शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

‘पीएचडी’ आता आणखी अवघड

By admin | Updated: July 29, 2016 02:51 IST

देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘पीएचडी’ची बजबजपुरी माजली आहे. संशोधनाचा स्तर वाढावा यासाठी ‘यूजीसी’ने

‘यूजीसी’चे नवे नियम : पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५५ टक्के गुणांची अट नागपूर : देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘पीएचडी’ची बजबजपुरी माजली आहे. संशोधनाचा स्तर वाढावा यासाठी ‘यूजीसी’ने (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) अगोदरच पावले उचलली होती. परंतु आता जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार ‘पीएचडी’ करणे आणखी कठीण होणार आहे. ‘पीएचडी’ नोंदणीसाठी उमेदवारांना आता पदव्युत्तर अभ्यासक्रमात कमीत कमी ५५ टक्के गुण किंवा समकक्ष श्रेणी असली पाहिजे, अशी अट टाकण्यात आली आहे. यामुळे ‘पीएचडी’ नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येणार आहे. देशातील अनेक विद्यापीठांतून ‘पीएचडी’ करणे फारच सोपे आहे, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु गेल्या काही कालावधीपासून ‘यूजीसी’ने ‘पीएचडी’ची बजबजपुरी थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहे. यातच आता समोर जात ‘यूजीसी’ने नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’ नोंदणीसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांत ४५ ऐवजी आता ५० टक्के गुण अनिवार्य राहणार आहेत. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही टक्केवारी ५० वरून ५५ करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांत जास्त अभ्यास करणे अनिवार्य झाले आहे. याशिवाय ‘पीएचडी’ प्रबंध सादर करण्याच्या कालावधीतदेखील बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला उमेदवार नोंदणीनंतर दोन वर्षे ते पाच वर्षे या कालावधीत प्रबंध सादर करू शकत होता. आता ही अट कमीत कमी तीन वर्षे व जास्तीत जास्त सहा वर्षे अशी करण्यात आली आहे. दिव्यांग व महिला उमेदवारांना ही मर्यादा जास्तीत दोन वर्ष वाढवून देण्यात येऊ शकते. (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या पदरी येणार निराशा ‘पीएचडी’ नोंदणीसाठी अनिवार्य असणाऱ्या ‘पेट’साठी १ आॅगस्टपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ करण्यासाठी हजारो विद्यार्थी इच्छुक आहेत. परंतु आता पदव्युत्तर अभ्यासक्रमातील गुणांतील टक्केवारी वाढविण्यात आल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येणार आहे. नव्या नियमावलीनुसार ते नोंदणीसाठी पात्रच ठरणार नाहीत. मार्गदर्शकांच्या निकषांमध्ये बदल आतापर्यंतच्या नियमावलीनुसार एका मार्गदर्शकाअंतर्गत जास्तीत जास्त आठ उमेदवार संशोधन करू शकत होते. परंतु ‘यूजीसी’च्या नव्या नियमांनुसार ही मर्यादा केवळ ‘प्रोफेसर’साठी राहणार आहे. ‘असोसिएट प्रोफेसर’कडे जास्तीत जास्त सहा व ‘असिस्टंट प्रोफेसर’कडे जास्तीत जास्त चार उमेदवार राहू शकतील. यामुळे अनेक विद्यापीठांत मार्गदर्शकांची कमतरता जाणवणार आहे. संबंधित मार्गदर्शक हा विद्यापीठ किंवा महाविद्यालयात पूर्णकालीन प्राध्यापक असला पाहिजे. ज्या महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत, तेथेच उमेदवार ‘पीएचडी’साठी नोंदणी करू शकतो, असेदेखील ‘यूजीसी’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. नागपूर विद्यापीठात यंदापासूनच अंमलबजावणी यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना विचारणा केली असता, ‘युजीसी’चे नवे नियम प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठातील ‘पीएचडी’ची गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही अगोदरच नियम कडक केले आहेत. ‘युजीसी’च्या नवीन नियमावलीचे आम्ही पालन करणार आहोत व यंदापासूनच त्यांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. १ आॅगस्टपासून ‘पेट’ची प्रक्रिया सुरू होणार आहे व त्याअगोदरच याची अधिसूचना जारी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.