शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 08:10 IST

राजकारण असा धंदा ज्यात शिव्या खायची तयारी ठेवावी लागते असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणाविषयी त्यांचे रोखठोक मत नेहमीच उघडपणे मांडत असतात. राजकारणाविषयी त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांची याआधीही  जोरदार चर्चा झाली आहे. अशातच आता नागपूर येथे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण असा धंदा ज्यात शिव्या खायची तयारी ठेवावी लागते असं विधान केलं आहे. तसेच महिलांसाठी आम्ही योजना देत असू तर तुम्हाला पोटदुखी होण्याचे कारण काय? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला आहे.

शुक्रवारी वीजनिर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती खापरखेडा भव्य कामगार मेळावा आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. “मी वर्ष ३५ राजकारणात विविध पदावंर आहे. कर्तव्यपूर्ती केल्यानंतर जनतेने आमचे आभार मानन्याचा निर्णय घेतला. ३५ वर्षांत मी असं पहिल्यांदा पाहतोय की, ज्यांच्यासाठी काम केले, ते लोक आभार मानन्यासाठी पुन्हा बोलवत आहेत. कारण राजकारण असा धंदा आहे जिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिव्या खाण्याची तयारी असेल तरच तुम्ही जनतेला न्याय देऊ शकता. कारण या शिव्या नसतात तर सामान्य माणसाच्या अपेक्षा असतात”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

“वीज कंत्राटी कामगारांचे कल्याण करायचे असेल तर बावनकुळे-फडणवीस जोडी असेल तरच हे कल्याण होऊ शकते. २०१९ साली चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला ज्यामुळे कंत्राटी कामगारांचा फायदा झाला. आताही बावनकुळे यांनीच पुढाकार घेतल्यामुळे कंत्राटी कामगाराचा लाभ होत आहे. ऊर्जा खाते चालवत असताना बावनकुळेच माझे मार्गदर्शक आहेत”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी बोलताना लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांचे सहकारी उच्च न्यायालयात गेले आहेत, असेही फडणवीसांनी सांगितले. आमच्या बहि‍णींची योजना बंद करायची भाषा कराल, तर पुढचे पाच वर्ष सोडाच पण २५ वर्ष तुम्ही सत्तेत येणार नाहीत. आम्ही जर महिलांसाठी, बहि‍णींसाठी योजना देत असू तर तुम्हाला पोटदुखी होण्याचे कारण काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केला.

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. "काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षणाविरोधात भूमिका मांडली. त्यांना वाटले आपण दुसऱ्या देशात बोललो तर कुणाला कळणार नाही. पण आजकाल मसणातही मिडिया असतो. हे त्यांना बहुधा माहिती नसावे. त्यांनी आरक्षण कसे बंद करणार याबाबतचा कार्यक्रम सांगितला आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरBJPभाजपाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा