिन्यात ३२६०१ रेशनकार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देतीन महिन्यात ३२ हजार शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ

आॅनलाईन लोकमतनागपूर : मोबाईलप्रमाणे आता शिधापत्रिकाधारकांसाठी जिल्हा प्रशासनाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता रेशनकार्डधारकांना शहरातील कुठल्याही राशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, गेल्या तीन महिन्यात ३२६०१ रेशनकार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंदर्भात ते म्हणाले की, ही यंत्रणा संपूर्ण संगणकीकृत करण्यात आली आहे. नागपूर शहरात अंत्योदय योजना व प्राधान्य गट योजनेच्या २,९४,९६८ शिधापत्रिका असून, ९८ टक्के शिधापत्रिका आधारशी लिंक झाल्या आहेत. आधारसंलग्नित झालेल्या शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ‘पॉस’ मशीनद्वारे नियमित धान्य वितरण प्रक्रिया सुरू आहे. संगणकीकरणामुळे रेशन दुकानदारांकडे असलेले धान्य, त्याने विक्री केलेले धान्य, शिल्लक असलेल्या धान्याचा साठा याचे १०० टक्के निरीक्षण ठेवणे शक्य झाले आहे. आधारशी लिंक केल्यामुळे गेल्या तीन महिन्यात ५,३७,७४१ पारदर्शी व्यवहार झाले आहेत. यात १३८८३ मेट्रीक टन धान्याची उचल केली आहे. या प्रणालीमुळे ५०४५.४४ मे.टन धान्याची बचत झाली आहे. तर होणार रेशनकार्ड रद्दशहरात २,९४,९६८ शिधापत्रिकाधारक आहे. गेल्या तीन महिन्यात शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानातून कुठलेही व्यवहार केले नाही, अशांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. रेशनप्रणाली आधारशी लिंक केल्यामुळे बोगस रेशनकार्डधारक सापडले जाणार असून, त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. तसेच आधारमुळे ५०४५.४४ मे.टन धान्याची बचत झाल्याने ५९००० रुपये उत्पन्न असलेल्या ए.पी.एल. शिधापत्रिकाधारकांचा समावेश अन्न सुरक्षा योजनेत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुर्वे म्हणाले. वितरण व्यवस्थेवर जीपीएसची नजरवितरण व्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जीपीएस प्रणाली राबविली आहे. त्यामुळे धान्य वाहतुकीच्या प्रत्येक टप्प्यावर ट्रॅकिंग करणे शक्य झाले आहे. यामुळे शासकीय धान्य गोदामातील हमाली, धान्यात येणारी तुट, धान्याच्या देखरेखीवर होणाऱ्या खर्चात तसेच इतर अनुषंगिक बाबींवर होणाऱ्या खर्चात बचत झाली आहे. दुकानदारांना १०० टक्के धान्य दुकानात मोजमाप करून प्राप्त होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. ७५०२७ प्रमाणपत्र पोहचले घरपोचलोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळणारे विविध प्रमाणपत्र घरपोच देण्यात येत आहे. किमान तीन दिवसात प्रमाणपत्र मिळत असल्याने नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान प्रशासनाने ७५०२७ प्रमाणपत्र घरपोच पोहचविले आहे. तसेच सातबारा उपलब्ध करून देण्यासाठी लावण्यात आलेल्या एटीएम मशीनचा १९३५४ शेतकऱ्यांनी वर्षभरात लाभ घेतला आहे. जिल्ह्यात २३७ कोटीची कर्जमाफीजिल्हाधिकारी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभीमानी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३९४४० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जवळपास २३७ कोटी २९ लक्ष ९३ हजार ६९१ रुपये ही कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. यात सर्वाधिक वाटा एनडीसीसी बँकेचा आहे. जिल्ह्यात १ लाखावर शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरले होते. परंतु यात काही त्रुटी होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी तालुकास्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसात त्रुटी दूर करून, उर्वरीत शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येण्यात येणार आहे. समृद्धीचा ८३ टक्के मार्ग मोकळासमृद्धी महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाला १५ गावातील २९९ हेक्टर जमिन संपादीत करायची आहे. ही जमिन २७२ शेतकऱ्यांकडून घ्यायची आहे. यातील २०२ शेतकऱ्यांनी जमिनीची रजिस्ट्री केली आहे. त्यात १५५ हेक्टर जमिन प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. उर्वरीत ७० शेतकऱ्यांसोबतही बोलणे सुरू आहे. अद्यापर्यंत समृद्धीचा ८३ टक्के मार्ग मोकळा झाला असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

टॅग्स :collectorतहसीलदारnagpurनागपूर