शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

गडकरींच्या धापेवाड्यात राजकीय उलथापालथ; काॅंग्रेसच्या सरपंचच पतीला घेऊन भाजपात आल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 22:17 IST

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मंगला राजेश शेटे अवघ्या सहा मताने भाजपाच्या उमेदवार निशा सुधाकर खडसे यांना पराभूत केले होते.

कळमेश्वर : धापेवाडा ग्राम पंचायतीच्या काँग्रेसच्या सरपंच मंगला शेटे यांनी बुधवारी पारडसिंगा येथील महिला मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यामुळे धापेवाड्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. प्रवेशाच्या निमित्ताने का होईना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाड्यात भाजपचा झेंडा रोवण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यश आले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी मंगला शेटे यांचे पती माजी उपसंरपंच राजेश शेटे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता.

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मंगला राजेश शेटे अवघ्या सहा मताने भाजपाच्या उमेदवार निशा सुधाकर खडसे यांना पराभूत केले होते. या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाचे दहा सदस्य, भाजपा समर्पित गटाचे सहा सदस्य तर एक सदस्य अपक्ष म्हणून निवडून आले होते. सरपंच मंगला शेटे व पाच सदस्यांवर अतिक्रमण केले म्हणून यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी तक्रार भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आली होती. तशीच तक्रार काँग्रेसकडून भाजपा समर्थित गटाच्या सहा सदस्यांविरुद्ध दाखल करण्यात आली होती.

आपले पद जाईल या भितीने शेटे यांनी भाजपात प्रवेश केला असल्याची राजकीय वतुर्ळात चर्चा आहे. तर आपण विकास कामांसाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले. शेटे यांच्यासोबत सध्यातरी काँग्रेसचे एकही सदस्य गेलेले नाहीत. मात्र, भविष्यात दोन ते तीन सदस्य येतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे. शेटे यांच्या भाजप प्रवेशाने काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षप्रवेशामागे भाजप नेते डॉ. राजीव पोतदार, दिलीप धोटे, डॉ. मनोहर काळे, रवी पवार, रमेशजी राजगुरे, मंगेश कोठाडे, देवेन मानकर आदींची महत्वाची भूमिका असून हे सर्व प्रवेशाच्यावेळी उपस्थित होते.

असा आहे धापेवाड्याचा राजकीय इतिहास

धापेवाडा ग्रामपंचायतच्या १९४८ ते २०२३ या ७५ वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेसचे ९ तर भाजपा समर्पित गटाचे ८ सरपंच्यांनी कारभार बघितला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वडील जयराम गडकरी यांनीही येथे सरपंच म्हणून वर्षभर कारभार पाहिला आहे. येथे काँग्रेसने ४० वर्षांहून अधिक काळ दबदबा कायम ठेवला. २०१८ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी सत्तारूढ भाजपाची सत्ता उलथवून टाकीत कॉग्रेसला निर्विवाद बहुमत दिले होते. या ग्रामपंचायत मध्ये कॉग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार सुरेश मारोतराव डोंगरे यांनी १७५० मतांनी विजय संपादन केला होता. तसेच १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १६ सदस्य सुद्धा काॅंग्रेस समर्थीत गटाचे विजयी झाले होते. काॅंग्रेसने हिच घोडदौड कायम ठेवत २०२३ च्या ग्रामपंचायत निवडणुकीतही सरपंचासह दहा सदस्य निवडून आणले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाcongressकाँग्रेस