शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे प्रमाण ४० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 9:02 PM

वर्तमानातील वाढत्या तणावांमुळे आजच्या पिढीतील २० ते २५ या वयोगटातील मुलींची या ना त्या कारणाने पाळी अनियमित झाली आहे. अनेक जणींची पाळी तर १५ दिवस आधी येते वा सहा-सहा महिने येत नाही. यालाच वैद्यकीय भाषेत ‘पीसीओडी’ (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) म्हणतात. याचे प्रमाण ३२ ते ४० टक्के आहे.

ठळक मुद्देडॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांची पत्रपरिषदेत माहितीवंध्यत्व निवारण कार्यशाळा शनिवारपासून

आॅनलाईन लोकमतनागपूर : वर्तमानातील वाढत्या तणावांमुळे आजच्या पिढीतील २० ते २५ या वयोगटातील मुलींची या ना त्या कारणाने पाळी अनियमित झाली आहे. अनेक जणींची पाळी तर १५ दिवस आधी येते वा सहा-सहा महिने येत नाही. यालाच वैद्यकीय भाषेत ‘पीसीओडी’ (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) म्हणतात. याचे प्रमाण ३२ ते ४० टक्के आहे. त्यातही समस्या नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर उपचार घेण्यास आलेल्या मुलींचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी दिली.९ व १० डिसेंबर रोजी स्त्रीरोग तज्ज्ञांमधील वंध्यत्व निवारण चिकित्सेसंबंधी ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी ‘मास्टर क्लास इन्फर्टीलिटी-३’ या वंध्यत्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या.डॉ. श्रीखंडे म्हणाल्या, पाळी अनियमित येणे या ‘पीसीओडी’तील प्रमुख लक्षणाचा गर्भधारणेच्या दृष्टीने धोका असतो. सोबतच अकारण लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, अतिप्रमाणात केस गळणे हे शारीरिक पातळीवरही त्रास उद्भवतात. त्यामुळे वरकरणी केवळ पाळीशी संबंधित दिसणारी ही समस्या इतक्या साºया आजारांना आमंत्रण देते. याकडे मुलींनी व त्यांच्या पालकांनी वेळीच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. या विषयासह इतरही महत्त्वाच्या विषयावर लंडनमधील प्रसिद्ध तज्ज्ञ सर प्रा. डॉ. अरुलकुमारन, डॉ. लूका सबातिनी, डॉ. ज्योत्स्ना पुंडीर, डॉ. संजय प्रभू, डॉ. प्रकाश सावनूर, डॉ. जयदीप टाक व डॉ. केरसी आवारी मार्गदर्शन करतील.अधिक ताण व जंक फूडचे सेवन टाळा‘पीसीओडी’चे कारण सांगताना डॉ. श्रीखंडे म्हणाल्या, अलीकडे मुलींना कामाचा, वाढत्या स्पर्धेचा अधिक ताण असतो. शिवाय जंक फूड, अतिगोड वा अतितिखट खाणे या सवयी त्यांच्या शरीरावर परिणाम करतात. मुख्य कारण तणावच आहे. याकडेच सर्वजणी दुर्लक्ष करतात. योग्य व्यायाम, योग्यवेळी योग्य आहार व ऊठसूठ ‘एन्टिबायोटिक्स’ला दूर ठेवल्यास हा आजार दूर ठेवण्यास मदत होते.महिला-पुरुषांमध्ये वंध्यत्व‘फिप्टी-फिप्टी’बाळ होत नाही म्हणून पूर्वी महिलेलाच जबाबदार धरले जायचे. ३० वर्षांपूर्वी पुरुषांमध्ये याचे प्रमाण २० टक्के तर महिलांमध्ये ३० टक्के होते. परंतु आता महिला व पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण हे ‘फिप्टी-फिप्टी’ आहे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव व लठ्ठपणा ही काही कारणे आहेत, असेही डॉ. श्रीखंडे म्हणाल्या.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर