शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

बांधावर झाडे लावण्यासाठी यापुढे पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याची परवानगी ग्राह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 7:53 PM

Plantation on farm land, Nagpur News महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी यापुढे पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याची परवानगी ग्राह्य धरली जाणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण रोहयोमध्ये सुधारणा : क्लिष्टता दूर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी यापुढे पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याची परवानगी ग्राह्य धरली जाणार आहे. या सुधारणेमुळे लाभार्थ्यांना संपर्क सोयीचा होणार असून क्लिष्टता दूर होइल, असे सांगितले जात आहे.

राज्याच्या नियोजन विभाग (रोहयो) कडून अलीकडेच तीन दिवसांपूर्वी यात सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार, यापूर्वीच्या १२ एप्रिल २०१८ च्या आदेशात सुधारणा केली आहे. यापूर्वी या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेच्या अधिकाऱ्याची परवानगी असणे बंधनकारक होते. मात्र शेतकऱ्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणे बरेचदा अडचणीचे जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नव्या सुधारणेनुसार, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयाची परवानगी ग्राह्य धरली जाणार आहे. यापुढे ही कामे ग्रामपंचायतीकडून करून घेण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत पंचायत समितीमधील कृषी अधिकाऱ्याची तांत्रिक मान्यता घेतल्यानंतर गट विकास अधिकाऱ्याची प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे.राज्यात २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अस्तित्वात आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांना जमिनीवर ग्रामपंचायत मार्फत फळबाग लागवडीसाठी तसेच बांधावर झाडे लावण्याच्या योजनेसाठी २००८ मध्ये मान्यता देण्यात आली होती. यात यापूर्वी २०१४ मध्ये दुसऱ्यांदा आता आता तिसऱ्यांदा सुधारणा करण्यात आली आहे.

योजनेत लावावयचे वृक्ष

या याजनेअंतर्गत साग, चंदन, बांबू, निंब, चारोळी, आवळा, हिरडा, बेहळा, अर्जुन, सीताफळ, चिंच, जांभूळ, अंजन, बिबा, खैर, आंबा, काजू (फक्त कोकण विभागासाठी) फणस, ताड, सिंदी, सुरू, शिवण, शेवगा, हादगा, कढीपत्ता, महारूख, मॅजियम, मेलिया डुबिया आदी झाडे लावण्याची परवानगी आहे. १ जून ते ३० नोव्हेंबरही वृक्ष लागवडीची मुदत आहे. योजनेचे तालुका पातळीवर नियंत्रण होत असून उपविभागीय अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठित आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती