शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

वीज थकबाकीवरून आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 12:12 IST

दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे.

ठळक मुद्देनितीन राऊत म्हणतात थकबाकीमुळे महावितरणची दुरवस्थाचंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, आम्ही कंपनी नफ्यात चालवली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीज थकबाकीच्या विषयावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या काळात बावनकुळे ऊर्जामंत्री होते. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये राऊत हा भार वाहत आहेत. दोन्ही नेत्यांना या विभागातील इत्थंबूत माहिती आहे. त्यामुळे या दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे.

महावितरण कंपनीची ग्राहकांवर प्रचंड थकबाकी असल्याने कंपनीची दुरवस्था झाली आहे. कंपनी टिकवायची असेल तर ही थकबाकी वसूल केल्याशिवाय पर्याय नाही, असे महावितरणतर्फे सातत्याने सांगितले जात आहे. मंगळवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीसुद्धा विधानसभेत महावितरणच्या दुरवस्थेचा पाढा वाचला. महावितरण कंपनीची ग्राहकांवर तब्बल ६४ हजार कोटीची थकबाकी वाढली असल्याचे सांगितले. यातच थकबाकीमुळे शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे कनेक्शन तोडले जात असल्याच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी दोन पावले मागे येत कृषी वीज कनेक्शन तोडण्यास तीन महिन्यांची स्थगिती दिली.

ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिमटा काढला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, फडणवीस सरकारच्या काळात आम्ही तब्बल ४५ लाख शेतकऱ्यांना वीज दिली. पाच वर्षांत २५ हजार कोटींची वीज दिली. एक पैसाही घेतला नाही. एकाही शेतकऱ्याची वीज कापली नाही. इतके करूनही आमच्या सरकारमध्ये वीज कंपनी तेव्हा ४७१५ कोटीने नफ्यात होती. या सरकारच्या काळात थकबाकी वाढली. शेतकरी कायम अडचणीत आहे. आत्महत्या होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज कापली जाऊ नये. आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणelectricityवीजNitin Rautनितीन राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाFarmerशेतकरी