शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

नागपूर शहराचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 19:45 IST

नागपूर शहराच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेले धुलीकण (पर्टिकुलेट मॅटर-पीएम१०/२.५) मध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय सल्फर डायऑक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायऑक्साईट (एनओटू) आणि कार्बनही निम्म्याने घटले आहे.

ठळक मुद्देनीरीच्या संशोधकांचा अहवालधुलीकण, एसओटू, एनओटू, कार्बन निम्म्याने घटले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारी नियंत्रित करण्यासाठी लागलेल्या टाळेबंदीमुळे एकिकडे जनजीवन ठप्प पडले आहे पण दुसरीकडे याच टाळेबंदीमुळे प्रदूषण मात्र अनेक वर्षांच्या निचांकीवर आले आहे. कोट्यवधी खर्च करून जे शक्य झाले नसते ते टाळेबंदीने शक्य झाले. शहराच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेले धुलीकण (पर्टिकुलेट मॅटर-पीएम१०/२.५) मध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय सल्फर डायऑक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायऑक्साईट (एनओटू) आणि कार्बनही निम्म्याने घटले आहे.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) च्या वैज्ञानिकांनी लॉकडाउनपूर्वी आणि नंतर घेतलेल्या हवेतील नमुन्यांच्या अभ्यासातून प्रदूषणामध्ये झालेला हा बदल स्पष्ट होत असल्याचे सांगितले. सीएसआयआर-नीरीच्या वायु प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रमुख आणि मुख्य वैज्ञानिक डॉ. के.व्ही. जॉर्ज यांच्या मार्गदर्शनात नीरीचे प्रमुख संशोधक डॉ. नीलकमल यांच्या चमूने हा अभ्यास केला. या अभ्यासात लॉकडाउनपूर्वी सामान्य जनजीवन असताना २० फेब्रुवारी ते २० मार्च या काळातील व लॉकडाउननंतर २१ मार्च ते १७ एप्रिलपर्यंतचे हवेचे नमुने तपासण्यात आले. नागपूर शहरात सामान्य जनजीवन असताना सर्वाधिक प्रदूषण हे धुलीकणांचे असते. ते सरासरी ६० ते ७० मायक्रोग्रॅम/मीटर क्यूब पासून १२०म्युग्रॅ/मी. क्यूबची धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचला आहे. मात्र लॉकडाउनमुळे ही पातळी ४० ते ४७ म्युग्रॅ/मी.क्यूब पर्यंत खाली आली आहे. पीएम-१० ६० ते ७० युनिटवरून ४७ वर आले आहे तर पीएम-२.५ चा स्तर २३ युनिटपर्यंत खाली आला आहे.दुसरीकडे रस्त्यावर वाहनसंख्या कमालीची घटल्याने एनओटूचे प्रमाणही घटले आहे. एनओटू ४८ म्यूग्रॅ/मी.क्यूबवरून २५ म्यूग्रॅ/मी.क्यूब पर्यंत खाली घसरला आहे. परिसरात उर्जा प्रकल्पामुळेही शहरातील प्रदूषणात कायम वाढ आलेली आहे. दरम्यान फेब्रुवारी ते एप्रिलच्या काळात हवेचा प्रवाह जमिनीपासून २४० मीटरवरून उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पश्चिमच्या दिशेने असल्याने नागपूर शहर एसओटूच्या प्रदूषणापासूनही मुक्त राहिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एसओटूचे प्रमाण ९ म्यूग्रॅ/मी.क्यूबवरून २ म्यूग्रॅ/मी.क्यूवर घसरले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान सायंकाळच्या वेळी तापमान कमी होत असल्याने प्रदूषणाच्या वर जाण्याची प्रक्रिया खंडित होत असल्याने पीएम-२.५ मध्ये थोडी वाढ होत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :pollutionप्रदूषणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस