शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

राजकीय ‘नेता’जी

By admin | Updated: July 19, 2014 02:28 IST

विद्यार्थी जीवनापासून सातत्याने विविध सामाजिक

एका शब्दावर कार्यकर्त्यांची फळी कामाला लागायचीनागपूर : विद्यार्थी जीवनापासून सातत्याने विविध सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग असणाऱ्या नेताजींचा लोकसंग्रह विलक्षण होता. त्यांच्या एका शब्दावर कार्यकर्त्यांची फळी कामाला लागत होती. त्यामुळे सामाजिक चळवळीत त्यांचे वजन वाढले. स्वाभाविकपणे राजकीय पक्षांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण होतेच. यातूनच नेताजी सीपीआय पक्षात दाखल झाले. जवळपास १५ वर्षे पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी आणि दलित चळवळीला पाठबळ दिले. याशिवाय प्रत्येक डाव्या, पुरोगामी चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध राहिला. त्यानंतर १९९० साली जनता दलाचे आमदार म्हणून ते यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून निवडून आले. आमदार म्हणूनही त्यांची कारकीर्द वादळी राहिली. हा माणूस नेता असला तरी सामान्य माणसाशी कायम जुळून राहिला. त्यामुळेच नेताजींबद्दल आपला माणूस असल्याची भावना लोकांमध्ये सातत्याने राहिली. आमदार असतानाच ते अनुसूचित जमाती कल्याण मंडळाचे अध्यक्ष राहिले. सांस्कृतिक क्षेत्रातील काम नेताजींना नाट्यविषयक आवड होती. सामाजिक काम उभारताना लोकांना एखादा विषय समजावून सांगण्यासाठी पथनाट्यांचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांचे मत होते. त्यामुळे कला क्षेत्राशी ते जुळले होते. अनेकांनी त्यांना नाटक लिहिण्याची विनंती केली होती पण ते या प्रकाराकडे वळले नाहीत. त्यांनी विपुल लेखन केले आहे. विविध विषयावरचे त्यांचे वृतपत्रीय लेखन गाजले. हे लेखन पुस्तकरूपाने यावे, म्हणून अनेकांनी त्यांना गळ घातली पण नेताजी सातत्याने सामाजिक चळवळीतच गुंतून राहिले. त्यामुळे त्यांचे पुस्तक आले नाही. नागपुरात नुकतेच अण्णाभाऊ साठे राज्यस्तरिय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. हे संमेलन आयोजित करण्यात नेताजी राजगडकर यांचा पुढाकार सर्वविदित आहे. विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यानंतर आकाशवाणीतही त्यांनी वृत्तनिवेदक म्हणून काम केले. या दरम्यान विविध वृत्तपत्रात सामाजिक प्रबोधन करणारे त्यांचे स्तंभलेखन चांगलेच गाजले. आदिवासी, दलित आणि डाव्या, पुरोगामी चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या निधनाने अनेक संस्थांचा मार्गदर्शक दीपस्तंभ कोसळला आहे. (प्रतिनिधी)