शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वीज थकबाकीवरून आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 12:12 IST

दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे.

ठळक मुद्देनितीन राऊत म्हणतात थकबाकीमुळे महावितरणची दुरवस्थाचंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, आम्ही कंपनी नफ्यात चालवली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीज थकबाकीच्या विषयावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या काळात बावनकुळे ऊर्जामंत्री होते. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये राऊत हा भार वाहत आहेत. दोन्ही नेत्यांना या विभागातील इत्थंबूत माहिती आहे. त्यामुळे या दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे.

महावितरण कंपनीची ग्राहकांवर प्रचंड थकबाकी असल्याने कंपनीची दुरवस्था झाली आहे. कंपनी टिकवायची असेल तर ही थकबाकी वसूल केल्याशिवाय पर्याय नाही, असे महावितरणतर्फे सातत्याने सांगितले जात आहे. मंगळवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीसुद्धा विधानसभेत महावितरणच्या दुरवस्थेचा पाढा वाचला. महावितरण कंपनीची ग्राहकांवर तब्बल ६४ हजार कोटीची थकबाकी वाढली असल्याचे सांगितले. यातच थकबाकीमुळे शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे कनेक्शन तोडले जात असल्याच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी दोन पावले मागे येत कृषी वीज कनेक्शन तोडण्यास तीन महिन्यांची स्थगिती दिली.

ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिमटा काढला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, फडणवीस सरकारच्या काळात आम्ही तब्बल ४५ लाख शेतकऱ्यांना वीज दिली. पाच वर्षांत २५ हजार कोटींची वीज दिली. एक पैसाही घेतला नाही. एकाही शेतकऱ्याची वीज कापली नाही. इतके करूनही आमच्या सरकारमध्ये वीज कंपनी तेव्हा ४७१५ कोटीने नफ्यात होती. या सरकारच्या काळात थकबाकी वाढली. शेतकरी कायम अडचणीत आहे. आत्महत्या होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज कापली जाऊ नये. आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणelectricityवीजNitin Rautनितीन राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाFarmerशेतकरी