शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाची विषारी मगरमिठी : जीव कासावीस, जंगल काळवंडले, जमीन करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 11:53 IST

भरपूर पाणी, सुपीक जमीन आणइ नजर पोहोचेल तिथपर्यंत जंगल, वनसंपदा व वन्यप्राण्यांनी संपन्न व समृद्ध अशा विदर्भाला महाभयंकर विषारी प्रदूषणाचा डाग लागला आहे. विकासाच्या नावाने आलेले जवळपास सगळे प्रकल्प पर्यावरणाची हानी करणारे, निसर्गसंपदेचा ऱ्हास घडविणारेच निघाले. परिणामी जमिनी करपल्या, जलप्रदूषण वाढले, हवा दूषित झाली, जंगले काळी पडू लागली. विदर्भाचा हा समृद्ध ठेवा काळवंडला.

ठळक मुद्देभूगावच्या उत्तम गलवा स्टील कंपनीतून वातावरणात विषाची फवारणी

नरेश डोंगरे / कमल शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लाेहखनिज पिघळवून लोखंड तयार करणाऱ्या, त्यासाठी वातावरणात सतत आग ओकणाऱ्या वर्धेनजीकच्या भूगाव येथील लॉयडस् अर्थात उत्तम गलवा स्टील प्लांटमुळे भूगावसह आजूबाजूच्या गावातील जीव, जंगल, जल अन् जमीन अक्षरश: करपली आहे. या प्रदूषणाबद्दल सातत्याने होत असलेल्या तक्रारींची दखल घेत लोकमत चमूने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत अत्यंत धक्कादायक वास्तव उजेडात आले असून, शेतकरी तसेच पशु-पक्ष्यांच्या जिवावर उठलेल्या आणि सोबतच बेरोजगारांची कोंडी करणाऱ्या या कारखान्याची दादागिरी खपवून कशी घेतली जाते, असा कळीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

परिसरावर काळा थर

लोखंड तयार करणाऱ्या या कारखान्याच्या चिमण्या वरून विषारी धूर ओकतात तर कारखान्यातून निघालेले लोहमिश्रीत विषारी रसायन मागच्या भागातून खोदलेल्या नाल्यातून सोडले जाते. या लोटामुळे आजूबाजूची जमीन बंजर, नापीक बनली. जमिनीची उत्पादनक्षमता कमालीची घटली असून, इतर भागात एकरी ५ ते ७ क्विंटल कापूस होत असेल तर कारखान्याच्या नाल्यालगतच्या शेतात एकरी २ ते ३ क्विंटलच कापूस निघू लागला. या कापसाची प्रत (दर्जा) ही निकृष्टच. त्यामुळे बाजारात पाच ते सात हजार रुपये क्विंटल कापसाला भाव मिळत असताना या भागातील कापूस कुणी तीन हजारांत घ्यायला तयार नसल्याचे गाऱ्हाणे शेतकरी मांडतात. सोयाबीन, ज्वारी, गहू अन् हरभऱ्यासह तुरीचीही हीच व्यथा. कारण ही सर्वच उत्पादने काळेपण घेऊन बाहेर येतात. धुराच्या लोळांमुळे पिकांवर, पाना-फुलांवर काळ्या क्षाराचा थर चढलेला दिसतो. हा काळेपणा काढण्यासाठी पीक धुवून काढले जाऊ शकत नाही. त्यामुळे मिळालेल्या भावात शेतकरी आपला माल विकून मिळेल ते पदरात पाडून घेतात.

साठे-घंगारेंनी पाहिलेले स्वप्न आणि आजची वाताहत

वर्धेतून सतत लोकसभेवर निवडून जाणारे दिवंगत काँग्रेस नेते वसंतराव साठे व त्यांचे प्रतिस्पर्धी रामचंद्र घंगारे यांच्या राजकीय जुगलबंदीतून लॉयडस् स्टील कारखाना उभा राहिला. वर्धेच्या विकासासाठी काय करता, बेरोजगारांच्या हाताला काम देणारा कोणता मोठा प्रकल्प आणला, असा प्रश्न कॉ. घंगारे हे साठेंना विचारायचे. ‘मी कारखाना आणीन अन् तुम्ही लेबर युनियन उभी करून तो बंद पाडाल’, असे साठे यांचे घंगारेंना प्रत्युत्तर असायचे. तेव्हा १९९२-९३च्या दरम्यान घंगारे यांनी साठे यांना जाहीर सभांमधून ‘तुम्ही कारखाना आणा, मी कामगार संघटना उभी करणार नाही’, असे वचन दिले. त्यातूनच त्यावेळी पोलाद मंत्री असलेल्या साठे यांनी वर्धेत लॉयडस् स्टील प्लांट आणला. हा कारखाना वर्धा जिल्ह्याच्या विकासाला चालना देईल, भरपूर रोजगार निर्माण होईल, सामान्यांच्या हातात पैसा खुळखुळेल, जीवनमान सुखकर होऊन बाजारपेठा फुलतील, असे स्वप्न होते. १९९५-९६च्या दरम्यान लॉयडसचे उत्पादन सुरू झाले. पाच-सात वर्षे ठिकठाक सुरू होते. नंतर कारखान्याला घरघर लागली. कारखाना डबघाईस येणे सुरू झाले. कामगारांचे प्रश्न, सुविधा, सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले. कारखान्याच्या आत आणि बाहेर संघर्ष वाढला. त्यामुळे दिवाळखोरीत ढकलला गेलेला कारखाना अखेर लॉयडस् प्रशासनाने उत्तम गलवा कंपनीकडे सोपवला.

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषणnagpurनागपूर