शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वीज थकबाकीवरून आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 12:12 IST

दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे.

ठळक मुद्देनितीन राऊत म्हणतात थकबाकीमुळे महावितरणची दुरवस्थाचंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, आम्ही कंपनी नफ्यात चालवली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीज थकबाकीच्या विषयावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या काळात बावनकुळे ऊर्जामंत्री होते. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये राऊत हा भार वाहत आहेत. दोन्ही नेत्यांना या विभागातील इत्थंबूत माहिती आहे. त्यामुळे या दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे.

महावितरण कंपनीची ग्राहकांवर प्रचंड थकबाकी असल्याने कंपनीची दुरवस्था झाली आहे. कंपनी टिकवायची असेल तर ही थकबाकी वसूल केल्याशिवाय पर्याय नाही, असे महावितरणतर्फे सातत्याने सांगितले जात आहे. मंगळवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीसुद्धा विधानसभेत महावितरणच्या दुरवस्थेचा पाढा वाचला. महावितरण कंपनीची ग्राहकांवर तब्बल ६४ हजार कोटीची थकबाकी वाढली असल्याचे सांगितले. यातच थकबाकीमुळे शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे कनेक्शन तोडले जात असल्याच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी दोन पावले मागे येत कृषी वीज कनेक्शन तोडण्यास तीन महिन्यांची स्थगिती दिली.

ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिमटा काढला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, फडणवीस सरकारच्या काळात आम्ही तब्बल ४५ लाख शेतकऱ्यांना वीज दिली. पाच वर्षांत २५ हजार कोटींची वीज दिली. एक पैसाही घेतला नाही. एकाही शेतकऱ्याची वीज कापली नाही. इतके करूनही आमच्या सरकारमध्ये वीज कंपनी तेव्हा ४७१५ कोटीने नफ्यात होती. या सरकारच्या काळात थकबाकी वाढली. शेतकरी कायम अडचणीत आहे. आत्महत्या होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज कापली जाऊ नये. आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणelectricityवीजNitin Rautनितीन राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाFarmerशेतकरी