शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दिव्यांगांच्या शाळा झाल्या ‘कायम’ दिव्यांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 10:48 IST

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या दिव्यांगांच्या शाळा, कर्मशाळा शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कायमस्वरूपी दिव्यांग होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्दे१६४ शाळांना मिळेना सामाजिक न्याय अवर सचिवांकडे नऊ महिन्यांपासून प्रस्ताव पडून

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या दिव्यांगांच्या शाळा, कर्मशाळा शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कायमस्वरूपी दिव्यांग होण्याच्या मार्गावर आहेत. आॅगस्ट २००४ मध्ये ‘कायमस्वरूपी विना अनुदान तत्त्वावर’ या शाळांना मान्यता देण्यात आली. तेव्हापासून गेल्या १४ वर्षांचा ‘कायम’ वनवास या शाळा भोगत आहेत. कुठल्याही अनुदानाशिवाय सुरू असलेल्या या शाळाच आता दिव्यांग होण्याच्या मार्गावर आहेत.सामाजिक न्याय विभागाच्या ८०० वर शाळा असताना नियमांना बगल देत फक्त १७७ शाळांचा ‘कायम’ शब्द वगळून १२३ शाळांना अनुदान तत्त्वावर मान्यता देण्यात आली. उर्वरित शाळांचे मात्र ‘कायम’चे ग्रहण सुटले नाही. त्यामुळे दिव्यांगासाठी काम करणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांनी ही मागणी शासनाकडे लावून धरली. शेवटी १३ जानेवारी २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यामार्फत तपासणी करून ‘अ’ श्रेणीतील शाळांचा ‘कायम’ शब्द वगळण्यासाठी अपंग कल्याण आयुक्तांना आदेशीत करण्यात आले. या अनुषंगाने आयुक्तांनी फेब्रुवारी २०१६ ला राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या शाळांची तपासणी करून तसे अहवाल शासनास सादर केले.आयुक्तांनी तपासणी केलेल्या शाळांचे ‘कायम’ शब्द काढण्याचे प्रस्ताव शासनास सादरच केले नाही. त्यामुळे दिव्यांगासाठी काम करणाºया स्वयंसेवी संस्थांच्या संचालकांनी आ. परिणय फुके यांच्या माध्यमातून शासनाकडे विनंती केली. आ. फुके यांनी १६ मार्च २०१७ रोजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना पत्र देऊन ५ एप्रिल २०१७ रोजी बैठक बोलावली. या बैठकीत सामाजिक न्यायमंत्र्यांसह राज्यमंत्री, आ. अनिल सोले, परिणय फुके, गिरीश व्यास, नागो गाणार, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, आयुक्त आदी उपस्थित होते. या बैठकीत सामान्य शाळांचा ‘कायम’ शब्द वगळण्यात आला त्याच धर्तीवर दिव्यांग शाळांचा ‘कायम’ शब्द वगळण्यात यायला हवा, अशी सकारात्मक चर्चा झाली. ‘कायम’ शब्द वगळण्याकरिता ‘अ’ श्रेणीतील प्रस्ताव शासनास सादर करावे, असे निर्देशही आयुक्तांना देण्यात आले. या बैठकीतील निर्देशानुसार आयुक्तांनी १७ जून २०१७ रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून प्रस्ताव शासनास सादर केले. त्यावर शासनातर्फे पुन्हा एकदा अभिप्राय मागविण्यात आले. त्यानुसार १३ डिसेंबर २०१७ रोजी आयुक्तांनी २०८ शाळांची कायम शब्द काढण्यास हरकत नसल्याचे अभिप्राय दिले. असे असतानाही अद्याप ‘कायम’च्या जाचातून दिव्यांग शाळांना मुक्ती मिळालेली नाही.

विशिष्ट हेतूने प्रस्ताव प्रलंबितसामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव कामटे यांच्याकडे गेल्या नऊ महिन्यांपासून ‘कायम’ शब्द वगळण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहेत. हे प्रस्ताव विशिष्ट हेतूने प्रलंबित ठेवण्यात आल्याचा शाळा संचालकांचा आरोप आहे. येत्या काळात शाळा चालक या विरोधात उघड आवाज उठवून मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्र्यांच्या दालनातच आंदोलन करण्याच्या विचारात आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र