शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वीज थकबाकीवरून आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 12:12 IST

दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे.

ठळक मुद्देनितीन राऊत म्हणतात थकबाकीमुळे महावितरणची दुरवस्थाचंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, आम्ही कंपनी नफ्यात चालवली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीज थकबाकीच्या विषयावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या काळात बावनकुळे ऊर्जामंत्री होते. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये राऊत हा भार वाहत आहेत. दोन्ही नेत्यांना या विभागातील इत्थंबूत माहिती आहे. त्यामुळे या दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे.

महावितरण कंपनीची ग्राहकांवर प्रचंड थकबाकी असल्याने कंपनीची दुरवस्था झाली आहे. कंपनी टिकवायची असेल तर ही थकबाकी वसूल केल्याशिवाय पर्याय नाही, असे महावितरणतर्फे सातत्याने सांगितले जात आहे. मंगळवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीसुद्धा विधानसभेत महावितरणच्या दुरवस्थेचा पाढा वाचला. महावितरण कंपनीची ग्राहकांवर तब्बल ६४ हजार कोटीची थकबाकी वाढली असल्याचे सांगितले. यातच थकबाकीमुळे शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे कनेक्शन तोडले जात असल्याच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी दोन पावले मागे येत कृषी वीज कनेक्शन तोडण्यास तीन महिन्यांची स्थगिती दिली.

ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिमटा काढला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, फडणवीस सरकारच्या काळात आम्ही तब्बल ४५ लाख शेतकऱ्यांना वीज दिली. पाच वर्षांत २५ हजार कोटींची वीज दिली. एक पैसाही घेतला नाही. एकाही शेतकऱ्याची वीज कापली नाही. इतके करूनही आमच्या सरकारमध्ये वीज कंपनी तेव्हा ४७१५ कोटीने नफ्यात होती. या सरकारच्या काळात थकबाकी वाढली. शेतकरी कायम अडचणीत आहे. आत्महत्या होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज कापली जाऊ नये. आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणelectricityवीजNitin Rautनितीन राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाFarmerशेतकरी