शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वाडी येथील स्मशानभूमीची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST

सुरेश फलके लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : नागपूर शहरालगत असलेली वाडी ही जिल्ह्यात माेठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली नगर ...

सुरेश फलके

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : नागपूर शहरालगत असलेली वाडी ही जिल्ह्यात माेठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली नगर परिषद आहे. मात्र, येथील स्मशानभूमीची अवस्था तेवढीच दयनीय झाली आहे. या स्मशानभूमीतील दहन शेडचे छप्पर गायब असून, खुर्च्याही तुटलेल्या असल्याने नागरिकांची गैरसाेय हाेते. शिवाय, संपूर्ण आवारात घाण व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

शहरातील विविध समस्या साेडविण्याबाबत स्थानिक लाेकप्रतिनिधी गंभीर नसतात, असा आराेप नागरिकांनी केला आहे. पालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक ताेंडावर आली असताना शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सांडपाण्याची भूमिगत नाली, डम्पिंग यार्ड, अतिक्रमण, स्मशानभूमीची दुरवस्था या समस्या साेडविण्यात पालिका प्रशासनाला अद्याप यश आले नाही.

वाडी शहराची लाेकसंख्या एक लाखाच्या वर असून, अंत्यसंस्कारासाठी शहरात दाेन स्मशानभूमी आहेत. टेकडी वाडी येथील स्मशानभूमीत चार दहन शेड तयार करण्यात आले आहेत. यातील एकाचे शेड पूर्णपणे गायब असून, दाेन ओट्यांवरील छत पूर्णपणे तुटल्याने निकामी झाले आहेत. येथे येणाऱ्यांना विश्रांती घेता यावी म्हणून सिमेंटच्या खुर्च्या लावल्या हाेत्या. त्या तुटल्याने विश्रांती घेण्यासाठी बसावे कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडताे.

स्मशानभूमीच्या आवाराची नियमित साफसफाई केली जात नसल्याने आवारात कचरा व घाण पसरली आहे. या स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागते. या समस्या साेडविण्याची पालिका प्रशासनाकडे अनेकदा मागणी करण्यात आली. परंतु, काेरड्या आश्वासनाशिवाय नागरिकांच्या पदरात काहीही पडले नाही.

...

नागरिकांचा अपेक्षाभंग

वाडी ग्रामपंचायतचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त हाेणार असल्याने येथील मूलभूत समस्या मार्गी लागतील,अशी स्थानिक नागरिकांना अपेक्षा हाेती. या पाच वर्षांत शहरातील बाेटावर माेजण्याइतक्या समस्या साेडविण्यात आल्या असून, अनेक मूलभूत समस्या ‘जैसे थे’च आहेत. स्थानिक लाेकप्रतिनिधी स्वार्थी राजकारणापलीकडे विचार करीत नसल्याने वाडी शहर समस्याचे माहेरघर बनले आहे. त्यातूनच अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

...

साैंदर्यीकरण रखडले

काही वर्षांपूर्वी या स्मशानभूमीच्या साैंदर्यीकरणाचा प्रसताव पालिका प्रशासनाने तयार करून ताे मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला हाेता. त्या प्रस्तावावर अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही. त्याचा पाठपुरावा करण्याची तसदीही पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व स्थानिक लाेकप्रतिनिधी घेत नाहीत. या समस्या वेळीच साेडविल्या जात नसल्याने त्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत असून, त्याचा त्रास केवळ सामान्य नागरिकांनाच सहन करावा लागताे.