शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नागपुरातील कचऱ्यापासून वीज तयार करण्याची योजना संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:04 AM

कचऱ्यापासून वीज तयार करणारी महत्त्वाकांक्षी योजना संकटात सापडली आहे. मे २००७ मध्ये या योजनेसाठी मनपाने एस्सेल समूह व हिताची जोसन लि.शी करार केला होता. परंतु अजूनपर्यंत ही योजना साकार करण्याच्या दिशेने काहीही झालेले नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एस्सेल समूहाच्या अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांचा ‘क्लास’ घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, तातडीने काम सुरू न झाल्यास ते महापालिकेला करार रद्द करण्याची शिफारस करतील.

ठळक मुद्देगडकरींनी घेतला एस्सेलच्या अधिकाऱ्यांचा क्लास : काम सुरू न झाल्यास रद्द होणार करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचऱ्यापासून वीज तयार करणारी महत्त्वाकांक्षी योजना संकटात सापडली आहे. मे २००७ मध्ये या योजनेसाठी मनपाने एस्सेल समूह व हिताची जोसन लि.शी करार केला होता. परंतु अजूनपर्यंत ही योजना साकार करण्याच्या दिशेने काहीही झालेले नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एस्सेल समूहाच्या अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांचा ‘क्लास’ घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, तातडीने काम सुरू न झाल्यास ते महापालिकेला करार रद्द करण्याची शिफारस करतील.भांडेवाडीमध्ये प्रस्तावित या प्रकल्पासाठी मनपा, एस्सेल व हिताचीने जॉईंट व्हेंचर कंपनी स्थापित केली होती. याअंतर्गत मनपाकडून दर दिवशी मिळणाऱ्या ८०० टन कचऱ्यापासून ११.५ मेगावॅट विजेचे उत्पादन करण्याचा विचार आहे. महावितरण या प्रकल्पातील वीज ७ रुपये युनिटच्या दराने खरेदीसाठी तयार होते. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये १ रुपये दरानुसार भांडेवाडी येथे १० एकर जागा १५ वर्षांसाठी वितरित केली होती. यात केवळ इतकीच अट होती की, या जमिनीचा उपयोग वीज प्रकल्पाशिवाय इतर कुठल्याही कामासाठी होणार नाही. या जमिनीचा उपयोग कर्ज घेण्यासाठी किंवा गहाण ठेवण्यासाठीसुद्धा करता येऊ शकत नाही.सध्या अनेक प्रयत्नानंतरही ही योजना साकार होत नव्हती. सूत्रानुसार या प्रकल्पातील सर्वात मोठे संकट म्हणजे ऑपरेटरला देण्यात येणाऱ्या शुल्कामुळे निर्माण झाले आहे. महापालिकेने सॉलिड वेस्टचे टिपिंग शुल्क ७५० रुपये प्रति टनावरून कमी करून २२५ रुपये केले आहे. कारण यासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ऑपरेटरला ९६.२२ कोटी रुपये मिळणार आहेत.अनेक कर्मचाऱ्यांनी सोडली नोकरीमनपा सूत्रानुसार एस्सेलने या प्रकल्पासाठी एक कार्यालय सुरू केले होते. काही कर्मचारीसुद्धा नियुक्त करण्यात आले होते. परंतु बहुतांश कर्मचाऱ्यांनी नंतर नोकरी सोडली. या प्रकल्पासाठी सध्या केवळ प्रकल्प संचालक जीवन सोनवणे हेच कार्यरत आहेत.दोन वर्षात पूर्ण होणार प्रकल्पया प्रकल्पासंदर्भात दाखल याचिकेवर उत्तर सादर करताना मनपाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात असे आश्वासन दिले आहे की, या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून, दोन वर्षात काम पूर्ण करण्यात येईल.सहा आठवड्यात सुरू होणार कामनितीन गडकरी यांनी गुरुवारी एस्सेलचे सीईओ संदीप चमोनिया व अध्यक्ष कमल माहेश्वरी यांना स्पष्टपणे सांगितले की, प्रकल्पाचे काम तातडीने सुरू झाले नाही तर करार रद्द करून दुसऱ्या कंपनीला काम सोपविले जाईल. एस्सेलच्या अधिकाऱ्यांनी चार ते सहा आठवड्यात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. माहेश्वरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, प्रकल्पाचे काम सुरू आहे. कार्यालयसुद्धा सुरू आहे. आता कामाला गती देण्यात येईल. मनपा आयुक्तांनाही याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीelectricityवीज