पितृपंधरवड्यात मेथी, ढेमस खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST2021-09-27T04:08:52+5:302021-09-27T04:08:52+5:30

नागपूर : गेल्या तीन आठवड्यांपासून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले असून ...

In Pitripandharvadya, fenugreek and dhemas are eaten | पितृपंधरवड्यात मेथी, ढेमस खातोय भाव

पितृपंधरवड्यात मेथी, ढेमस खातोय भाव

नागपूर : गेल्या तीन आठवड्यांपासून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले असून गृहिणींचा स्वयंपाकघरातील खर्च वाढला आहे. रविवारी होलसेल बाजारात मेथीचे भाव १०० रुपयांवर तर किरकोळमध्ये १३० ते १४० रुपये किलो भाव होते. तसेच ढेमस होलसेलच्या ४० रुपयांच्या तुलनेत किरकोळमध्ये ६० रुपये भाव होते. याशिवाय पालक आणि अन्य भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. रविवारी किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलोचे वांगे ६० रुपयांवर तर कोथिंबीरचे भाव १०० रुपयांवर पोहाेचले होते. पितृपंधरवड्यात सर्वच भाज्या भाव खात आहेत. गृहिणी भाज्या खरेदीकडे कानाडोळा करून स्वयंपाकघरात कडधान्याचा उपयोग करीत आहेत.

बाजारात पत्ता कोबी ४० तर फूल कोबीचे भाव ६० रुपयांवर पोहोचले आहेत. पावसामुळे शेतातच भाज्या खराब झाल्या आहेत. भाज्यांची तोडणी करणे शक्य नसल्याने पालेभाज्या शेतातच खराब होत आहेत. वांगी तोडणी थांबली आहे. वांगी स्थानिक शेतकऱ्यांकडून कमी तर नाशिक येथून मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. बाजारात वांगी स्थानिक शेतकऱ्यांकडूनच विक्रीसाठी येतात. पण पावसामुळे शेतकऱ्यांवर बंधन आले आहे. किरकोळमध्ये सर्व भाज्या प्रति किलो ४० रुपयांवर पोहोचल्या आहेत. होलसेल बाजारातही भाज्यांचे भाव वाढल्याची माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट (कॉटन मार्केट) असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली.

भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)

भाजीपालाबाजारातील दर घराजवळ

वांगी४०-५० ६०

कोथिंबीर७०-८० १००

हिरवी मिरची २५ ४०

टोमॅटो१२-१५ ३०

कारले३०-४० ६०

चवळी शेंग २५-३० ४०

गवार शेंग ४० ६०

पत्ता कोबी २० ४०

फूल कोबी ४० ६०

कोहळ २५ ४०

लवकी १५ ३०

पालक३०-४० ६०

मेथी १०० १४०

सिमला मिरची २५-३० ४०

तोंडले २५ ४०

दोडके ४० ६०

बीन्स ८० १००

काकडी१५-२० ३०

मुळा २० ३०

गाजर२५-३० ४०

बटाटे१२-१५ ३०

पुरवठा कमी; मागणी वाढली

गेल्या काही दिवसांपासून होलसेल बाजारात भाज्यांचा पुरवठा कमी असून तुलनेत किरकोळमध्ये मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव अचानक वाढले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणांमध्येही भाज्यांचे भाव जास्तच होते. नवीन भाज्यांची आवक ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात होणार असून तोपर्यंत गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील.

Web Title: In Pitripandharvadya, fenugreek and dhemas are eaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.